शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे भिवंडीत रहिवाशांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:36 IST

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

भिवंडी : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात काही ठिकाणी चोवीस तास, तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे.महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पालिका स्टेमकडून ७३ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेकडून ४० एमएलडी पाणी विकत घेते, तर २ एमएलडी पाणी पुरवठा वºहाळा तलावातून केला जात आहे. अशा प्रकारे शहरासाठी ११५ एमएलडी पाणी पुरवठा होत असून, त्याचे नियोजन नसल्याने शहरातील पाणी वितरणात असमानता दिसून येते. सर्वांना नियमीत व वेळेत पाणी मिळावे यासाठी १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात आल्या असून, एक टाकी येत्या महिन्यात सुरू होणार आहे.महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया स्टेम व मुंबई महानगरपलिकेने प्रत्येक आठवड्यास २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी चोवीस तास पाणी बंद असते. त्यानंतर आलेले पाणी जलवाहिनीत भरण्यासाठी १० तास लागतात. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जलवाहिनीचे शेवटचे टोक असलेल्या भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. अशा वेळी मागणीप्रमाणे अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळात पाणी पुरवठा कमी दाबाने, अथवा पाणी न आल्याने अंबीकानगर, ब्राम्हणआळी, अशोकनगर, अंजूरफाटारोड, निजामपूर, देवजीनगर, भंडारी कंपाऊंड, टावरे कंपाऊंड, विठ्ठलनगर भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापैकी ३ ठिकाणी दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मनपाच्या पाणी पुरवठ्याच्या वेळा काही भागात ठरवून दिल्या आहेत. काही ठिकाणी चोवीस तास पाणी पुरविले जात आहे. शहरातील अनेक लोकवस्तींमध्ये रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, सर्वांना सकाळी ६ ते रात्री १० वाजताच्या दरम्यान पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी १४ टाक्या बांधलेल्या असून, त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात यश आले आहे. स्टेम आणि मुंबई मनपाकडून मुबलक पाणी मिळत आहे. हे पाणी सर्व टाक्यांतून रहिवाशांना देण्याची व्यवस्था झाल्यास, शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने होणारी पाणी टंचाई दूर होणार आहे.- संदिप पटनावर,उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, भिवंडी महानगरपालिका

टॅग्स :Waterपाणी