शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज ठाकरेंसह डोंबिवलीकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कलेक्टर लँडवरील मालमत्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:15 IST

शहरातील कलेक्टर जमिनीवरील इमारतींच्या पुर्नवसनासंदर्भात असंख्य अडचणी येत असून त्याचा त्रास सर्वसामान्य रहिवाश्यांना होत आहे. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आदी पसिरातील शेकडो इमारतींमधील रहिवाश्यांपुढे गुंतागुंतीच्या नियमांमुळे टांगती तलवार असून राहत्या घरांचा प्रश्न जटील झाला आहे

डोंबिवली - शहरातील कलेक्टर जमिनीवरील इमारतींच्या पुर्नवसनासंदर्भात असंख्य अडचणी येत असून त्याचा त्रास सर्वसामान्य रहिवाश्यांना होत आहे. डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आदी पसिरातील शेकडो इमारतींमधील रहिवाश्यांपुढे गुंतागुंतीच्या नियमांमुळे टांगती तलवार असून राहत्या घरांचा प्रश्न जटील झाला आहे. अशा प्रकरणांमधील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना दिले. तसेच शर्तभंग आणि नजराणा याबाबत सवलत देण्यासंदर्भात राज्याचे मुख्य महसुल सचिव मनु श्रीवात्सव यांच्याशीही चर्चा केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली दौ-यात नागरिकांशी चर्चा केली होती. त्यात कलेक्टर लँडवरील इमारतींच्या समस्या, तसेच स्टार्टअप इंडिया या केंद्राच्या उपक्रमात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मागे आहे. ठाणे जिल्ह्यातील युवकांमध्ये टॅलेंट असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाहीत असे ठाकरेंच्या नीदर्शनास आले होते. त्यानूसार ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर गुरुवारी डोंबिवलीकरांसमवेत भेट घेतली.

त्या भेटीदरम्यान डोंबिवली पूर्वेच्या हनुमान सोसायटीचे सचिव अनंत ओक यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कलेक्टर लँडसंदर्भातील पुर्नवसनाच्या अडचणींचा पाढा वाचला. ते म्हणाले की, जेव्हा अशा इमारतींच्या पुर्नवसनाचा प्रश्न येतो तेव्हा आधीच्या बांधकामांना कलेक्टरची परवानगी नसल्याने आता नव्या कामाला परवानगी देता येत नाही. पण १९६५ त्यानंतर इमारती बांधण्यात आल्या तेव्हा ग्रामपंचायत काही वर्षांनी नगरपरिषद आदींच्या परवानग्या असल्याचे कागदपत्र आहेत. आणि जर कलेक्टरची परवानगी हवी होती तर ती तेव्हाच का नाही मागवली? आता तर जमिन, घर हस्तांतरणामध्येही अडचणी येत आहेत. शहारतील सुमारे ४० सोसायट्यांची ७/१२ वरुन नावे काढण्यात आली, खरेदीखत सोसायटीच्या नावे असतांना ७/१२ वरुन नाव कसे काय काढता येते, तसा कुठला कायदा आहे का? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. अशा जमिनींची प्रकरणे २००२ पासून प्रलंबित आहे, कलेक्टरने अशी प्रकरणे किती दिवसात निकाली काढायची असतात? त्याची काही नियमावली आहे की नाही. तेव्हाची प्रकरणे निकाली निघाली नाहीतच पण तरीही त्या प्रलंबित दाव्यांनाही २०१७ च्या रेडीरेकनरप्रमाणे दंड का लावण्यात येतो? वास्तूविशारद शिरिष नाचणे देखिल उपस्थित होते त्यांनीही कायद्यात कोणकोणत्या तरतूदी आहेत यासंदर्भात चर्चा केली. पण तरीही मनमानी कारभार असल्याचे नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या नीदर्शनास आणले.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला. अशा जमिनींच्या प्रकरणांबाबत ज्या अडचणी आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना तीन दिवसांनी चर्चेला येण्याचे आदेश दिले. १९ प्रकरणांपैकी ९ निकाली निघाली असून १० प्रकरणांवर कार्यवाही सुरु असल्याचे स्पषटीकरण कल्याणकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. तसेच नजराणा आणि शर्तभंग प्रकरणांसंदर्भात कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना दिलासा द्यावा, सवलत द्यावी यासाठी राज्याचे महसुल मुख्य सचिव मनु श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केल्याचे ओक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

या बैठकीदरम्यान कुणाल गडहिरे, श्रद्धा पाटील यांनीही स्टार्टअप इंडिया या केंद्राच्या उपक्रमामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात त्यासंदर्भात युवकांमध्ये अल्प प्रमाणात जनजागृति केली जात आहे. राज्य शासनाने त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. आयटी क्षेत्रात युवकांना भरपूर वाव आहे, पण कल्याण-डोंबिवलीतील असंख्य युवक त्या सुविधांपासून वंचित आहेत. त्यावर फडणवीस यांनी स्टार्टअप इंडियामध्ये राज्यासाठी विशेष धोरण कसे आखता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्थ केले. त्या शिष्ठमंडळात मनसेचे नेते बाळा नांदगावकर, शिरिष सावंत, सरचिटणीस राजू पाटील, शहराध्यक्ष मनोज घरत, राजन मराठेंसह अन्य नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस