शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

अन्यायकारक वाहतू बदल ठाणेकरांच्या माथी मारू नका, मनसेचा वाहतूक पोलीस विभागाला इशारा  

By अजित मांडके | Updated: April 27, 2023 19:00 IST

केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे.

ठाणे : रस्ते दुरुस्तीसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक बदल केले जात आहेत. तसेच शहरातील काही ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्तेच बंद करण्यात आले आहेत. परंतु वाहतूक बदलाच्या या मनमानी मुद्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे. यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. परंतु तसे न झाल्यास या अन्याया विरोधात व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी मुंब्रा बायपास बंद करण्यात आला. त्यानंतर ही दुरुस्ती होत असतांना, साकेत आणि खारेगाव पुलावरील एक मार्गिका टप्याटप्याने दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे माजिवडा ते घोडबंदर पर्यंत आणि मुंबईवरुन येतांना नितिन कंपनीच्या बाजूपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे ठाणेकर वैतागला आहे. तसेच शहराच्या इतर भागात देखील रस्ते दुरुस्तीची कामे एकाच वेळेस हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे देखील शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आता ठाणे शहरातील जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथील नवीन सब वे व भास्कर कट ते नवीन कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरुवातीस खोदकाम करून डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पयार्यी मागार्ने वळविण्यास सुरवात झाली आहे. २६ एप्रिल ते २१ मे पर्यंत हे काम होणार असल्याने येथील वाहतूकीत देखील बदल करण्यात आला आहे.परंतु एकाच वेळेस अशा पध्दतीने शहरातील विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने वाहतूकीत बदल केले जात असतांना ठाणेकरांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

वाहतूक बदल करीत असतांना काही ठराविक आपल्याला अनुकुल असलेले नागरीक बैठकीला बोलावून वाहतूक बदल केले जात आहेत. परंतु ते सर्वसामान्यपर्यंत पोहचत नसल्याचे मनसेचे म्हणने आहे. त्यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठकीचे आयोजन करावे, त्या ठिकाणी सर्वांची मते घ्यावीत त्यानंतरच वाहतूक बदल करावेत अशी सुचना मनसेने केली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नयेत असा इशाराही मनसेने दिला आहे. त्यामुळे वाहतूक बदलाची नव्याने बैठक घेऊन त्यानंतरच वाहतूक बदल करावेत, अन्यथा व्यापक आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तांना दिले आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाthaneठाणे