शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाल्याच्या सफाईऐवजी नाल्यात मातीभराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:18 IST

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या नाल्याची सफाई करण्याचे काम अंबरनाथ पालिका करत आहे. तर, दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेने या नाल्यात मातीभराव करून भुयारी गटाराचे काम सुरू केले आहे. मुख्य नाल्यातच मातीभराव केल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.अंबरनाथ पालिकेने शहरातील मुख्य आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. शिव मंदिर ते कानसई गावच्या स्मशानभूमीपर्यंतचा नाला साफ करण्याची जबाबदारी ही अंबरनाथ पालिकेवर आहे. मात्र, नाल्याच्या दुसऱ्या टोकावर उल्हासनगर महापालिकेच्या ठेकेदाराने नाल्यातच मातीभराव केल्याचे काही दिवसांपासून दिसते आहे. शहरातील महत्त्वाचा रस्ता असतानाही या नाल्यातील गाळ काढण्याऐवजी त्या नाल्यात मातीभराव करण्यात आला आहे. पावसाळ्यात हा नाला भरून वाहतो. त्यामुळे अंबरनाथ पालिका सर्वात आधी याच नाल्याची सफाई करते. यंदा काम करण्यासाठी गेलेल्या पालिकेला नाल्यातच मातीभराव दिसला.मुळात दोन्ही शहरांच्या मध्यभागी हा नाला असल्याने नाल्याचे एक टोक पालिकेच्या हद्दीत, तर दुसरे टोक हे उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत आहे. या उल्हासनगर हद्दीतील नाल्याच्या शेजारी पालिकेने भुयारी गटार योजनेची वाहिनी टाकली आहे. ते काम संपुष्टातदेखील आले आहे. पावसाआधी नाल्यातील गाळ आणि माती काढणे गरजेचे आहे. मात्र, उल्हासनगर महापालिकेची यंत्रणा ते काम करण्यास पुढाकार घेत नाही. दोन्ही शहरांच्या मध्यभागी नाला असूनही प्रत्येक पावसाच्या आधी अंबरनाथ पालिकाच हा नाला साफ करते. यंदा मात्र नाल्यातच मातीभराव केल्याने कसे काम करावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अंबरनाथ पालिका या नाल्याची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेत असताना उल्हासनगर महापालिकेने नाल्यातील गाळ काढण्यासाठी यंत्रणा लावण्याची गरज आहे.