शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे भिवंडीत रहिवाशांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:36 IST

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

भिवंडी : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात काही ठिकाणी चोवीस तास, तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे.महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पालिका स्टेमकडून ७३ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेकडून ४० एमएलडी पाणी विकत घेते, तर २ एमएलडी पाणी पुरवठा वºहाळा तलावातून केला जात आहे. अशा प्रकारे शहरासाठी ११५ एमएलडी पाणी पुरवठा होत असून, त्याचे नियोजन नसल्याने शहरातील पाणी वितरणात असमानता दिसून येते. सर्वांना नियमीत व वेळेत पाणी मिळावे यासाठी १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात आल्या असून, एक टाकी येत्या महिन्यात सुरू होणार आहे.महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया स्टेम व मुंबई महानगरपलिकेने प्रत्येक आठवड्यास २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी चोवीस तास पाणी बंद असते. त्यानंतर आलेले पाणी जलवाहिनीत भरण्यासाठी १० तास लागतात. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जलवाहिनीचे शेवटचे टोक असलेल्या भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. अशा वेळी मागणीप्रमाणे अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळात पाणी पुरवठा कमी दाबाने, अथवा पाणी न आल्याने अंबीकानगर, ब्राम्हणआळी, अशोकनगर, अंजूरफाटारोड, निजामपूर, देवजीनगर, भंडारी कंपाऊंड, टावरे कंपाऊंड, विठ्ठलनगर भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापैकी ३ ठिकाणी दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मनपाच्या पाणी पुरवठ्याच्या वेळा काही भागात ठरवून दिल्या आहेत. काही ठिकाणी चोवीस तास पाणी पुरविले जात आहे. शहरातील अनेक लोकवस्तींमध्ये रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, सर्वांना सकाळी ६ ते रात्री १० वाजताच्या दरम्यान पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी १४ टाक्या बांधलेल्या असून, त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात यश आले आहे. स्टेम आणि मुंबई मनपाकडून मुबलक पाणी मिळत आहे. हे पाणी सर्व टाक्यांतून रहिवाशांना देण्याची व्यवस्था झाल्यास, शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने होणारी पाणी टंचाई दूर होणार आहे.- संदिप पटनावर,उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, भिवंडी महानगरपालिका

टॅग्स :Waterपाणी