शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

कल्याण-डोंबिवलीत फेरीवाला कारवाईत दिरंगाई : मनसेचे विरोधी पक्षेनेते मंदार हळबेंची आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 12:15 IST

उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभागक्षेत्र अधिका-यांवर अवमान याचिका का दाखल करु नये असा इशारा देत आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्दे विनाविलंब अंमलबजावणी न केल्यास अवमान याचिका १५० मीटरची नियंत्रण रेषा का आखली जात नाही? कल्याण-डोंबिवली दोन्ही शहरांमध्ये फेरीवाले पुन्हा स्थानक परिसरात आढळले

डोंबिवली: उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी प्रभागक्षेत्र अधिका-यांवर अवमान याचिका का दाखल करु नये असा इशारा देत आयुक्त पी.वेलरासू यांना नोटीस बजावली आहे.वकील समीर तोंडापुरकर यांच्या मार्फत ती नोटीस हळबे यांनी आयुक्तांना बजावली असून महापालिकेने विनाविलंब नियंत्रण रेषा मारायला हव्यात, त्यामुळे फेरीवाल्यांना नेमके कुठे बसायचे ती जागा निश्चित होईल, तसेच त्या जागे व्यतिरीक्त जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर अशांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात हळबे यांनी मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली दोन्ही शहरांमध्ये फेरीवाले पुन्हा स्थानक परिसरात आढळले असून ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला ठिकठिकाणचे प्रभाग अधिकारी, त्यांचे अतिक्रमण विभागातील कारवाई करणारे पथक आदी जबाबदार असल्याचे हळबे म्हणाले. त्यामुळे जर न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करायचा असेल तर अवमान याचिका का दाखल करण्यात येऊ नये असा सवाल त्यांनी आयुक्त पी.वेलरासू यांना केला आहे. तसेच त्यांनी रेल्वे प्रशासनाकाही स्मरणपत्र दिले आहे.महापालिकेने न्यायालयाच्याच मार्गदर्शक तत्वांनूसार अद्याप कल्याण-डोंबिवलीत १५० मीटरपर्यंत नियंत्रण रेषा का मारल्या नाहीत, त्यात दिरंगाई का होत आहे असा सवालही त्यांनी केला. एकीकडे कारवाईपण नाही, आणि नियंत्रण रेषापण काढल्या जात नाहीत याबद्दल हळबेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.'' महापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या नीर्देशांनूसार स्थानक परिसरात १५० मीटरवर नियंत्रण रेषा आखावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी, स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करावा असे पत्र आयुक्तांना आधीच दिले आहे. त्याची अंमलबजावणी होत नसेल तर सभागृहात त्यासंदर्भात आवाज उठवण्यात येईल.'' - राजेंद्र देवळेकर, महापौर

 

 

 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्ली