शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

‘सुमनसुगंध’ कार्यक्रमातून दुष्काळग्रस्तांना मदत

By admin | Updated: October 6, 2015 00:34 IST

रसिकांच्या मनाला ज्या आवाजाने तीन दशके भुरळ घातली त्या जेष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा सांगितिक प्रवास उलगडणारा ‘स्वरानंद’ प्रस्तुत ‘सुमनसुगंध’ हा कार्यक्रम

ठाणे: रसिकांच्या मनाला ज्या आवाजाने तीन दशके भुरळ घातली त्या जेष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचा सांगितिक प्रवास उलगडणारा ‘स्वरानंद’ प्रस्तुत ‘सुमनसुगंध’ हा कार्यक्रम १० आॅक्टोंबर रोजी सायंकाळी ४ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहात होणार आहे. ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमातूनच दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाऊंडेशनला निधी दिला जाणार आहे. ‘लोकमत’च्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या उपक्रमाला प्रतिसाद देत दुष्काळग्रस्तांसाठी ‘अथर्व एंन्टरटेन्मेंट’ आणि ‘स्वरानंद’ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.‘सुमनसुगंध’ ही संकल्पना जेष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर यांची असून त्याचे आयोजन कर्जतच्या ‘अथर्व एंन्टरटेन्मेंट’ यांनी केले आहे. या कार्यक्रमात सुमनतार्इंशी मंगला खाडीलकर या मनमोकळा संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी गप्पा मारतांना त्यांना आवडलेली काही निवडक गाणी त्या गाणार आहेत. तसेच उर्वरित गाण्यांची धुरा माधुरी करमरकर, विद्या करगिलकर आणि मंदार आपटे हे सांभाळणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांनी केले आहे. यावेळी ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या हस्ते कल्याणपूर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळतोय आणि या दुष्काळग्रस्तांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी संवेदनशील रंगकर्मी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे,’ हे कृतीतून दाखवून दिले. आता या कार्यक्रमातून निधी संकलन करुन दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ संस्थेकडे द्यावा, अशी संकल्पना ‘अथर्व’ एंटरटेंन्मेटचे प्रसाद कारुळकर यांनी मांडली. या संकल्पनेला ‘स्वरानंद’च्या हर्षदा शिंदे, स्वरा शिंदे आणि संदीप सावंत यांनी दुजोरा दिला. लोकमतनेही ‘काहीतरी कर ठाणेकर’ हा उपक्रम राबविल्याने या कार्यक्रमाची त्याला जोड दिल्याचे कारुळकर म्हणाले. कार्यक्रमाला ‘अनुदान प्रॉपर्टीज प्रा. लि. आणि ‘रचना कन्स्ट्रक्शन’ यांचे सहकार्य मिळाल्यामुळे हा कार्यक्रम विनामूल्य सादर करण्याचे बळ मिळाल्याचेही ते म्हणाले. यावेळी ‘अनुदान’चे नटेश शिंदे आणि सुब्रमण्यम शिंदे हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदतीची पेटी...कार्यक्रम विनामूल्य घोषित केल्यानंतर ‘नाम’ फाऊंडेशनची निर्मिती झाली. त्यामुळे ज्या दात्यांना दुष्काळग्रस्तांसाठी मदत करायची आहे, त्यांनी कार्यक्रमस्थळी ठेवलेल्या पेटीत स्वेच्छेने आर्थिक मदत करावी. मध्यंतरानंतर ‘नाम’ च्या सभासदाकडे ती सुपूर्द केली जाणार आहे. याच मदतीतून दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न असल्याचे कारुळकर म्हणाले.