शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

डोंबिवलीत शेअर रिक्षांचा लांबचा प्रवास महागल्याने प्रवाशांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:27 IST

भाड्यात ८ ते १५ रुपयांची वाढ : आरटीओ अधिकाऱ्यांना प्रवासी, रिक्षाचालकांचा घेराव, रिक्षाभाड्याचे दरपत्रक लावले

डोंबिवली : शहरातील लालबावटा रिक्षा युनियनने आरटीओची परवानगी नसतानाही शेअर रिक्षा भाडेवाढीचा फलक लावून त्यानुसार भाडेआकारणी सुरू केली होती. याबाबत रिक्षाचालकांवर कारवाई होत नसल्याची टीका प्रवाशांनी केल्याने अखेर सोमवारी सायंकाळी आरटीओ अधिकाऱ्यांनी २०१५ च्या महागाई निर्देशांकानुसार शेअर रिक्षाभाडे आकारणीचे दरपत्रक लावले आहे. त्यानुसार, शेअर रिक्षाचे जवळच्या अंतराचे भाडे आठ रुपये कायम राहिले आहे. मात्र, लांबचा प्रवास हा ८ ते १५ रुपयांपर्यंत महागला आहे. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. दुसरीकडे इंदिरा गांधी चौकात प्रवासी व रिक्षाचालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना घेराव घालत हे दरपत्रक पेट्रोलचे की सीएनजी रिक्षांचे, हे आधी स्पष्ट करा, अशी मागणी केली.

भाडेवाढ करणे, अथवा सुधारित दरपत्रक लावण्याचा अधिकार आरटीओला आहे. मात्र, त्याआधीच रिक्षा युनियनने भाडेदरवाढीचे फलक लावल्यानेही प्रवाशांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे आरटीओने लालबावटा रिक्षा युनियनच्या पदाधिकाºयांना नोटीस बजावली होती. तसेच वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाºयांच्या दालनात पंधरवड्यापूर्वी बैठक झाली होती. त्यावेळी आरटीओ रिक्षाभाड्याचे फलक लावेल, असे ठरले होते. मात्र, तोपर्यंत युनियनने फलक काढावेत, अशी सूचना त्यांना केली होती. प्रत्यक्षात युनियनचे फलक काढलेले नव्हते. त्यामुळे आरटीओची नोटीस ही वरवरची कारवाई असल्याची चर्चा होती.

आरटीओने सोमवारी रात्री इंदिरा गांधी चौक आणि रामनगर येथे दरपत्रकांचे फलक लावले. सूत्रांच्या माहितीनुसार १९ फलक लावले जाणार आहेत. हकीम खटाव समितीच्या महागाई निर्देशांकानुसार हे दरपत्रक २०१५ मध्ये आरटीओने तयार केले होते. मात्र, त्याची या ठिकाणी अंमलबजावणी झालेली नव्हती, ती आता होत असल्याने आमची मागणी पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी दिली.प्रवाशांना नाहक भुर्दंडडोंबिवली रेल्वेस्थानक ते लोढा परिसरात जाण्यासाठी सध्या शेअर रिक्षाचे भाडे २५ रुपये होते. ते आता ४० रुपये झाले आहे. डोंबिवली स्थानकाहून पत्रीपुलासाठी २४ रुपये द्यावे लागत होते, ते आता ३२ रुपये द्यावे लागणार आहे. अशा पद्धतीने सुमारे १५ रुपयांपर्यंतची वाढ झाली असून त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. 

रिक्षा युनियनच्या मागणीनुसार २०१५ चे दरपत्रक सोमवारी डोंबिवलीत लावले असून ते सीएनजी रिक्षांसाठीचेच आहे. तसेच या दरपत्रकांमुळे जवळच्या प्रवासापेक्षा लांबचा प्रवास महागला आहे.- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी, कल्याणप्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. दरपत्रकांमुळे काहीही स्पष्ट होत नाही. रिक्षाचालक प्रामुख्याने अमराठी आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वादविवाद होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आरटीओने जरी फलक लावलेले असले, तरी यापुढे काही दिवस होणारा गोंधळ सोडवावा.- सागर घोणे, प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते