शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

डॉ. बाबासाहेबांचा ‘या’ खुर्चीत बसून न्यायनिवाडा; १९४१ मध्ये पाणी भरण्यावरून झाला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:18 IST

आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते

प्रकाश जाधवमुरबाड : मुरबाड तालुक्यात १९ मे १९४१ रोजी पाणी भरण्यावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामोपचाराने हा वाद मिटविला. ज्या खुर्चीत बसून डॉ. बाबासाहेबांनी हा वाद सोडविला ती खुर्ची आजही शहरातील कौशिक अनंत भराडे यांच्या घरी जतन करून ठेवण्यात आले आहे. ही खुर्ची तालुक्यात सातत्याने समानतेची प्रेरणा देते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २० मे १९४१ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी मुरबाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे राहणारे अनंत धोंडू भराडे यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा गोविंद बाळू थोरात यांच्याही अंगणात ते आले होते. भाऊराव कृष्णराव तथा दादासाहेब गायकवाड हेदेखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

आमचे वडील अनंत भराडे यांनी वकिली केली होती. त्यामुळे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात होते. आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते. त्यांनी याच खुर्चीवर बसून न्यायनिवाडा केला होता. - कौशिक अनंत भराडे, मुरबाड.

१९ मे १९४१ रोजी फौजदारांची, गायकरांची विहीर असलेल्या जागेत पाणी भरण्यावरून अनुसया दोंदे व सोनाबाई घायवट यांचा काही सवर्णांशी वाद झाला होता. हा वाद विकोपास जाऊ नये म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेबांनी मुरबाडला येऊन हा वाद मिटवला. हा इतिहास ‘माता भीमाई’ पुस्तकाचे लेखक  योगेंद्र बांगर यांनी मुरबाड इतिहास व संदर्भ या ग्रंथात संकलित केला आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर