शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 04:03 IST

केडीएमसीची अनास्था : तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही बांधकाम नाही; मुहूर्त कधी मिळणार?

कल्याण : शहराला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रस्तावित स्मारकाबाबत केडीएमसी प्रशासनाची अनास्था कायम आहे. आनंदीबाई यांच्या कर्तृत्वाचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट आला असतानाही तीन वर्षांपूर्वी स्मारकाचे भूमिपूजन होऊनही ते उभारण्यासाठी अद्यापपर्यंत मुहूर्त मिळालेला नाही.

प्रतिकूल परिस्थितीत अपार कष्ट आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर कल्याणच्या रहिवासी असलेल्या आनंदीबार्इंनी ११ मार्च १८८६ ला एमडी ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केली. या त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे यांनी आनंदीबार्इंचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात यावा, अशी मागणी केली. २००५ मध्ये तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या महासभेत डॉ. जोशी यांचे स्मारक म्हणून रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात पुतळा उभारावा, असा प्रशासनाकडील आलेला ठराव एकमताने मंजूर केला. याबाबत, २००७ मध्ये निविदा काढण्यात आल्या. परंतु, कार्यवाही पुढे सरकली नाही. स्मारक उभारणीसंदर्भात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ दोन वेळा काकडे यांनी लाक्षणिक उपोषण छेडले होते. मार्च २०१५ मध्ये त्यांनी बेमुदत उपोषणाचाही इशारा दिला होता. त्यानंतर, ११ वर्षांनी का होईना सत्ताधाºयांना भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला. यात मार्च २०१६ मध्ये कल्याणचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झाले. परंतु, तीन वर्षे उलटूनही स्मारक उभे राहू शकलेले नाही. यासंदर्भात केडीएमसी ‘ब’ प्रभाग कार्यालय बांधकाम विभागाचे उपअभियंता जगदीश कोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे बैठकीत व्यस्त असून नंतर संपर्क साधतो, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

राजकीय वारसा नसल्याने उपेक्षा : स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व सरकारी परवानग्या मिळाल्या आहेत. पुढील परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्याच्या पाठपुराव्यासाठी केडीएमसीकडूनही प्रस्ताव जाणे आवश्यक आहे. परंतु, प्रशासनाकडून दिरंगाई चालू आहे. डॉ. आनंदीबाई जोशी यांना राजकीय वारसा नाही. त्यामुळेच स्मारकाची रखडगाथा सुरू असावी, असे खेदाने बोलावे लागते, असे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अनिल काकडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Anandi Gopal Movieआनंदी गोपाळMumbaiमुंबई