शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

कल्याणच्या सखल भागांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:03 IST

नागरिकांमध्ये धास्ती कायम; खाडीलगत भरतीमुळे वाढली पाण्याची पातळी

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात २६ आणि २७ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून नागरिक सावरत असतानाच पुन्हा शुक्रवार आणि शनिवारी धुवाधार पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी पुन्हा पावसाची धास्ती घेतली. पावसाचे पाणी सकाळी ठिकठिकाणी शिरले होते. तसेच खाडीलगतच्या भागात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.पावसाने शुक्रवार रात्रीपासूनच जोरदार बॅटिंग सुरू केली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते तीनच्या रूळांमध्ये पाणी साचले. परिणामी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक, आंबेडकर रोडवर पाणी साचले होते. पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातही नाल्याला पूर आल्याने नागरिकांना रस्ता ओलांडता येत नव्हता. वालधुनी व उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पावसाचे पाणी ओसरले. मात्र, सायंकाळी भरतीच्या वेळी खाडीनजीक पावसाच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. पुन्हा घरे पाण्याखाली जाणार का, या चिंतेने ते त्रस्त होते. बिर्ला महाविद्यालय परिसरात चाळींमध्ये पाणी शिरले. रहिवाशांनी पाण्याच्या पंप लावून घरातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पावसाचा जोर असल्याने त्याचाही काही उपयोग झाला नाही. ऐतिहासिक काळा तलावही भरून वाहत होता. अनुपनगर, घोलपनगरात पाणी साचले. केडीएमसीच्या ‘ड’ प्रभागातील शामा व जीवनछाया या चाळीत पाणी साचले. शिवाजीनगर, वालधुनी परिसर, दावडी, पिसवली परिसरातीही पाणी शिरले.महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि उपायुक्त मारुती खोडके यांनी जलमय झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच काही नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. महापालिका हद्दीत सकाळपर्यंत १५० मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत पडलेल्या पावसाची एकूण नोंद दोन हजार ४५४ मिमी इतकी झाली आहे.कांबा येथील नाला केला अरुंदटिटवाळा : पावसाळ्यात कल्याण-मुरबाड महामार्ग बंद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या टाटा पॉवर हाउस कंपनीसमोरील सपना लॉन्स येथील अरुंद नाल्यावर अखेर कांबा ग्रामपंचायतीने शनिवारी कारवाई केली. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर झाला.कांबा गावातून कल्याण-मुरबाड महामार्ग जातो. या मार्गावर पूर्वीपासून म्हारळ व कांबा टाटा पॉवर हाउस येथे पावसाळ्यात पाणी भरत होते. परंतु, एमएमआरडीएने शहाड ते म्हारळपाडादरम्यान काँक्रिटचा रस्ता बनवून येथील पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु, तरीही टाटा पॉवर हाउस येथे पाणी भरत असल्याने हा मार्ग बंद होत आहे. २७ जुलैच्या पावसातही हा रस्ता बंद झाला. शनिवारीही तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अखेर कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश बनकरी, उपसरपंच संपदा बंडू पावशे, सदस्य मदन उबाळे, ग्रामविकास अधिकारी ए.जे. इंगोले, कर्मचारी गुरु नाथ बनकरी आदींनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मोरे, विस्तार अधिकारी दिनेश घोलप आदींच्या उपस्थितीत हा नाला जेसीबीद्वारे रुंद केला.

टॅग्स :Rainपाऊस