शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कथा सादर करताना नाटकीपणा टाळावा - प्रा. अशोक चिटणीस

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 16, 2023 15:28 IST

कथाकथन हा प्रकार एकेकाळी लोकप्रिय होता. द.मा. मिरासदार, शंकर पाटील, गिरीजा कीर, व्यंकटेश माडगुळकर यांचे कथाकथन ऐकले आहे.

ठाणे : कथा लिहिताना त्यात वाचकांशी संवाद साधलेला असावा आणि ती सादर करताना त्यात नाट्यमयता असावी पण नाटकीपणा टाळावा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य अशोक चिटणीस यांनी व्यक्त केले. 

कथा परिणामकारकतेने कथन करता येणे ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासत आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवर ऐकणाऱ्यांशी संवाद साधल्यानेच मी आजवर यशस्वी कथाकथनकार झालो, असेही प्रा. चिटणीस म्हणाले. 

कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शहर शाखेच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन कोमसाप कट्टा, प्रिवा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कोमसाप ठाणे शहर अध्यक्ष ॲड. मनोज वैद्य, प्रिवा संकुल येथील संगिनी संस्थेच्या अध्यक्ष मनिषा धबडगांवकर, संयोजक मिनल कांबळे उपस्थित होते.

उपस्थित प्रेक्षकांना संबोधित करताना प्रा. चिटणीस पुढे म्हणाले, कथाकथन करताना श्रोत्याने प्रेक्षकांशी संवाद साधत कथा सांगावी. शब्दफेक, स्पष्ट उच्चार, वाक्यांसाठी आवश्यक असणारे चढउतार या सगळ्यांची उत्तम तयारी असेल तर आपण सांगितलेली कथा ही ऐकणाऱयांना आपलीशी वाटते. यावेळी ‘साप आणि शिडी' या संग्रहातील एका कथेतून त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोमसाप शहर अध्यक्ष ॲड. मनोज वैद्य यांनी कथाकथनाचे वाचनसंस्कृतीमधील महत्त्व सांगितले.

कथाकथन हा प्रकार एकेकाळी लोकप्रिय होता. द.मा. मिरासदार, शंकर पाटील, गिरीजा कीर, व्यंकटेश माडगुळकर यांचे कथाकथन ऐकले आहे. मोठमोठे साहित्यिक शाळाशाळांमधून कथाकथनाचे कार्यक्रम करायचे. त्यामुळे साहित्याविषयी लोकांमध्ये गोडी निर्माण झाली होती. यातूनच वाचनसंस्कृतीलाही मदत होत असे. परंतू आता साहित्यिक कथाकथनाचे कार्यक्रम करीत नाहीत. त्यामुळे हा प्रकार आता बंद होऊ लागला आहे. परंतू मुग्धा फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रा. अशोक चिटणीस यांनी कथाकथनाचा कार्यक्रम सुरू ठेवला असून कथाकथनाचे प्रकार आता पुन्हा लोकप्रिय व्हावा, या दृष्टीने कोमसापही प्रयत्न करेल, असे ॲड. वैद्य यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा धबडगांवकर आणि मिनल कांबळे यांनी केले तर श्वेता माळके यांनी आभार मानले.