शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

एसटीच्या आर्थिक उत्पन्नात दुपटीने वाढ; दीड हजार कर्मचारी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:54 IST

मागील सात ते आठ महिन्यांपासून  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी रान उठवले असून संप सुरूच ठेवला आहे.

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर कर्मचारी वर्गाची पावले पुन्हा कामाकडे वळू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. त्यानुसार ठाणे एसटी विभागात गेल्या १० ते १२ दिवसांत तब्बल एक हजार ५२४ कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे संपकाळात दिवसाला २० ते २५ हजार कि.मी. धावणारी लालपरी आता सरासरी ६० ते ७० हजार कि.मी. धावू लागल्याने एसटीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होऊन ते ४० ते ५० लाखांच्या घरात पोहोचले आहे.

मागील सात ते आठ महिन्यांपासून  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी रान उठवले असून संप सुरूच ठेवला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांच्या पगारवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले होते, तर  २२ एप्रिलपर्यंत कामावर जाण्याची सूचना न्यायालयाच्या माध्यमातूनही करण्यात आली होती. तिचे पालन करून बडतर्फ केलेले, सेवासमाप्ती झालेले कर्मचारी एसटी सेवेत पुन्हा येण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र एसटी ठाणे विभागात दिसून येते. 

न्यायालयाच्या निर्णयानंतर सुमारे एक हजार ५२४ कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती एसटी विभागाने दिली. ठाणे एसटी विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक सर्व मिळून एकूण दोन हजार ७५८ कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत एक हजार ५२४ कर्मचारी हजर होते. यामध्ये ३१९ चालक, ३५८ वाहक, चालक कम वाहक ६७८, कार्यालयीन कर्मचारी ६ आणि कार्यशाळेतील ६३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संपकाळात ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. कर्मचारी कामावर परतल्याने बसफेऱ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. बसफेऱ्या वाढल्याने ४० ते ५० लाखांचे उत्पन्न ठाणे विभागाला मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

रस्त्यावर धावत आहेत ४४६ बस 

ठाणे विभागीय क्षेत्रात ५१८ एसटी बसची संख्या आहे. त्यापैकी सध्याच्या घडीला ४४६ बस रस्त्यावर धावत आहेत. त्यात संपाच्या काळात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता, दिवसभरात केवळ २० ते २५ हजार कि.मी. बसचा प्रवास होत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तो वाढून एक लाख ३१ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे उत्पन्नातही भर पडली आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपthaneठाणे