शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन नसल्याने त्रस्त भाजपा नगरसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:22 IST

भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही ...

ठळक मुद्देकोट्यावधी रूपये खर्च करूनही पाणी समस्या कायममुख्य जलवाहिनीतून लोकांचे नळ कनेक्शनआत्महत्या करण्यास निघताना वाढला रक्तदाब

भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही नियोजन नसल्याने तेथे पाणी समस्या कायम आहे. त्याचा त्रास तेथील रहिवाश्यांना सहन करावा लागत असल्याने हि समस्या दूर करण्यासाठी नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अखेर भाजप नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी आज महासभेत प्रशासनास जाब विचारीत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे जाहिर करीत त्या महासभेतून उठून गेल्या. परंतू सभागृहातून धावत बाहेर पडल्याने त्यांना चक्कर आल्याने त्या खाली पडल्या. या घटनेने महासभेत गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना तात्काळ स्व.इंदिरागांधी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.शहरातील नारपोली भागात टेकडीवर वसलेल्या साठेनगर येथे सुमारे पन्नास हजार लोकांची वस्ती असून त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर पाणी समस्या आहे. ही समस्या कायमरित्या संपावी या करीता तेथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र त्या टाकीत पाणी कां पोहोचत नाही? याकडे पाणी पुरवठा अधिका-यांचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. टाकीकडे जाणा-या जलवाहिनीतून कोणासही नळ कनेक्शन न दिल्यास टाकीत पाणी साठा होऊन त्याचे लोकवस्तीत वितरण करणे शक्य आहे. परंतू पाणी टाकीत जाण्यापुर्वी लोकांनी जोडणी केल्याने ही समस्या कायम आहे. महानगरपालिकेच्या कामात व पाणीपुरवठ्याच्या कामात हस्तक्षेप करणा-यांवर पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होऊ लागली आहे. या बाबत भाजपा नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी वेळोवेळी आयुक्तांना निवेदन देऊन तक्रारी केल्या असून त्यांनी या बाबत निर्वाणीचा इशारा देणारे पत्र ४ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्या पत्रामध्ये समस्या न सोडविल्यास महानगरपालिका मुख्यालयांच्या तीस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा नगरसेविका बगाडे यांनी दिला होता .आज सोमवार दि ११ रोजी दुपारनंतर महासभा सुरू असताना नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी या विषयावर पुन्हा एकदा आपली पाणी समस्येची व्यथा मांडून झाल्यावर आत्महत्या करण्यासाठी तावातावाने सभागृहाबाहेर जाऊ लागल्या. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या.त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. या घटनेनंतर कार्यकर्ते व सुरक्षा रक्षक यांनी सभागृहात धाव घेतली. त्यांना उचलून तात्काळ स्व.इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयात येथे उपचाराकरीता दाखल केले . त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. या प्रकाराबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.या बाबत आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या समस्येवर उपाय करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी व विरोधीपक्ष नेता यांच्यात बैठक घडवून तोडगा काढण्याचे ठरले होते. त्या दृष्टीने काम सुरू केले असून येत्या दोन दिवसात ते मार्गी लागणार असल्याने साखराबाई बगाडे यांनी असे पाऊल उचलणे गैर असल्याचे सांगितले .

टॅग्स :Bhiwandiभिवंडीwater scarcityपाणी टंचाई