शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

डोंबिवलीत जनजीवन सुरळीत, शाळाही झाल्या सुरु : मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 08:58 IST

ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते.

ठळक मुद्दे पावसाने घेतली उघडीप-आकाश ढगाळलेलेच पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या अनुयायांना दिलासा गारठा कमी झाला अन् उकाडा जाणवू लागलामहावितरणचे मात्र सतर्कतेचे आदेश

डोंबिवली: ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते, शाळाही सुरु असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत दिनचर्येला सुरुवात केली.काल मध्य रेल्वेची लोकलसेवा धुक्यामुळे सकाळच्या सत्रात १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती, पण बुधवारी मात्र पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या लाखो अनुयायांना दिलासा मिळाला.महावितरणने मात्र बुधवारीही त्यांच्या कर्मचा-यांना सतर्कतेचा इशारा देत वीजपुरवठा बाधित होणार नाही, नागरिकांची गैरसोय होणार नाही यावर भर द्यावा असे आदेश दिले होते. दरम्यान, सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे डोंबिवली पश्चिमेकडील कोपररोड भागात मध्यरात्री पावणेबारा वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता, तासाभरात महावितरणच्या कर्मचा-यांनी आवश्यक ती दुरुस्ति करुन वीजपुरवठा सुरळीत केला. मंगळवारी दिवसभरात रामनगर, दत्तनगर आदी भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र सुमारे वीस मिनिटे ते अर्धा तासात पुन्हा सुरळीत झाला. दिवसभर मुख्य वीजपुरवठा केंद्रात गारठ्यामुळे स्वीच ट्रीप होण्याच्या घटना घडल्या, पण महावितरणच्या कर्मचा-यांनी सतर्कत दाखवत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत केला होता. दिवसभरात कुठेही फार वेळ वीजपुरवठा खंडीत होता अशा घटना घडल्या नाहीत. बुधवारीही पावसाची शक्यता असून रात्रंदिवस वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवणे, यासह अन्य आपात्कालीन यंत्रणेने सतर्क रहावे असे आदेश देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. दिक्कड यांनी दिली. बाजीप्रभु चौकातील मेन फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, पण तात्काळ दुस-या फिडरमध्ये लाइनमध्ये वीजपुरवठा सुरु करण्यात आला. महािवतरणचा वीजपुवठा खंडीत झाल्याने रामनगर, बाजीप्रभु चौक, भगतसिंग रोड आदी ठिकाणी इंटरनेट सुविधेत अडथळे आले होते. त्यामुळे दिवसभर काही ग्राहकांना इंटरनेट सुविधा सुरळीतपणे मिळू न शकल्याने नाराजी व्यक्त झाली होती, बुधवारी सकाळपासून ती सेवाही सुरळीत असल्याने ग्राहकांना दिलासा होता. मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीच्या कमी अधिक पावसात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती अग्नीशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली होती. बुधवारी सकाळी पावसाने उघडीप घेतली असली तरी महापालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेलाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणbadlapurबदलापूरthakurliठाकुर्ली