शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या सखल भागांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:03 IST

नागरिकांमध्ये धास्ती कायम; खाडीलगत भरतीमुळे वाढली पाण्याची पातळी

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात २६ आणि २७ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून नागरिक सावरत असतानाच पुन्हा शुक्रवार आणि शनिवारी धुवाधार पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी पुन्हा पावसाची धास्ती घेतली. पावसाचे पाणी सकाळी ठिकठिकाणी शिरले होते. तसेच खाडीलगतच्या भागात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.पावसाने शुक्रवार रात्रीपासूनच जोरदार बॅटिंग सुरू केली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते तीनच्या रूळांमध्ये पाणी साचले. परिणामी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक, आंबेडकर रोडवर पाणी साचले होते. पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातही नाल्याला पूर आल्याने नागरिकांना रस्ता ओलांडता येत नव्हता. वालधुनी व उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पावसाचे पाणी ओसरले. मात्र, सायंकाळी भरतीच्या वेळी खाडीनजीक पावसाच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. पुन्हा घरे पाण्याखाली जाणार का, या चिंतेने ते त्रस्त होते. बिर्ला महाविद्यालय परिसरात चाळींमध्ये पाणी शिरले. रहिवाशांनी पाण्याच्या पंप लावून घरातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पावसाचा जोर असल्याने त्याचाही काही उपयोग झाला नाही. ऐतिहासिक काळा तलावही भरून वाहत होता. अनुपनगर, घोलपनगरात पाणी साचले. केडीएमसीच्या ‘ड’ प्रभागातील शामा व जीवनछाया या चाळीत पाणी साचले. शिवाजीनगर, वालधुनी परिसर, दावडी, पिसवली परिसरातीही पाणी शिरले.महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि उपायुक्त मारुती खोडके यांनी जलमय झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच काही नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. महापालिका हद्दीत सकाळपर्यंत १५० मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत पडलेल्या पावसाची एकूण नोंद दोन हजार ४५४ मिमी इतकी झाली आहे.कांबा येथील नाला केला अरुंदटिटवाळा : पावसाळ्यात कल्याण-मुरबाड महामार्ग बंद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या टाटा पॉवर हाउस कंपनीसमोरील सपना लॉन्स येथील अरुंद नाल्यावर अखेर कांबा ग्रामपंचायतीने शनिवारी कारवाई केली. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर झाला.कांबा गावातून कल्याण-मुरबाड महामार्ग जातो. या मार्गावर पूर्वीपासून म्हारळ व कांबा टाटा पॉवर हाउस येथे पावसाळ्यात पाणी भरत होते. परंतु, एमएमआरडीएने शहाड ते म्हारळपाडादरम्यान काँक्रिटचा रस्ता बनवून येथील पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु, तरीही टाटा पॉवर हाउस येथे पाणी भरत असल्याने हा मार्ग बंद होत आहे. २७ जुलैच्या पावसातही हा रस्ता बंद झाला. शनिवारीही तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अखेर कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश बनकरी, उपसरपंच संपदा बंडू पावशे, सदस्य मदन उबाळे, ग्रामविकास अधिकारी ए.जे. इंगोले, कर्मचारी गुरु नाथ बनकरी आदींनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मोरे, विस्तार अधिकारी दिनेश घोलप आदींच्या उपस्थितीत हा नाला जेसीबीद्वारे रुंद केला.

टॅग्स :Rainपाऊस