शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कोरोनाला हलक्यात नका घेऊ; ५४ दिवसात ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 17:21 IST

एकीकडे स्वाईन फ्लु वाढत असतांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे.

ठाणे

एकीकडे स्वाईन फ्लु वाढत असतांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाही कमी झाला असे वाटत असतांना मागील ५४ दिवसात कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी नागरीकांच्या तोडांवरील मास्क गायब झाले आहेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढलेली असल्याचे दिसत आहे. मात्र काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मागील ५४ दिवसात जिल्ह्यात २३ हजार ३९५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला बघता बघता हाताच्या बोटावर मोजण्या इतके रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचली होती. तर, आजार नवीन असल्याने सुरुवातील त्यावर उपचार पद्धती माहित नसल्यामुळे डॉक्टरांना देखील उपचार करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. असे असताना, देखील या जराशी डॉक्टर व इतर कर्मचारी अहोरात्र लढा देत होते. तसेच या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी देखील करण्यात आल्याने, या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात आखी अंशी यश आले होते. त्यात मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील १०० च्या आत आली असून मृत्यूची संख्या देखील शून्यावर  आली आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून तोंडावरचा मास्क देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तर, मागील ५४ दिवसात ३० जणांचे कोरोनाने बळी घेतले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना अजून गेले नसून त्याला हलक्यात घेवू नका असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०० च्या आत आला असून मृत्यू देखील शून्यावर आले आहे. असे असले तरी, १ जून २०२२ ते २४ जुलै २०२२ या ५४ दिवसाच्या कालावधीत ५ लाख ८८ हजार ३२२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये २३ हजार ३९५ बाधित रुग्ण आढळून आले. तर,५ लाख ६३ हजार ८६१ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. असे असले तर, या आजाराने ३० जणांचा  मृत्यू झाल्याची  नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे