शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

आरोग्यसंपन्न, व्यसनमुक्त व गुंडगिरी रहीत ठाण्याचे स्वप्न पाहणारा 'वंचितांचा रंगमंच' अर्थात 'नाट्य जल्लोष'ची जोषात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:27 IST

ठाणे : 'लोकवस्ती मधे वंचिताचं आयुष्य जगणा-या युवकांनी आपण व आपले वातावरण या दोहोंचा बारकाईने विचार करावा व त्यावर विविध नाट्याविष्कार युवा नाट्य जल्लोष च्या यंदाच्या चौथ्या पर्वात सादर करावेत', असं आवाहन ठाण्यातील राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रणेते डाॅ. विकास हजिरनीस यांनी समता कट्ट्यावर आयोजित ...

ठळक मुद्दे'नाट्य जल्लोष'ची जोषात सुरूवातजातीय-सांप्रदायिक अपप्रचार नाटकांधून रोखा!    वंचितांच्या वस्तीतील युवकांचा भरभरून प्रतिसाद

ठाणे : 'लोकवस्ती मधे वंचिताचं आयुष्य जगणा-या युवकांनी आपण व आपले वातावरण या दोहोंचा बारकाईने विचार करावा व त्यावर विविध नाट्याविष्कार युवा नाट्य जल्लोषच्या यंदाच्या चौथ्या पर्वात सादर करावेत', असं आवाहन ठाण्यातील राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रणेते डाॅ. विकास हजिरनीस यांनी समता कट्ट्यावर आयोजित युवा मेळाव्यात केले. यावेळी तलाव संस्थेच्या मयुरेश भडसावळे यांनी युवा नाट्य जल्लोषच्या चौथ्या पर्वाचे  उदघाटन केले. अध्यक्षस्थानी समता विचार प्रसारक संस्थेचे डाॅ. संजय मंगला गोपाळ होते.

डाॅ. विकास हजिरनीस पुढे म्हणाले की, 'वस्तीतल्या लोकांमधे आरोग्याबाबत जागरूकतेचं महत्व लक्षात घेऊन चायनीज, कोला, सोडा आदी पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांचा धांडोळा मुलांनी नाटकांमधून घ्यावा. वाहतूक नियमन न केल्याने होणारे  हवा प्रदुषण, अनिर्बंध वृक्षतोडीमुळे कमी होणारे सावली व गारव्याचे आच्छादन, वस्तीत स्त्रियांमधेही आढळणारे तंबाखूच्या मशेरीचे व्यसन, अशा विविध मुद्द्यांवर लोकवस्तीतील युवक-युवतींना नव्याने अध्ययन करून नाट्यकृती बसवाव्यात, असंही ते पुढे म्हणाले. वस्त्यांधील गुंडागर्दी, मुलींची छेडाछेडी, कर्णकर्कश्य लाऊड स्पिकर्सचा गोंगाट आदींबाबत उपस्थित युवकांना बोलतं करत शहर नियोजन तज्ञ मयुरेष भडसावळे यांनी त्यांना आवाहन केलेे की या विरोधात आपण तोंड उघडत नाही व उघडलेच तर जाती वा धर्माचे आवाहन करत हा त्रास सहन करण्याची जबरदस्ती केली जाते. युवकांनी याबाबत अधिक जागरूक व संघटीत पवित्रा घेऊन प्रस्थापित राजकारण्यांचे हे षडयंत्र नाटकांधून उलगडले पाहीजे. अध्यक्षपदावरून बोलतांना संजय मं. गो. यांनी स्पष्ट केले की, 'नाट्य जल्लोष ही स्पर्धा नसून युवकांनी सभोवतालच्या स्थितीबाबतची त्यांची खदखद विधायकपणे व संविधानाच्या चौकटीत व्यक्त होण्याचे लोकमाध्यम आहे. इथून कसदार कार्यकर्ते कलाकार निर्माण व्हावेत असं सांगत त्यांनी जाहीर केले की, 'साने गुरूजी स्मृती निमित्ताने नाट्य जल्लोष जून महिन्यात संपन्न होईल. वंचितांच्या वस्ती गटांनी ५ मे पर्यंत नोंदणी करावी'. मतदाता जागरणच्या अनिल शाळीग्राम यांनी शाळा, आंगणवाडी, सीव्हील हाॅस्पीटल, क्लस्टर योजना आदींची माहीती दिली. यावेळी दहा लोकवस्त्यांमधील मोठ्या संख्येने उपस्थित युवकांनी नाट्य जल्लोष साठी प्राथमिक नोंदणी करतांना आपापल्या संभाव्य नाट्य विषय व कल्पना ऐकवल्या. किन्नरांचे आयुष्य, कचरा, स्वच्छता अॅप, सफाई कामगारांचे प्रश्न, नाले व तलाव, मुलींची छेडछाड, व्यसनाधिनता आदी मुद्द्यांचा विचार ते करत असल्याचे अनुजा जोहार, दुर्गा माळी, आतेश शिंदे, दीपक वाडेकर, निशांत पांडे या अनुभवी व गौतमी शिनगारे, तब्बसुम कुरेशी, स्मिता मोरे, केलास मंजाळ या नव्या युवकांनी मांडले. वाल्मिकी विकास संघाचे बाबुलाल करोतिया, व्यसनमुक्ती आंदोलनाचे अजय राठोड, कोळीवाड्यातील गिरीश साळगावकर, दिग्दर्शक विश्वनाथ चांदोरकर आदींनी या महोत्सवात युवकांना संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली. समता विचार प्रसारक संस्थेच्या मनिषा जोशी, हर्षलता कदम, सुनील दिवेकर, जेष्ठ साथी मंगेश खातू, उन्मेष बागवे, राहूल जोबनपुत्र आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक