शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ पंचायत समिती इमारतीमध्ये ‘ठिबक सिंचन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:56 IST

अधिकारी, कर्मचारी त्रस्त; दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

अंबरनाथ : अंबरनाथ येथील प्रशाकीय इमारतीमधील पंचायत समितीच्या कार्यालयाला गळती लागली आहे. संपूर्ण चौथा मजला गळत असल्याने अधिकाऱ्यांना या ठिकाणी काम करणे अवघड जात आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करुनही अधिकारी या इमारतीची गळती रोखण्यसाठी उपाययोजना करत नसल्याचे समोर आले आहे.अंबरनाथ तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय हे एकाच प्रशासकीय इमारतीत असून पहिले दोन मजले हे तहसीलदार कार्यालयासाठी असून उर्वरित दोन मजल्यांवर पंचायत समिती कार्यालय आहे. या इमारतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मुसळधार पावसात पंचायत समितीचे चौथा मजला हा पूर्णपणे गळत असून मोठ्या प्रमाणात पाणी कार्यालयात आले आहे.समितीचे एकही कार्यालय या गळतीतून वाचलेले नाही. गेल्या आठवड्याभरापासून अधिकारी आणि कर्मचारी काम करण्यासाठी सुरक्षित जागा शोधत आहेत. कार्यालयातील टेबलवरही पाणी पडत असल्याने त्या ठिकाणी बसून कामही करणे शक्य होत नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्या दया शेलार यांनीही जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली आहे. इमारतीला लागलेली गळती सोबत या ठिकाणी स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था, स्वच्छ पाण्याचा अभाव आदी तक्रारी यावेळी करण्यात आल्या. या गळतीमुळे कामासाठी येणाºया नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.पत्रे टाकून गळती रोखणे शक्यया प्रशासकीय इमारतीच्या छतावर पत्रे टाकून त्या ठिकाणी गळती रोखणे शक्य आहे. मात्र त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग योग्य सहकार्य करत नसल्याचे अधिकारी सांगतात.तर दुसरीकडे या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग योग्य सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या इमातीलाच धोका निर्माण होण्याची शक्याता आहे. चौथ्या मजल्याचे स्लॅब गळत असल्याने त्याचा थेट परिणाम हा इमारतीवर होणार आहे. याची कल्पना असतानाही दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.