शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय दबावामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय - प्रदीप पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 03:24 IST

ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही.

अंबरनाथ - ज्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आणि त्या टाकीचे काम दीड वर्षांपूर्वी पूर्णही झाले. मात्र असे असले तरी अजूनही या पाण्याच्या टाकीतून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जात नाही. टाकीतून पुरवठा होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते प्रदीप पाटील यांनी केला आहे.अंबरनाथसाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम २०१३ मध्ये सुरू झाले. या योजनेतून शहरात नवीन जलवाहिनी टाकणे आणि जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित केले होते. मात्र या कामासाठी झालेल्या विलंबामुळे शहरात पाण्याची आणीबाणी सुरू झाली. उल्हासनदी भरून वाहत असतानाही शहरात मात्र पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात नदीतून पाणी उचलण्यावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे त्या काळात अतिरीक्त पाणी उचलता येत नाही. मात्र आज उल्हासनदीला नैसर्गिक पाण्याची पातळीच जास्त आहे. त्यामुळे या नदीतून पाणी उचलण्यावर बंधने शिथिल केली आहेत. मात्र असे असले तरी अंबरनाथमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अंबरनाथ पश्चिम भागातील कोहोजगांव,कमलाकरनगर, नारायणनगर, फुलेनगर, गौतमनगर, डीएमसी चाळ या भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तसेच या भागात नव्याने विकसित होणा-या इमारतींनाही पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. याबाबत अधिकाºयांना विचारणा केली असता अधिकारीही समाधानकारक उत्तर देत नाहीत.अंबरनाथ पश्चिम भागातील पाणी समस्येचे मूळ हे पाण्याचे जलकुंभ आहेत. हे जलकुंभ बांधून तयार असतानाही ते भरलेले नाही. वर्ष ते दोन वर्ष उलटूनही जलकुंभ भरण्यात येत नसल्याने जुन्याच यंत्रणेद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाल्याचे आणि त्यातून लवकरच पाणीपुरवठा केला जाईल असे निदर्शनास येताच राजकीय पक्षांनी श्रेयासाठी धावपळ केली. मात्र आधी पाणी द्या नंतर उद्घाटन करत बसा अशी काँग्रेसने भूमिका घेतल्याने या भागाला पाणी मिळणार नाही यासाठी राजकारण केले जात आहे. जीवन प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकाºयांना हाताशी धरुन राजकीय दबाव टाकत जलकुंभ सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. दीड वर्ष या भागातील नागरिकांनी पाण्यासाठी त्रास सहन केला आहे. आता या भागातील नागरिकांची संहनशीलता संपत आला आहे. बुधवारपर्यंत पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्यास पाण्याच्या टाकीवर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.या संदर्भात जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाºयांनाही कल्पना आहे. मात्र तेही या प्रकरणात लक्ष देत नाहीत. अधिकाºयांना निवेदनाची भाषा कळत नसल्याची जाणीव आम्हाला झाली असून त्यांचे कान आणि डोळे उघडतील असे आंदोलन गुरूवारी केले जाईल असा इशारा काँग्रेसने केला आहे.कारणांची जंत्री सादरनागरायणनगर येथील जलकुंभाचे काम होऊन दीड वर्ष उलटले आहे. मात्र जलवाहिनीच न टाकल्याने हा जलकुंभ सुरू झाला नाही. आधी जलवाहिनीचे आणि नंतर पंप नसल्याचे कारणे पुढे करुन जलकुंभ सुरु केला जात नाही.प्राधिकरणाची उदासीनतापंपाचे काम झाल्यावर या पंपाची चाचणी सुरू असल्याचे कारण पुढे केले जात आहे. चाचणी करून जलवाहिनीमधील गळती तपासली जात असल्याचे कारण पुढे केले जात आहे. मूळात ही चाचणी झाल्यावर लागलीच पाणीपुरवठा करणे शक्य आहे. मात्र ते कामही प्राधिकरण करत नाही. पुरेसे पाणी असतानाही शहरात टंचाई जाणवत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या