शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात यंदा दुप्पट पाऊस, ५० वृक्षांचाही बळी :  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 04:23 IST

सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे.

ठाणे - सलग चार दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर बुधवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. परंतु, मागील १५ दिवसांत त्याने दमदार हजेरी लावून दोन महिन्यांचा कोटा आधीच भरून काढला आहे. मागील वर्षी जुलैअखेरपर्यंत १३८९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र १० जुलैलाच २१५०.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील १० दिवसांत पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये पाणी तुंबण्याच्या ६९ तक्रारींचा समावेश आहे. ४९ वृक्ष उन्मळून पडले असून आगीच्या १९ तक्रारी प्राप्त झाल्या.ठाण्यात मागील दोन वर्षांत प्रथमच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील चार दिवस तर पावसाने शहरात धुवाधार बॅटिंग करून सर्वांची त्रेधातिरपीट उडवली. ठाण्यात २०१६ या वर्षात जून ते आॅक्टोबर या कालावधीत ३३९०.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, २०१७ मध्ये शहरात याच कालावधीत ३६४० मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र त्याने दमदार हजेरी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला. यंदा जून महिन्यात शहरात १०९९.८० मिमी पाऊस पडला. जुलै १० पर्यंत तो २१५०.६० मिमी एवढा झाला आहे. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांत एकूण पडलेल्या पावसाचा विचार करता आताच पावसाने मागील १५ दिवसांत अर्ध्याहून अधिक कोटा पूर्ण केला आहे. तर, २०१६ मध्ये जुलै महिन्यात १३८९.५० मिमी पाऊस झाला होता. २०१७ मध्ये याच कालावधीत १०६४ मिमी पावसाची नोंद झाली होती. परंतु, यंदा मात्र याच कालावधीत २१५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत शहरात दुप्पट पाऊस पडला. मागील चार दिवसांची नोंद पाहता ७ जुलै रोजी १४०.०३ मिमी, ८ तारखेला १८२.३७ मिमी, ९ जुलै रोजी १८६.२० मिमी आणि १० जुलै रोजी १५१.२७ मिमी पाऊस ठाण्यात बरसला आहे. या चार दिवसांच्या पावसानेसुद्धा मागील दोन वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक केले.दरम्यान, यंदा पावसाळ्याच्या काळात पाणी तुंबण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला १ ते १० जुलै या कालावधीत ६९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याच कालावधीत ४९ वृक्ष उन्मळून पडले. १९ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्या. १९ आगीच्या घटना, २५ तक्रारी या वृक्ष धोकादायक स्थितीत असल्याच्या आल्या आहेत. १३ ठिकाणी संरक्षक भिंती, तर चार ठिकाणी नाल्याच्या भिंती पडून नुकसान झाले आहे. दोन ठिकाणी घरे पडल्याची घटना घडली आहे. या तक्रारींसह इतर मिळून १ ते १० जुलै या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाला तब्बल ३२५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.अंबरनाथ : गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बारवी धरण ५८ टक्के भरले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणात पाच टक्के कमी पाणीसाठा आहे. गतवर्षी १२ जुलै रोजी बारवी धरण ६२ टक्के भरले होते. दि. १० जुलै रोजी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८४ मिमी एवढा पाऊस झाला. पावसाने उशिरा हजेरी लावल्याने बारवी धरण अपेक्षेपेक्षा कमी भरले आहे. गेल्या सात दिवसांत झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा ४२ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका वाढला आहे. पाणीसाठ्यात अवघ्या एका आठवड्यात तब्बल १६ टक्के वाढ झाली. गतवर्षी १२ जुलैपर्यंत बारवी धरण क्षेत्रात ९७२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा आतापर्यंत एक हजार २७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी धरणाची पातळी ६३.३२ मीटर होती. यंदा ती ६२.५९ मीटर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास आॅगस्टमध्येच धरण भरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे