शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

डॉ. बाबासाहेबांचा ‘या’ खुर्चीत बसून न्यायनिवाडा; १९४१ मध्ये पाणी भरण्यावरून झाला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:18 IST

आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते

प्रकाश जाधवमुरबाड : मुरबाड तालुक्यात १९ मे १९४१ रोजी पाणी भरण्यावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊ नये यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामोपचाराने हा वाद मिटविला. ज्या खुर्चीत बसून डॉ. बाबासाहेबांनी हा वाद सोडविला ती खुर्ची आजही शहरातील कौशिक अनंत भराडे यांच्या घरी जतन करून ठेवण्यात आले आहे. ही खुर्ची तालुक्यात सातत्याने समानतेची प्रेरणा देते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २० मे १९४१ रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी मुरबाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे राहणारे अनंत धोंडू भराडे यांच्या कुटुंबीयांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा गोविंद बाळू थोरात यांच्याही अंगणात ते आले होते. भाऊराव कृष्णराव तथा दादासाहेब गायकवाड हेदेखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

आमचे वडील अनंत भराडे यांनी वकिली केली होती. त्यामुळे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात होते. आमच्या कुटुंबांवर इतर समाजाने जेव्हा अन्याय केला त्यावेळी झालेला वाद मिटविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आमच्या घरी आले होते. त्यांनी याच खुर्चीवर बसून न्यायनिवाडा केला होता. - कौशिक अनंत भराडे, मुरबाड.

१९ मे १९४१ रोजी फौजदारांची, गायकरांची विहीर असलेल्या जागेत पाणी भरण्यावरून अनुसया दोंदे व सोनाबाई घायवट यांचा काही सवर्णांशी वाद झाला होता. हा वाद विकोपास जाऊ नये म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेबांनी मुरबाडला येऊन हा वाद मिटवला. हा इतिहास ‘माता भीमाई’ पुस्तकाचे लेखक  योगेंद्र बांगर यांनी मुरबाड इतिहास व संदर्भ या ग्रंथात संकलित केला आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर