शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कल्याणच्या सखल भागांत साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:03 IST

नागरिकांमध्ये धास्ती कायम; खाडीलगत भरतीमुळे वाढली पाण्याची पातळी

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात २६ आणि २७ जुलैला झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून नागरिक सावरत असतानाच पुन्हा शुक्रवार आणि शनिवारी धुवाधार पाऊस बरसला. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी पुन्हा पावसाची धास्ती घेतली. पावसाचे पाणी सकाळी ठिकठिकाणी शिरले होते. तसेच खाडीलगतच्या भागात भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली.पावसाने शुक्रवार रात्रीपासूनच जोरदार बॅटिंग सुरू केली होती. त्यामुळे शनिवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते तीनच्या रूळांमध्ये पाणी साचले. परिणामी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक, आंबेडकर रोडवर पाणी साचले होते. पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरातही नाल्याला पूर आल्याने नागरिकांना रस्ता ओलांडता येत नव्हता. वालधुनी व उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. दुपारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पावसाचे पाणी ओसरले. मात्र, सायंकाळी भरतीच्या वेळी खाडीनजीक पावसाच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. पुन्हा घरे पाण्याखाली जाणार का, या चिंतेने ते त्रस्त होते. बिर्ला महाविद्यालय परिसरात चाळींमध्ये पाणी शिरले. रहिवाशांनी पाण्याच्या पंप लावून घरातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पावसाचा जोर असल्याने त्याचाही काही उपयोग झाला नाही. ऐतिहासिक काळा तलावही भरून वाहत होता. अनुपनगर, घोलपनगरात पाणी साचले. केडीएमसीच्या ‘ड’ प्रभागातील शामा व जीवनछाया या चाळीत पाणी साचले. शिवाजीनगर, वालधुनी परिसर, दावडी, पिसवली परिसरातीही पाणी शिरले.महापालिका आयुक्त गोविंद बोडके आणि उपायुक्त मारुती खोडके यांनी जलमय झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच काही नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली. महापालिका हद्दीत सकाळपर्यंत १५० मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत पडलेल्या पावसाची एकूण नोंद दोन हजार ४५४ मिमी इतकी झाली आहे.कांबा येथील नाला केला अरुंदटिटवाळा : पावसाळ्यात कल्याण-मुरबाड महामार्ग बंद होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या टाटा पॉवर हाउस कंपनीसमोरील सपना लॉन्स येथील अरुंद नाल्यावर अखेर कांबा ग्रामपंचायतीने शनिवारी कारवाई केली. त्यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर झाला.कांबा गावातून कल्याण-मुरबाड महामार्ग जातो. या मार्गावर पूर्वीपासून म्हारळ व कांबा टाटा पॉवर हाउस येथे पावसाळ्यात पाणी भरत होते. परंतु, एमएमआरडीएने शहाड ते म्हारळपाडादरम्यान काँक्रिटचा रस्ता बनवून येथील पाण्याचा प्रश्न सोडवला. परंतु, तरीही टाटा पॉवर हाउस येथे पाणी भरत असल्याने हा मार्ग बंद होत आहे. २७ जुलैच्या पावसातही हा रस्ता बंद झाला. शनिवारीही तीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अखेर कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश बनकरी, उपसरपंच संपदा बंडू पावशे, सदस्य मदन उबाळे, ग्रामविकास अधिकारी ए.जे. इंगोले, कर्मचारी गुरु नाथ बनकरी आदींनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश अवचार, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मोरे, विस्तार अधिकारी दिनेश घोलप आदींच्या उपस्थितीत हा नाला जेसीबीद्वारे रुंद केला.

टॅग्स :Rainपाऊस