शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

मनपाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन नसल्याने त्रस्त भाजपा नगरसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:22 IST

भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही ...

ठळक मुद्देकोट्यावधी रूपये खर्च करूनही पाणी समस्या कायममुख्य जलवाहिनीतून लोकांचे नळ कनेक्शनआत्महत्या करण्यास निघताना वाढला रक्तदाब

भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही नियोजन नसल्याने तेथे पाणी समस्या कायम आहे. त्याचा त्रास तेथील रहिवाश्यांना सहन करावा लागत असल्याने हि समस्या दूर करण्यासाठी नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अखेर भाजप नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी आज महासभेत प्रशासनास जाब विचारीत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे जाहिर करीत त्या महासभेतून उठून गेल्या. परंतू सभागृहातून धावत बाहेर पडल्याने त्यांना चक्कर आल्याने त्या खाली पडल्या. या घटनेने महासभेत गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना तात्काळ स्व.इंदिरागांधी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.शहरातील नारपोली भागात टेकडीवर वसलेल्या साठेनगर येथे सुमारे पन्नास हजार लोकांची वस्ती असून त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर पाणी समस्या आहे. ही समस्या कायमरित्या संपावी या करीता तेथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र त्या टाकीत पाणी कां पोहोचत नाही? याकडे पाणी पुरवठा अधिका-यांचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. टाकीकडे जाणा-या जलवाहिनीतून कोणासही नळ कनेक्शन न दिल्यास टाकीत पाणी साठा होऊन त्याचे लोकवस्तीत वितरण करणे शक्य आहे. परंतू पाणी टाकीत जाण्यापुर्वी लोकांनी जोडणी केल्याने ही समस्या कायम आहे. महानगरपालिकेच्या कामात व पाणीपुरवठ्याच्या कामात हस्तक्षेप करणा-यांवर पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होऊ लागली आहे. या बाबत भाजपा नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी वेळोवेळी आयुक्तांना निवेदन देऊन तक्रारी केल्या असून त्यांनी या बाबत निर्वाणीचा इशारा देणारे पत्र ४ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्या पत्रामध्ये समस्या न सोडविल्यास महानगरपालिका मुख्यालयांच्या तीस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा नगरसेविका बगाडे यांनी दिला होता .आज सोमवार दि ११ रोजी दुपारनंतर महासभा सुरू असताना नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी या विषयावर पुन्हा एकदा आपली पाणी समस्येची व्यथा मांडून झाल्यावर आत्महत्या करण्यासाठी तावातावाने सभागृहाबाहेर जाऊ लागल्या. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या.त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. या घटनेनंतर कार्यकर्ते व सुरक्षा रक्षक यांनी सभागृहात धाव घेतली. त्यांना उचलून तात्काळ स्व.इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयात येथे उपचाराकरीता दाखल केले . त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. या प्रकाराबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.या बाबत आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या समस्येवर उपाय करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी व विरोधीपक्ष नेता यांच्यात बैठक घडवून तोडगा काढण्याचे ठरले होते. त्या दृष्टीने काम सुरू केले असून येत्या दोन दिवसात ते मार्गी लागणार असल्याने साखराबाई बगाडे यांनी असे पाऊल उचलणे गैर असल्याचे सांगितले .

टॅग्स :Bhiwandiभिवंडीwater scarcityपाणी टंचाई