शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

अन्यायकारक वाहतू बदल ठाणेकरांच्या माथी मारू नका, मनसेचा वाहतूक पोलीस विभागाला इशारा  

By अजित मांडके | Updated: April 27, 2023 19:00 IST

केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे.

ठाणे : रस्ते दुरुस्तीसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक बदल केले जात आहेत. तसेच शहरातील काही ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्तेच बंद करण्यात आले आहेत. परंतु वाहतूक बदलाच्या या मनमानी मुद्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नका असा इशारा मनसेने दिला आहे. यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. परंतु तसे न झाल्यास या अन्याया विरोधात व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही मनसेचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी मुंब्रा बायपास बंद करण्यात आला. त्यानंतर ही दुरुस्ती होत असतांना, साकेत आणि खारेगाव पुलावरील एक मार्गिका टप्याटप्याने दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली. त्यामुळे माजिवडा ते घोडबंदर पर्यंत आणि मुंबईवरुन येतांना नितिन कंपनीच्या बाजूपर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे ठाणेकर वैतागला आहे. तसेच शहराच्या इतर भागात देखील रस्ते दुरुस्तीची कामे एकाच वेळेस हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे देखील शहराच्या विविध भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आता ठाणे शहरातील जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथील नवीन सब वे व भास्कर कट ते नवीन कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरुवातीस खोदकाम करून डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पयार्यी मागार्ने वळविण्यास सुरवात झाली आहे. २६ एप्रिल ते २१ मे पर्यंत हे काम होणार असल्याने येथील वाहतूकीत देखील बदल करण्यात आला आहे.परंतु एकाच वेळेस अशा पध्दतीने शहरातील विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने वाहतूकीत बदल केले जात असतांना ठाणेकरांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

वाहतूक बदल करीत असतांना काही ठराविक आपल्याला अनुकुल असलेले नागरीक बैठकीला बोलावून वाहतूक बदल केले जात आहेत. परंतु ते सर्वसामान्यपर्यंत पोहचत नसल्याचे मनसेचे म्हणने आहे. त्यामुळे वाहतूक बदल करण्यापूर्वी गडकरी रंगायतन येथे बैठकीचे आयोजन करावे, त्या ठिकाणी सर्वांची मते घ्यावीत त्यानंतरच वाहतूक बदल करावेत अशी सुचना मनसेने केली आहे. केवळ उपचार म्हणून बैठक घेऊन अन्यायकारक वाहतूक बदल ठाणेकरांच्या माथी मारु नयेत असा इशाराही मनसेने दिला आहे. त्यामुळे वाहतूक बदलाची नव्याने बैठक घेऊन त्यानंतरच वाहतूक बदल करावेत, अन्यथा व्यापक आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्तांना दिले आहे. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाthaneठाणे