शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

ठाण्यात यंदा दुप्पट पाऊस, ५० वृक्षांचाही बळी :  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 04:23 IST

सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे.

ठाणे - सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे. मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत १३८९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र १० जुलैलाच २१५०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १० दिवसांत पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये पाणी तुंबण्याच्या ६९ तक्रारींचा समावेश आहे. ४९ वृक्ष उन्मळून पडले असून आगीच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या.ठाण्यात मागील दोन वर्षांत प्रथमच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील चार दिवस तर पावसाने शहरात धुवाधार बॅटिंग करून सर्वांची त्रेधातिरपीट उडवली. ठाण्यात २०१६ या वर्षात जून ते आॅक्टोबर या कालावधीत ३३९०.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, २०१७ मध्ये शहरात याच कालावधीत ३६४० मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र त्याने दमदार हजेरी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला. यंदा जून महिन्यात शहरात १०९९.८० मिमी पाऊस पडला. जुलै १० पर्यंत तो २१५०.६० मिमी एवढा झाला आहे. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत एकूण पडलेल्या पावसाचा विचार करता आताच पावसाने मागील १५ दिवसांत अर्ध्याहून अधिक कोटा पूर्ण केला आहे. तर, २०१६ मध्ये जुलै महिन्यात १३८९.५० मिमी पाऊस झाला होता. २०१७ मध्ये याच कालावधीत १०६४ मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र याच कालावधीत २१५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत शहरात दुप्पट पाऊस पडला. मागील चार दिवसांची नोंद पाहता ७ जुलै रोजी १४०.०३ मिमी, ८ तारखेला १८२.३७ मिमी, ९ जुलै रोजी १८६.२० मिमी आणि १० जुलै रोजी १५१.२७ मिमी पाऊस ठाण्यात बरसला आहे. या चार दिवसांच्या पावसानेसुद्धा मागील दोन वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक केले.दरम्यान, यंदा पावसाळ्याच्या काळात पाणी तुंबण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला १ ते १० जुलै या कालावधीत ६९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत ४९ वृक्ष उन्मळून पडले. १९ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या. १९ आगीच्या घटना, २५ तक्रारी या वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याच्या आल्या आहेत. १३ ठिकाणी संरक्षक भिंती, तर चार ठिकाणी नाल्याच्या भिंती पडून नुकसान झाले आहे. दोन ठिकाणी घरे पडल्याची घटना घडली आहे. या तक्रारींसह इतर मिळून १ ते १० जुलै या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला तब्बल ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.अंबरनाथ : गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरण ५८ टक्के भरले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणात पाच टक्के कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी १२ जुलै रोजी बारवी धरण ६२ टक्के भरले होते. दि. १० जुलै रोजी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८४ मिमी एवढा पाऊस झाला. पावसाने उशिरा हजेरी लावल्याने बारवी धरण अपेक्षेपेक्षा कमी भरले आहे. गेल्या सात दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका वाढला आहे. पाणीसाठ्यात अवघ्या एका आठवड्यात तब्बल १६ टक्के वाढ झाली. गतवर्षी १२ जुलैपर्यंत बारवी धरण क्षेत्रात ९७२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत एक हजार २७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी धरणाची पातळी ६३.३२ मीटर होती. यंदा ती ६२.५९ मीटर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आॅगस्टमध्येच धरण भरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे