शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

नाल्याच्या सफाईऐवजी नाल्यात मातीभराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:18 IST

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या नाल्याची सफाई करण्याचे काम अंबरनाथ पालिका करत आहे. तर, दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेने या नाल्यात मातीभराव करून भुयारी गटाराचे काम सुरू केले आहे. मुख्य नाल्यातच मातीभराव केल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.अंबरनाथ पालिकेने शहरातील मुख्य आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. शिव मंदिर ते कानसई गावच्या स्मशानभूमीपर्यंतचा नाला साफ करण्याची जबाबदारी ही अंबरनाथ पालिकेवर आहे. मात्र, नाल्याच्या दुसऱ्या टोकावर उल्हासनगर महापालिकेच्या ठेकेदाराने नाल्यातच मातीभराव केल्याचे काही दिवसांपासून दिसते आहे. शहरातील महत्त्वाचा रस्ता असतानाही या नाल्यातील गाळ काढण्याऐवजी त्या नाल्यात मातीभराव करण्यात आला आहे. पावसाळ्यात हा नाला भरून वाहतो. त्यामुळे अंबरनाथ पालिका सर्वात आधी याच नाल्याची सफाई करते. यंदा काम करण्यासाठी गेलेल्या पालिकेला नाल्यातच मातीभराव दिसला.मुळात दोन्ही शहरांच्या मध्यभागी हा नाला असल्याने नाल्याचे एक टोक पालिकेच्या हद्दीत, तर दुसरे टोक हे उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत आहे. या उल्हासनगर हद्दीतील नाल्याच्या शेजारी पालिकेने भुयारी गटार योजनेची वाहिनी टाकली आहे. ते काम संपुष्टातदेखील आले आहे. पावसाआधी नाल्यातील गाळ आणि माती काढणे गरजेचे आहे. मात्र, उल्हासनगर महापालिकेची यंत्रणा ते काम करण्यास पुढाकार घेत नाही. दोन्ही शहरांच्या मध्यभागी नाला असूनही प्रत्येक पावसाच्या आधी अंबरनाथ पालिकाच हा नाला साफ करते. यंदा मात्र नाल्यातच मातीभराव केल्याने कसे काम करावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अंबरनाथ पालिका या नाल्याची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेत असताना उल्हासनगर महापालिकेने नाल्यातील गाळ काढण्यासाठी यंत्रणा लावण्याची गरज आहे.