शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कोरोनाला हलक्यात नका घेऊ; ५४ दिवसात ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 17:21 IST

एकीकडे स्वाईन फ्लु वाढत असतांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे.

ठाणे

एकीकडे स्वाईन फ्लु वाढत असतांना तोंडाला मास्क लावण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाही कमी झाला असे वाटत असतांना मागील ५४ दिवसात कोरोनामुळे ३० जणांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी नागरीकांच्या तोडांवरील मास्क गायब झाले आहेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढलेली असल्याचे दिसत आहे. मात्र काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मागील ५४ दिवसात जिल्ह्यात २३ हजार ३९५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला बघता बघता हाताच्या बोटावर मोजण्या इतके रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचली होती. तर, आजार नवीन असल्याने सुरुवातील त्यावर उपचार पद्धती माहित नसल्यामुळे डॉक्टरांना देखील उपचार करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. असे असताना, देखील या जराशी डॉक्टर व इतर कर्मचारी अहोरात्र लढा देत होते. तसेच या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी देखील करण्यात आल्याने, या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यात आखी अंशी यश आले होते. त्यात मागील काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील १०० च्या आत आली असून मृत्यूची संख्या देखील शून्यावर  आली आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून तोंडावरचा मास्क देखील गायब झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तर, मागील ५४ दिवसात ३० जणांचे कोरोनाने बळी घेतले असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना अजून गेले नसून त्याला हलक्यात घेवू नका असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १०० च्या आत आला असून मृत्यू देखील शून्यावर आले आहे. असे असले तरी, १ जून २०२२ ते २४ जुलै २०२२ या ५४ दिवसाच्या कालावधीत ५ लाख ८८ हजार ३२२ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये २३ हजार ३९५ बाधित रुग्ण आढळून आले. तर,५ लाख ६३ हजार ८६१ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. असे असले तर, या आजाराने ३० जणांचा  मृत्यू झाल्याची  नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे