शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वाहन जबरी चोरीला विरोध केल्यानेच ‘त्या’ चालकाची निर्घृण हत्या, गुन्हे शाखेने लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 18:05 IST

आधी भाडयाने जीप घेऊन नंतर त्याच जीपचा आणखी एका अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यांसाठी वापर करण्यासाठी जबरी चोरीचा डाव हाणून पाडणा-या मधूकर उर्फ बबलू दाजी उमवणे (४२, रा. मानिवली, मुरबाड) याचा खून करण्यात आला.

ठाणे: आधी भाडयाने जीप घेऊन नंतर त्याच जीपचा आणखी एका अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यांसाठी वापर करण्यासाठी जबरी चोरीचा डाव हाणून पाडणा-या मधूकर उर्फ बबलू दाजी उमवणे (४२, रा. मानिवली, मुरबाड) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी स्वप्निल वरकुटे (१९) याच्यासह चौघांना ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.मानिवली येथील रहिवाशी बबलू हा मुरबाड परिसरात खासगी जीपचा चालक होता. तो ८ नोव्हेंबर रोजी दुपारी बदलापूर येथील भाडे घेऊन गेल्यानंतर जीपसह तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी काकडपाडा (टिटवाळा) येथे त्याची जीप रक्ताने माखलेल्या अवस्थेत मिळाली. तर चार दिवसांनी ११ नोव्हेंबर रोजी मुरबाड बदलापूर रस्त्यावर मासले बेलपाडा गावाच्या जंगलात बबलूचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर याप्रकरणी त्याचा भाऊ उमेश उमवने यांनी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांच्या आदेशाने मुरबाड पोलीस ठाण्याचे अजय वसावे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांची संयुक्त पथके तयार केली.स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सरळगाव मार्गावरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. त्यानुसार तांत्रिक माहितीच्या तसेच खबºयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्वप्निल वरकुटे (१९, रा. उशिद, फळेगाव, कल्याण), विजय वाघ (२५, रा. भुवन, मुरबाड), किरण मलीक (१९, रा. वाचकोले, खरीवली, शहापूर), आणि किरण हरड (१९, रा. खरीवली, शहापूर, जि. ठाणे) या चौघांना १८ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. या चौकशीतच त्यांनी संपूर्ण खूनाची माहिती पोलिसांना दिली.

असे घडले खूनाचे नाटय...बदलापूरला जायच्या नावाखाली बबलूची सुमो वरकुटे आणि त्याचा साथीदार सोन्या उर्फ लक्ष्मण या दोघांनी ८ नोव्हेंबर रोजी भाडयाने घेतली. सरगावजवळ बैलबाजारकडे त्यांचे आणखी तीन साथीदार या गाडीत बसले. मात्र, बैल पाडा आल्यानंतर त्यांनी बबलूला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तिथे त्याच्या गाडीचीच मागणी त्याच्याकडे त्यांनी केली. त्याने विरोध करताच सोन्याने बबलूला मागून दोरीने आवळले. तर विजयने गळयावर अत्यंत निर्घृणपणे चाकूने वार केला. मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. जीपमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांनी घाबरुन ही गाडी नेण्याचा निर्णय रद्द केला. नंतर मुरबाडच्या दिशेने जंगलात त्याचा मृतदेह त्यांनी फेकून दिला. तर वाशिम बाजूकडे गाडी लपवून ते पसार झाले होते.सीसीटीव्ही आणि ५६३ मोबाईल धारकांच्या चौकशीनंतर एपीआय बडाख, उपनिरीक्षक एन. एस. करांडे, सागर चव्हाण, जमादार अनिल वेळे, नाईक अशोक पाटील, संजय शिंदे आदींच्या पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळल्या. यातील मुख्य सूत्रधार लक्ष्मण घुडे उर्फ सोन्या हा मात्र अद्यापही फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.निरुपणकार असूनही खूनबबलूचे कोणाशीही शत्रूत्व नव्हते. त्याचे कोणाशी अनैतिक संबंध किंवा पैशाचा वादही नव्हता. तो बैठकीमध्ये निरुपणकार असल्याने त्याचा खून कसा आणि कोणी केला हे शोधणेही पोलिसांना मोठे आव्हान होते. कोणताही धागादोरा नसतांना सात दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लाावला.अपहरणासाठी होती गाडीची गरजलक्ष्मण घुडे आणि त्याच्या टोळीने एका मोठया व्यक्तिचे अपहरण करुन त्यांच्या कुटूंबियांनीकडून मोठी खंडणी उकळायची योजना आखली होती. त्यासाठी त्यांना एका वाहनाची गरज होती. त्यानुसार त्यांनी बबलूची सुमो जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याला विरोध केल्यानेच त्यांनी त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाल्याचे निरीक्षक व्यंकट पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा