शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

कल्याण-डोंबिवलीमध्ये अंमलबजावणी अभावी ‘अहवाल’ कागदावरच

By admin | Updated: November 14, 2015 23:35 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि केंद्र व राज्य यांच्या सुचनेनुसार जे फेरीवाला राष्ट्रीय धोरण अंमलात आणावयाचे आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि केंद्र व राज्य यांच्या सुचनेनुसार जे फेरीवाला राष्ट्रीय धोरण अंमलात आणावयाचे आहे. त्याच्या अंमलबजावणीला कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अद्यापपर्यंत प्रारंभ झालेला नाही. यासंदर्भातला अहवालही तयार आहे. परंतु, त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष झाल्याने अनधिकृत फेरीवाल्यांना अभय मिळाले आहे.त्यांचे वाढते अतिक्रमण नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, मुख्य रस्ते, महत्वाचे चौक, ना फेरीवाला क्षेत्राबरोबरच लहान मोठ्या गल्ल्याही आजघडीला त्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. डोंबिवलीतील उर्सेकरवाडीतील भाजी मंडईमध्ये हे वास्तव दिसते. तेथील वाहन पार्किंगच्या जागेतच ते बस्तान मांडत असल्याने मंडईत भाजी घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत आहे. याचा फटका मंडईतील विक्रेत्यांनादेखील बसत असून त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्यानेअतिक्रमण करणाऱ्यांना पालिके ने अभय दिल्याचे चित्र आहे. शहरात दोन भाजी मंड्या आहेत. यातील नेहरू रोडवरील मंडई वापराविना ओस पडली आहे. तर उर्सेकरवाडीतील मंडईचा विक्रेत्यांकडून काही प्रमाणात वापर केला जात असताना तेथेही फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असल्याने कायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचबरोबर या परिसरात अनधिकृतपणे खाद्यपदार्थ बनविण्याच्या गाड्याही सर्रास सुरू आहेत. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कल्याणचीपरिस्थितीदेखील तशीच आहे. पालिकेच्या या ढिसाळ कारभारावर कल्याण शहरातील व्यापारीदेखील नाराज आहेत. विशेष बाब म्हणजे फेरीवाल्यांवरील कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला त्यांच्याकडून जुलै २०१४ मध्ये थेट कायदेशीर नोटीस बजावली होती. शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक आणि महमद अली चौक ते नेहरू चौक या परिसरातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याकडे या नोटीसीव्दारे लक्ष वेधले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने यासंदर्भातला अहवाल देखील तयार केला आहे. यातून ८ हजार ८०० फेरीवाले असल्याचे समोर आले. सर्व्हेचा अहवाल शहर फेरीवाला समितीसमोर ठेवला जाणार आहे. यानंतर झोन निश्चित करून ओळखपत्र प्रदान केले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली होती. परंतु, कारवाई अभावी हा अहवाल कागदोपत्रीच राहीला आहे.