शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

फुटीच्या भीतीने ‘साई’चे नगरसेवक होणार भूमिगत

By admin | Updated: March 21, 2017 01:59 IST

महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून

उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसे उल्हासनगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून आपल्या पक्षात मोठी फूट पडेल, या भीतीने साई पक्षाला ग्रासले आहे. त्यामुळे त्या पक्षाचे नगरसेवक भूमिगत होण्याच्या तयारीत आहेत. त्यांना शहराबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी भाजपाकडून नेमकी कोणती पदे मिळतील, त्याबाबत चर्चा करण्यासाठी त्या पक्षासह अन्य मित्रपक्षांनी एकत्र बैठकही घेतली. त्यात साई पक्षाला उपमहापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद हवे असून त्याबबात अंतिम निर्णयझालेला नाही. एवढे महत्वाचे पक्ष साई पक्षाला देण्यास पक्षातून विरोध आहे. दरम्यान, उल्हासनगरमध्ये आकड्यांची जुळवाजुळव करून सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याने साई पक्षाची धास्ती वाढली आहे.उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक ३ किंवा ५ एप्रिलला होणार आहे. महापौरपद मिळवण्यावरून भाजपा आणि शिवसेनेत स्पर्धा सुरू आहे. शिवसेनेने काँग्रेस, पीआरपी, भारिपाचे प्रत्येकी एक, रिपाइं आठवले गटाचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ अशा ९ नगरसेवकांसोबत युतीची बोलणी केली. त्यांना सत्ता स्थापनेसाठी ६ नगरसेवक कमी पडत असल्याने त्यांनी ११ नगरसेवक असलेल्या साई पक्षाला महापौरपदाची आॅफर दिली. साई पक्ष शिवसेनेच्या युतीत सामील न झाल्यास त्यातील एका गटाला महापौरपदाचे आमिष दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्या पक्षात उभी फूट पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड यापुर्वी शिवसेनेचे उपशहरप्रमुख होते. त्यांचे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी चार जणाचे पॅनल निवडून आणले आहे. त्यांना शिवसेनेने गळाला लावण्याचे प्रयत्न केले आहेत. महापालिकेच्या सत्तेसाठी शिवसेना-भाजप एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. शिवसेना नुसता पाठिंबा देण्यास तयार नाही. त्यातच गेल्यावेळी रद सोडण्यास खळखळ केल्याने महापौर राजीनामानाट्य रंगले. त्यात साई पक्षाच्या नेत्यांना धक्काबुक्की झाल्याने सिंधी समाजाच्या एका गटात शिवसेनेबाबत रोष असल्याचा साई पक्ष, भाजप आणि ओमी टीमचा दावा आहे. साई पक्षाच्या आशा इदनानी यांनी महायुतीतील करारनाम्यानुसार महापौरपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या रागातून शिवसैनिकांनी आशा यांच्यासह साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, नगरसेवक सुनील गंगवानी, भाजपाचे तत्कालीन आमदार कुमार आयलानी, नेते जमनुदास पुरस्वानी यांना मारहाण केली होती. तो राग काही नेत्यांच्या मनात कायम आहे. (प्रतिनिधी)