शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा; आरोग्य सेवेचा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 09:43 IST

गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारांत अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत.

टिटवाळा: गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारांत अडचणी येऊ नयेत यासाठी सरकारने जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 429 हून अधिक प्रकारच्या गोळ्या-औषधांचा साठा असतो. मात्र, या पैकी अनेक प्रकारच्या गोळ्या-औषधे उपलब्ध नसल्याने काही ठराविक गोळ्या-औषधांचा वापर रुग्णांसाठी होतो.गेल्या काही महिन्यांपासून गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा भासत आहे.

एका महिन्यातत नंतर औषधे येतील तेव्हा या, किंवा बाहेरून औषधे विकत घ्या असे गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी संजय झोपे हे रूग्णांना सांगत आहेत. त्यामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत असून,  गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

कल्याण तालुक्यातील गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रात अगोदरच सुविधांची वानवा असताना औषधांचा तुटवडा जाणवू लागल्याने रूग्णांचे हाल होऊ लागले आहेत. तालुक्यातील गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा कारभार म्हणजे 'रोजचे मडे त्याला कोण रडे' असा झाला असून सिव्हील आरोग्य प्रशासन याबाबत काहीच कारवाई करत नसल्याने कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा कधी जागी होणार? असा सवाल येथील नागरिक करत आहेत.

सध्या अवेळी पाऊस पडत असल्याने वातावरण बदल निर्माण झाला असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात रूग्णांच्या रांगा लागल्या आहेत. परंतु या शासकीय आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांतून नाराजीचा सूर निघत आहे. गोर गरीब आणि अडाणी लोकांचा वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांवर भाबडा विश्वास असल्याने अनेकदा आरोग्य यंत्रणे कडून मिळणाऱ्या हीन वागणुकीवर सर्वसामान्य नागरिक बोलत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे फावले असून याबाबत आरोग्य प्रशासन उदासीन असल्याने न मिळणाऱ्या सेवा कधी मिळणार? यासह विविध मूलभूत प्रश्न सुटत नाहीत हे दुर्दैवच आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रात साथीजन्य, संसर्गजन्य आजारांवर औषधोपचार केले जातात. बाह्य रुग्ण विभागात सर्दी, खोकला, ताप यासारख्या साथीजन्य आजारांवरील रुग्णांना तपासून काही औषधे दिली जातात. या शिवाय, एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त रुग्णांनाही या ठिकाणी एआरटी केंद्रातून औषधे पुरविली जातात. रुग्णांवर उपचार सुरू असताना काही वेळा प्रतिजैविके बाहेरून मागविण्यासाठी डॉक्टरांकडून चिठ्ठी दिली जात असल्याचे काही रुग्णांनी सांगितले.

गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये गोळ्या-औषधे आणि तज्ञांचा अभाव असल्याने खाजगी दुकानदाऱ्या बोकाळल्या आहेत. खोखल्याचा औषध संपला आहे मागविण्यात आला आहे मात्र, अद्याप औषधसाठा आलेला नाही. पुढील महिन्यात औषधे येतील तेव्हा या अशा प्रकारचा सल्ला  औषध निर्माण अधिकारी करीत आहेत. गोरगरीबांची पिळवणूक प्रकर्षाने समोर आली असली तरी राजकीय व शासकीय यंत्रणा यांना कोणाला काही पडले नसल्याचे अधोरेखित होत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना दर्जेदार उपचार मिळत नाही. तरीही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागतो. हे वास्तव समोर असले तरी शासकीय यंत्रणा कोणत्याही पातळीवर पर्यायी व्यवस्था करत नाही.

स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून‌औषधांचा तुटवडा असल्याचे जाहीरपणे रुग्णांना सांगत आहेत. ‘सरकार फक्त घोषणा करते. रुग्णालयांत औषधे उपलब्ध नाहीत.औषधे बाहेरून घ्या, नाही तर एका महिन्यात औषधे येतील असे सांगून गोवेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो,’ असे सुनिल जाधव या रुग्णाने सांगितले.

काही औषधे संपली असून,मागवीली आहेत, ती लवकरच उपलब्ध होती. औषध निर्माण अधिकारी यांनी अस बोलायला नको होत. 

योगेश कापूसकर, वैद्यकीय अधिकारी, गोवेली, प्रा,आ, केंद्र.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicineऔषधं