शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कल्याण-बदलापूर महामार्गावर कोंडी, वाहनांच्या लांबचलांब रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:04 IST

शाळा सुटण्याच्या वेळेतच अंबरनाथ येथे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन तास ही कोंडी सोडवणे वाहतूक विभागाला शक्य झाले नाही.

अंबरनाथ : शाळा सुटण्याच्या वेळेतच अंबरनाथ येथे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन तास ही कोंडी सोडवणे वाहतूक विभागाला शक्य झाले नाही.अंबरनाथमध्ये मुख्य महामार्गावर ही कोंडी झालेली होती. दुपारी १२ वाजता अंबरनाथ पोलीस ठाणे ते मटका चौक या मार्गावर कोंडी झालेली होती. वाहने १० ते १५ मिनिटे एकाच जागेवर उभी होती. ही वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेमार्फत करण्यात येत होता. मात्र, अनेक वाहनचालकांनी चुकीच्या ठिकाणाहून वाहने घुसवल्यामुळे गाड्या जागच्या जागीच उभ्या राहिल्या.अखेर, मटका चौक ते पालिका कार्यालयासमोरील वाहतूक प्रत्येक लेननुसार सुरू केल्यावर दुपारी २ नंतर ही वाहतूककोंडी सोडवण्यात वाहतूक विभागाला यश आले. या कोंडीचा सर्वाधिक फटका हा शाळेच्या बसचालकांना सहन करावा लागला. शाळेच्या बस या कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब झाला. शहरातील रस्ता रुंद असतानाही अशा प्रकारे कोंडी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार अशी कोंडी होत असल्याने वाहनचालकांनी मात्र संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkalyanकल्याण