शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

ठाण्यात यंदा दुप्पट पाऊस, ५० वृक्षांचाही बळी :  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 04:23 IST

सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे.

ठाणे - सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे. मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत १३८९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र १० जुलैलाच २१५०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १० दिवसांत पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये पाणी तुंबण्याच्या ६९ तक्रारींचा समावेश आहे. ४९ वृक्ष उन्मळून पडले असून आगीच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या.ठाण्यात मागील दोन वर्षांत प्रथमच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील चार दिवस तर पावसाने शहरात धुवाधार बॅटिंग करून सर्वांची त्रेधातिरपीट उडवली. ठाण्यात २०१६ या वर्षात जून ते आॅक्टोबर या कालावधीत ३३९०.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, २०१७ मध्ये शहरात याच कालावधीत ३६४० मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र त्याने दमदार हजेरी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला. यंदा जून महिन्यात शहरात १०९९.८० मिमी पाऊस पडला. जुलै १० पर्यंत तो २१५०.६० मिमी एवढा झाला आहे. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत एकूण पडलेल्या पावसाचा विचार करता आताच पावसाने मागील १५ दिवसांत अर्ध्याहून अधिक कोटा पूर्ण केला आहे. तर, २०१६ मध्ये जुलै महिन्यात १३८९.५० मिमी पाऊस झाला होता. २०१७ मध्ये याच कालावधीत १०६४ मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र याच कालावधीत २१५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत शहरात दुप्पट पाऊस पडला. मागील चार दिवसांची नोंद पाहता ७ जुलै रोजी १४०.०३ मिमी, ८ तारखेला १८२.३७ मिमी, ९ जुलै रोजी १८६.२० मिमी आणि १० जुलै रोजी १५१.२७ मिमी पाऊस ठाण्यात बरसला आहे. या चार दिवसांच्या पावसानेसुद्धा मागील दोन वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक केले.दरम्यान, यंदा पावसाळ्याच्या काळात पाणी तुंबण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला १ ते १० जुलै या कालावधीत ६९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत ४९ वृक्ष उन्मळून पडले. १९ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या. १९ आगीच्या घटना, २५ तक्रारी या वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याच्या आल्या आहेत. १३ ठिकाणी संरक्षक भिंती, तर चार ठिकाणी नाल्याच्या भिंती पडून नुकसान झाले आहे. दोन ठिकाणी घरे पडल्याची घटना घडली आहे. या तक्रारींसह इतर मिळून १ ते १० जुलै या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला तब्बल ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.अंबरनाथ : गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरण ५८ टक्के भरले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणात पाच टक्के कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी १२ जुलै रोजी बारवी धरण ६२ टक्के भरले होते. दि. १० जुलै रोजी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८४ मिमी एवढा पाऊस झाला. पावसाने उशिरा हजेरी लावल्याने बारवी धरण अपेक्षेपेक्षा कमी भरले आहे. गेल्या सात दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका वाढला आहे. पाणीसाठ्यात अवघ्या एका आठवड्यात तब्बल १६ टक्के वाढ झाली. गतवर्षी १२ जुलैपर्यंत बारवी धरण क्षेत्रात ९७२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत एक हजार २७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी धरणाची पातळी ६३.३२ मीटर होती. यंदा ती ६२.५९ मीटर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आॅगस्टमध्येच धरण भरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे