शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दहा वर्षांमध्ये ३० लाखांची पुस्तके केली दान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 00:56 IST

वाचनसंस्कृती जपण्यासाठी कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक प्रतिष्ठान आणि डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी संस्था अविरत झटत आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : वाचनसंस्कृती जपण्यासाठी कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक प्रतिष्ठान आणि डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी संस्था अविरत झटत आहे. या संस्थांच्या माध्यमातून दहा वर्षांत तब्बल ३० लाखांची पुस्तके विविध संस्थांना भेट देण्यात आली आहेत. वाचनाचे प्रमाण कमी झाल्याने ग्रंथालयांचा आर्थिक डोलारा डगमगू लागला आहे. महापुराचा फटका बसलेल्या सांगली जिल्हा नगर वाचनालयाला १२५ पुस्तके भेट देत मदतीचा हात पुढे केला आहे.सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यावर्षी आलेल्या महापुरामध्ये या वाचनालयाचे अतोनात नुकसान झाले. अनेक पुस्तके महापुरात वाहून गेली. त्यात दुर्मीळ ग्रंथांचे मोठे नुकसान झाले. या वाचनालयाला मदतीचा हात पुढे करून अक्षरमंच आणि आनंद कल्याणकारी संस्थेने खारीचा वाटा उचलला आहे. कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह आणि इतर विविध विषयांवरील १२५ पुस्तके या ग्रंथालयाला भेट देण्यात आली.सांगली नगर वाचनालय व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. योगेश जोशी, उपाध्यक्ष जयंत भावे, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहेते, पदाधिकारी बाळासाहेब तोरसकर वाचनालयात गेले होते. यावेळी कार्यवाह अतुल गिजरे, सहकार्यवाह सुहास करंदीकर यांच्याकडे पुस्तके प्रदान केली. संस्थेच्या या उपक्रमाचे समन्वयक जयंत भावे यांनी वाचनालयास आणखी पुस्तके व विश्वकोश खंड लवकरच भेट देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.दोन्ही संस्थांनी दहा वर्षांत ४०० हून अधिक शाळा, ग्रंथालये, आश्रमशाळा, अनाथालयांमध्ये ३० लाखांची ५० हजारांहून अधिक पुस्तके भेट दिली आहेत. तसेच सांगली नगर वाचनालयाला दिलेल्या पुस्तकांमध्ये ऐतिहासिक आणि भौगोलिक पुस्तकांचा समावेश आहे. संस्थांतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात, त्यातही पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट दिली जातात. गेल्या वर्षी संस्थांतर्फे कल्याण-डोंबिवली परिसरात ११ हजार १११ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यात १७५ शाळांचा समावेश होता. दिवाळीमध्ये वृद्धाश्रमांना पुस्तके आणि काही ठिकाणी दिवाळी अंक देण्यात आले. भुसावळ येथे पाच हजार पुस्तके भेट देण्यात आली.पुस्तके दान केल्यास ग्रंथालये जगतील!संस्थेतर्फे पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. त्यावेळी कधी काही लेखक संस्थेला पुस्तके देतात, काही नागरिक ती आणतात. कोणी पैसेही देते. त्याची संस्थेकडून पावती दिली जाते, असे हेमंत नेहते यांनी सांगितले. मंदिरात अनेक जण पैसे दान करतात. पण या पैशांचा उपयोग पुस्तके भेट देण्यासाठी झाला तर ग्रंथालये जगतील आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे नेहते म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली