शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डम्पिंगच्या कामाबाबतही साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 02:10 IST

शहरातील विकासकामांचा वेग पाहता डम्पिंगचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

- सदानंद नाईक, उल्हासनगरम्हारळगाव येथील राणा कम्पाउंड डम्पिंग ग्राउंडच्या पुनर्वापरासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी नऊ कोटींचा खर्च करण्यात येणार असून सव्वा वर्षात डम्पिंगची जागा पूर्वीप्रमाणे सपाट करून मिळणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मात्र, शहरातील विकासकामांचा वेग पाहता डम्पिंगचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.उल्हासनगरमध्ये रोज ५५० टनांपेक्षा अधिक कचरा निघत असून कॅम्प नं.-५, खडी खदाण येथील डम्पिंगवर कचरा टाकला जातो. मात्र, डम्पिंगला वारंवार आग लागून परिसरात धूर व दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांसह नगरसेवक व राजकीय पक्षांनी डम्पिंगला विरोध करून ते हटवण्यासाठी आंदोलने केली. मात्र, पालिकेकडे पर्यायी डम्पिंग नसल्याने ते हटवण्यास नकार दिला. महापालिका पर्यायी जागेच्या शोधात असून एमएमआरडीएच्या उसाटणे येथील जागेची मागणीही सरकारकडे केली आहे. मात्र, प्रत्येकवेळी अपयशामुळे डम्पिंगचा प्रश्न जैसे थे आहे.भविष्यात कॅम्प नं.-५, खडी खदाण येथील डम्पिंग ओव्हरफ्लो झाल्यास कचºयाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तो होऊ नये, म्हणून महापालिकेने राणा खदाण डम्पिंग ग्राउंडवरील कचºयावर प्रक्रिया करण्याची संकल्पना पुढे आणली. तीन वर्षांपूर्वी जुने राणा खदाण येथील डम्प्ािंग ओव्हरफ्लो होऊन कचरा शेजारील झोपडपट्टीवर पडून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांनी डम्पर अडवून ठिय्या आंदोलन करत कचरा टाकण्यास मनाई केली. अखेर ओव्हरफ्लो झालेले डम्पिंग बंद करून पर्याय म्हणून खडी खदाण येथील भूखंडाचा वापर सुरू केला. कचरा उचलण्यावर १६ कोटी, कचरा सपाटीकरणावर साडेतीन कोटी, डेब्रिज उचलण्यासाठी दोन कोटी यासह संरक्षक भिंत, दुर्गंधी कमी करणे, रस्ता बांधणे, स्टॅण्ड निर्माण करण्यावर पालिकेने कोट्यवधी खर्च केले.राणा खदाण येथील डम्पिंगच्या परिसरातील खुल्या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण तर काही जागांवर बेकायदा झोपडपट्ट्या उभ्या केल्या आहेत. बेकायदा उभ्या राहिलेल्या झोपडपट्टी व भूमाफियांनी घशाखाली घातलेल्या जागा ताब्यात घेतल्यास महापालिकेला मोठी जागा डम्पिंगसाठी मिळू शकते. अतिक्रमण होऊनही पालिका बघ्याची भूमिका घेत आहे.उल्हासनगर शहर म्हणजे गुंतागुंतच आहे. कुणाचा पायपोस कुणास नसल्याने शहराची बकाल अवस्था झाली आहे. विकासकामे, योजना रखडूनही त्याचे कुणाला काहीही पडलेले नाही. यामुळेच डम्पिंगच्या कामाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.साडेनऊ कोटींचा केला जाणार खर्चराणा खदाण येथील कचºयावर प्रक्रिया करून हा भूखंड सपाट करण्यासाठी कंत्राट दिले आहे. यासाठी साडेनऊ कोटी सरकारने पालिकेला दिले आहेत. दोन महिने होऊनही डम्पिंगवर कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे योजनेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. साडेनऊ कोटी खर्च करून जुने डम्पिंग पूर्वीप्रमाणे सपाट करून पालिकेला मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरdumpingकचरा