शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या सफाईऐवजी नाल्यात मातीभराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:18 IST

अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरांच्या मध्यातून जाणारा वालधुनी नाला हा पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या नाल्याची सफाई करण्याचे काम अंबरनाथ पालिका करत आहे. तर, दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेने या नाल्यात मातीभराव करून भुयारी गटाराचे काम सुरू केले आहे. मुख्य नाल्यातच मातीभराव केल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.अंबरनाथ पालिकेने शहरातील मुख्य आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले आहे. शिव मंदिर ते कानसई गावच्या स्मशानभूमीपर्यंतचा नाला साफ करण्याची जबाबदारी ही अंबरनाथ पालिकेवर आहे. मात्र, नाल्याच्या दुसऱ्या टोकावर उल्हासनगर महापालिकेच्या ठेकेदाराने नाल्यातच मातीभराव केल्याचे काही दिवसांपासून दिसते आहे. शहरातील महत्त्वाचा रस्ता असतानाही या नाल्यातील गाळ काढण्याऐवजी त्या नाल्यात मातीभराव करण्यात आला आहे. पावसाळ्यात हा नाला भरून वाहतो. त्यामुळे अंबरनाथ पालिका सर्वात आधी याच नाल्याची सफाई करते. यंदा काम करण्यासाठी गेलेल्या पालिकेला नाल्यातच मातीभराव दिसला.मुळात दोन्ही शहरांच्या मध्यभागी हा नाला असल्याने नाल्याचे एक टोक पालिकेच्या हद्दीत, तर दुसरे टोक हे उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत आहे. या उल्हासनगर हद्दीतील नाल्याच्या शेजारी पालिकेने भुयारी गटार योजनेची वाहिनी टाकली आहे. ते काम संपुष्टातदेखील आले आहे. पावसाआधी नाल्यातील गाळ आणि माती काढणे गरजेचे आहे. मात्र, उल्हासनगर महापालिकेची यंत्रणा ते काम करण्यास पुढाकार घेत नाही. दोन्ही शहरांच्या मध्यभागी नाला असूनही प्रत्येक पावसाच्या आधी अंबरनाथ पालिकाच हा नाला साफ करते. यंदा मात्र नाल्यातच मातीभराव केल्याने कसे काम करावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अंबरनाथ पालिका या नाल्याची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेत असताना उल्हासनगर महापालिकेने नाल्यातील गाळ काढण्यासाठी यंत्रणा लावण्याची गरज आहे.