शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

एसटीच्या आर्थिक उत्पन्नात दुपटीने वाढ; दीड हजार कर्मचारी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:54 IST

मागील सात ते आठ महिन्यांपासून  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी रान उठवले असून संप सुरूच ठेवला आहे.

ठाणे : एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर कर्मचारी वर्गाची पावले पुन्हा कामाकडे वळू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. त्यानुसार ठाणे एसटी विभागात गेल्या १० ते १२ दिवसांत तब्बल एक हजार ५२४ कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे संपकाळात दिवसाला २० ते २५ हजार कि.मी. धावणारी लालपरी आता सरासरी ६० ते ७० हजार कि.मी. धावू लागल्याने एसटीच्या उत्पन्नात दुपटीने वाढ होऊन ते ४० ते ५० लाखांच्या घरात पोहोचले आहे.

मागील सात ते आठ महिन्यांपासून  एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी रान उठवले असून संप सुरूच ठेवला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दाहकता लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांच्या पगारवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन अनेक कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले होते, तर  २२ एप्रिलपर्यंत कामावर जाण्याची सूचना न्यायालयाच्या माध्यमातूनही करण्यात आली होती. तिचे पालन करून बडतर्फ केलेले, सेवासमाप्ती झालेले कर्मचारी एसटी सेवेत पुन्हा येण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र एसटी ठाणे विभागात दिसून येते. 

न्यायालयाच्या निर्णयानंतर सुमारे एक हजार ५२४ कर्मचारी कामावर हजर झाले असल्याची माहिती एसटी विभागाने दिली. ठाणे एसटी विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक सर्व मिळून एकूण दोन हजार ७५८ कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत एक हजार ५२४ कर्मचारी हजर होते. यामध्ये ३१९ चालक, ३५८ वाहक, चालक कम वाहक ६७८, कार्यालयीन कर्मचारी ६ आणि कार्यशाळेतील ६३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

संपकाळात ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. कर्मचारी कामावर परतल्याने बसफेऱ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. बसफेऱ्या वाढल्याने ४० ते ५० लाखांचे उत्पन्न ठाणे विभागाला मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

रस्त्यावर धावत आहेत ४४६ बस 

ठाणे विभागीय क्षेत्रात ५१८ एसटी बसची संख्या आहे. त्यापैकी सध्याच्या घडीला ४४६ बस रस्त्यावर धावत आहेत. त्यात संपाच्या काळात कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करता, दिवसभरात केवळ २० ते २५ हजार कि.मी. बसचा प्रवास होत होता. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तो वाढून एक लाख ३१ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे उत्पन्नातही भर पडली आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपthaneठाणे