शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत जनजीवन सुरळीत, शाळाही झाल्या सुरु : मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 08:58 IST

ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते.

ठळक मुद्दे पावसाने घेतली उघडीप-आकाश ढगाळलेलेच पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या अनुयायांना दिलासा गारठा कमी झाला अन् उकाडा जाणवू लागलामहावितरणचे मात्र सतर्कतेचे आदेश

डोंबिवली: ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा पसरला होता. मात्र बुवधारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप घेतली होती, हवामानातही गारवा कमी झाला होता, आणि उकडायला सुरुवात झाली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जनजीवन सुरळीत होते, शाळाही सुरु असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडत दिनचर्येला सुरुवात केली.काल मध्य रेल्वेची लोकलसेवा धुक्यामुळे सकाळच्या सत्रात १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होती, पण बुधवारी मात्र पहाटेपासूनच रेल्वे रुळावर असल्याने चाकरमान्यांसह चैत्यभूमीवर जाणा-या लाखो अनुयायांना दिलासा मिळाला.महावितरणने मात्र बुधवारीही त्यांच्या कर्मचा-यांना सतर्कतेचा इशारा देत वीजपुरवठा बाधित होणार नाही, नागरिकांची गैरसोय होणार नाही यावर भर द्यावा असे आदेश दिले होते. दरम्यान, सोमवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे डोंबिवली पश्चिमेकडील कोपररोड भागात मध्यरात्री पावणेबारा वाजता वीजपुरवठा खंडीत झाला होता, तासाभरात महावितरणच्या कर्मचा-यांनी आवश्यक ती दुरुस्ति करुन वीजपुरवठा सुरळीत केला. मंगळवारी दिवसभरात रामनगर, दत्तनगर आदी भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र सुमारे वीस मिनिटे ते अर्धा तासात पुन्हा सुरळीत झाला. दिवसभर मुख्य वीजपुरवठा केंद्रात गारठ्यामुळे स्वीच ट्रीप होण्याच्या घटना घडल्या, पण महावितरणच्या कर्मचा-यांनी सतर्कत दाखवत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत केला होता. दिवसभरात कुठेही फार वेळ वीजपुरवठा खंडीत होता अशा घटना घडल्या नाहीत. बुधवारीही पावसाची शक्यता असून रात्रंदिवस वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवणे, यासह अन्य आपात्कालीन यंत्रणेने सतर्क रहावे असे आदेश देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता डी. दिक्कड यांनी दिली. बाजीप्रभु चौकातील मेन फिडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, पण तात्काळ दुस-या फिडरमध्ये लाइनमध्ये वीजपुरवठा सुरु करण्यात आला. महािवतरणचा वीजपुवठा खंडीत झाल्याने रामनगर, बाजीप्रभु चौक, भगतसिंग रोड आदी ठिकाणी इंटरनेट सुविधेत अडथळे आले होते. त्यामुळे दिवसभर काही ग्राहकांना इंटरनेट सुविधा सुरळीतपणे मिळू न शकल्याने नाराजी व्यक्त झाली होती, बुधवारी सकाळपासून ती सेवाही सुरळीत असल्याने ग्राहकांना दिलासा होता. मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीच्या कमी अधिक पावसात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती अग्नीशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली होती. बुधवारी सकाळी पावसाने उघडीप घेतली असली तरी महापालिकेच्या आपात्कालीन यंत्रणेलाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणbadlapurबदलापूरthakurliठाकुर्ली