शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

जनजागृतीमुळे पतंग उडविण्यासह जखमी पक्ष्यांचे प्रमाण निम्म्यावर; जैन अ‍लर्ट ग्रुपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 18:57 IST

मीरा- भाईंदर शहरात मकर संक्रांत सणावेळी साजरा होणाऱ्या पतंग महोत्सवामुळे अनेक पक्षी जीव गमावतात, जखमी होतात.

भाईंदर - मीरा- भाईंदर शहरात मकर संक्रांत सणावेळी साजरा होणाऱ्या पतंग महोत्सवामुळे अनेक पक्षी जीव गमावतात, जखमी होतात. त्यामुळे पतंग न उडविता सण उत्साहाने साजरा करा, असे आवाहन करून लोकांमध्ये वर्षानुवर्षे जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांमुळे शहरातील पतंग उडविण्यासह जखमी पक्षांचे प्रमाण यंदा निम्यावर आल्याचा दावा जैन अ‍ॅलर्ट ग्रुपने केला.यामुळे यंदा एका सुतार पक्षासह ५४ कबुतर जखमी झाले तर ७ कबुतरांचा मृत्यू झाल्याचे जैन अ‍ॅलर्ट ग्रुपचे कल्पेश नागडा यांनी सांगितले. मीरा- भाईंदर शहरामध्ये गुजराती समाज मोठ्या प्रमाणात असल्याने पतंग महोत्सवाला येथे उधाण येते. परंतु या पतंगांच्या महोत्सवामुळे आकाशात भ्रमंती करणाऱ्या पक्ष्यांवरच संक्रांत येते. पतंगांच्या मांज्यात पक्षी अडकल्याने अनेकदा ते गतप्राण होतात तर काही जखमी होतात. यात प्रामुख्याने कबुतरांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा जखमी पक्ष्यांवर स्थानिक सामाजिक संस्थांद्वारे उपचार केले जातात. या सणावेळी जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी विविध समाजिक संस्था उपचार शिबिरे स्थापन करून त्यात पशु-पक्ष्यांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची व्यवस्था करतात. सुरुवातीला जैन अ‍ॅलर्ट ग्रुप व अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट या दोन सामाजिक संस्थांनी शहरातील विविध भागांत संक्रातीच्या काळात पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी होणा-या पक्ष्यांना वाचविण्यासाठी २००८ मध्ये मोहीम सुरू केली. त्यांनी शहरात ठिकठिकाणी जखमी पक्ष्यांच्या उपचाराचे शिबिर सुरू केले. सुरुवातीच्या काळात सुमारे ४५० हून अधिक पक्षी जखमी तर १०० हून अधिक मृत्युमुखी पडले होते. हा आकडा कमी करण्यासाठी या दोन्ही संस्थांनी थेट पतंग उडविण्याचे तोटे लोकांना सांगण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचा परिणाम सकारात्मक होऊ लागल्याने त्यांनी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात पतंग उडविणा-यांचे प्रमाण कमी झाल्याने पक्ष्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रमाणही कमी झाले. २०१५ मध्ये २२७ पक्षी जखमी तर २५ मृत्यू, २०१६ मध्ये १८० जखमी व २० मृत्यू, २०१७ मध्ये १२३ जखमी तर १८ मृत्यू, २०१८ मध्ये १०७ जखमी व १७ मृत्यू, यंदा त्याचे प्रमाण निम्म्याहून कमी झाल्याचे जैन अ‍ॅलर्ट ग्रुपचे पीयूष धामी यांनी सांगितले. पतंग महोत्सवावेळी झाडांसह इतर ठिकाणी अडकलेला मांजा जमा करून देणाऱ्यांना सुमारे एक किलो मागे ५० रुपये देण्याचा फंडा जैन अ‍ॅलर्ट ग्रुपने सुरू केला. तसा संदेश समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्याने अनेकांनी मांजा आणून संस्थेच्या हवाली करून रक्कम मिळवल्याचे सांगण्यात आले.