शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

फुटीच्या भीतीने ‘साई’चे नगरसेवक होणार भूमिगत

By admin | Updated: March 21, 2017 01:59 IST

महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून

उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून आपल्या पक्षात मोठी फूट पडेल, या भीतीने साई पक्षाला ग्रासले आहे. त्यामुळे त्या पक्षाचे नगरसेवक भूमिगत होण्याच्या तयारीत आहेत. त्यांना शहराबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी भाजपाकडून नेमकी कोणती पदे मिळतील, त्याबाबत चर्चा करण्यासाठी त्या पक्षासह अन्य मित्रपक्षांनी एकत्र बैठकही घेतली. त्यात साई पक्षाला उपमहापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद हवे असून त्याबबात अंतिम निर्णयझालेला नाही. एवढे महत्वाचे पक्ष साई पक्षाला देण्यास पक्षातून विरोध आहे. दरम्यान, उल्हासनगरमध्ये आकड्यांची जुळवाजुळव करून सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याने साई पक्षाची धास्ती वाढली आहे.उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक ३ किंवा ५ एप्रिलला होणार आहे. महापौरपद मिळवण्यावरून भाजपा आणि शिवसेनेत स्पर्धा सुरू आहे. शिवसेनेने काँग्रेस, पीआरपी, भारिपाचे प्रत्येकी एक, रिपाइं आठवले गटाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ अशा ९ नगरसेवकांसोबत युतीची बोलणी केली. त्यांना सत्ता स्थापनेसाठी ६ नगरसेवक कमी पडत असल्याने त्यांनी ११ नगरसेवक असलेल्या साई पक्षाला महापौरपदाची आॅफर दिली. साई पक्ष शिवसेनेच्या युतीत सामील न झाल्यास त्यातील एका गटाला महापौरपदाचे आमिष दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या पक्षात उभी फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड यापुर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. त्यांचे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी चार जणाचे पॅनल निवडून आणले आहे. त्यांना शिवसेनेने गळाला लावण्याचे प्रयत्न केले आहेत. महापालिकेच्या सत्तेसाठी शिवसेना-भाजप एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. शिवसेना नुसता पाठिंबा देण्यास तयार नाही. त्यातच गेल्यावेळी रद सोडण्यास खळखळ केल्याने महापौर राजीनामानाट्य रंगले. त्यात साई पक्षाच्या नेत्यांना धक्काबुक्की झाल्याने सिंधी समाजाच्या एका गटात शिवसेनेबाबत रोष असल्याचा साई पक्ष, भाजप आणि ओमी टीमचा दावा आहे. साई पक्षाच्या आशा इदनानी यांनी महायुतीतील करारनाम्यानुसार महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या रागातून शिवसैनिकांनी आशा यांच्यासह साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, नगरसेवक सुनील गंगवानी, भाजपाचे तत्कालीन आमदार कुमार आयलानी, नेते जमनुदास पुरस्वानी यांना मारहाण केली होती. तो राग काही नेत्यांच्या मनात कायम आहे. (प्रतिनिधी)