शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

केवळ क्रिकेटपुरते आपले देशप्रेम नको - डॉ. सुभाष भामर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:48 IST

भारत-पाकिस्तानचा क्रि केट सामना सुरू असताना अनेक नागरिकांचे देशप्रेम उफाळून येते.परंतु, देश व सीमेवरील जवानांना कायम नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी भिवंडीत व्यक्त केले.

भिवंडी : भारत-पाकिस्तानचा क्रि केट सामना सुरू असताना अनेक नागरिकांचे देशप्रेम उफाळून येते.परंतु, देश व सीमेवरील जवानांना कायम नागरिकांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे मत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी भिवंडीत व्यक्त केले.तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांचे लोकार्पण राज्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी खासदार कपिल पाटील होते. याप्रसंगी माजी आमदार योगेश पाटील, पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव, सरपंच श्रीधर पाटील, जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री भामरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, देशाच्या तिन्ही टोकांवरील भौगोलिक सीमांची परिस्थिती वेगवेगळी आहे. काही ठिकाणी २० हजार फुटांचा डोंगर आहे. तर, काही ठिकाणी केवळ १०० मीटरवर पाकिस्तानची चौकी आहे. खडतर हवामानात देशाचे संरक्षण करण्यासाठी सैनिक प्राण पणाला लावतात. त्यांना देशातील नागरिकांनी पाठिंबा द्यायला हवा. केवळ भारत-पाकिस्तान क्रि केट सामन्याच्या वेळी देशप्रेम उफाळून येता कामा नये. तर, आपण देशाचे सैनिक आहोत, ही भावना ठेवून नागरिकांनी देश व सैनिकांमागे उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.काल्हेरमधील विकासकामांचा रेटा पाहून ही ग्रामपंचायत असल्याचे वाटत नाही, असे भामरे यांनी यावेळी नमूद केले. तब्बल २२ ते २५ हजार कोटींची विकासकामे मंजूर झालेला भिवंडी हा देशातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे, अशा शब्दांत भामरे यांनी खासदार पाटील यांच्या कामाकडे लक्ष वेधले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला. त्यातून प्रत्येक गावात काँक्रिटचे रस्ते तयार होणार आहेत. भिवंडीत मेट्रो रेल्वेसह सहापदरी बायपास मंजूर झाला आहे. या कामांचे श्रेय पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचे आहे. मात्र, याबाबत राजकारण केले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. राष्ट्रीय हरित लवादाने खाडीतून रेती काढण्याबाबत बंदी घातली. मात्र, त्याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होईल. त्यातून हजारो भूमिपुत्रांना दिलासा मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.काल्हेरला रणगाडा, तोफ भेटकाल्हेर ग्रामपंचायतीने उभारलेल्या उद्यानात रणगाडा बसवण्याची विनंती खासदार कपिल पाटील यांनी केली. रणगाड्याबरोबरच विकासाच्या आड येणाºया विरोधकांना उत्तर देण्यासाठी तोफ देण्याचीही विनंती खासदारांनी केली. ती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंजूर केली. त्यांनी लवकरच काल्हेर ग्रामपंचायतीला रणगाडा व तोफ भेट देणार असल्याचे जाहीर केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान