शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंबरनाथमध्ये दारुड्या बापाची मुलाने केली हत्या

By पंकज पाटील | Updated: April 24, 2023 18:01 IST

आईला मारहाण करत असल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल

अंबरनाथ : दारू पिऊन आईला सतार मारहाण करणाऱ्या बापाची मुलाने हत्या केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. 

अंबरनाथ पश्चिमेच्या बुवापाडा परिसरात राजेश वर्मा हा त्याची पत्नी अनिता आणि १९ वर्षांचा मुलगा प्रकाश याच्यासह वास्तव्याला होता. राजेशला दारूचे व्यसन होते आणि त्यातूनच नवरा बायकोमध्ये सतत वाद होऊन राजेश हा पत्नी अनिताला मारहाण करत होता. ही बाब मुलगा प्रकाश याला खटकत असल्याने प्रकाश आणि राजेश यांच्यातही वाद होत होते. रविवारीही राजेश हा दारू पिऊन पत्नी अनिताला मारहाण करत असताना मुलगा प्रकाश याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो मारहाण करतच असल्यामुळे प्रकाशने घरातील चाकू घेऊन राजेश याच्या छातीत खुपसला.

या घटनेत राजेश याचा मृत्यू झाला. यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजेश वर्मा याचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. तर पत्नी अनिता वर्मा हिच्या फिर्यादीवरून मुलगा प्रकाश वर्मा याच्याविरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथ