शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘त्या’ कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 23:43 IST

२७ गावांमधील कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या सेवेत कायम करा तसेच त्यांना वेतनातील फरक मिळावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती.

कल्याण : २७ गावांमधील कर्मचाऱ्यांना केडीएमसीच्या सेवेत कायम करा तसेच त्यांना वेतनातील फरक मिळावा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती. याकडे केडीएमसी प्रशासनाने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष डॉ. रेखा बहनवाल यांनी शिवाजी चौक परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.१ जून २०१५ ला केडीएमसी परिक्षेत्रात २७ गावांचा समावेश करण्यात आला. या गावांमधील ४९८ कर्मचाºयांना त्याच दिवशी महापालिकेत सामावून घेण्यात आले. ५ आॅक्टोबर २०१७ पासून केडीएमसीने या कर्मचाºयांना किमान वेतन लागू केले आहे. प्रत्यक्षात ते जानेवारी २०१८ पासून लागू झाले. १ जून २०१५ ते डिसेंबर २०१७ पर्यंतच्या २९ महिन्यांचा फरक तत्काळ द्यावा, अशी मागणी संघटनेची आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून सामावून घेतलेल्या कर्मचाºयांना कायम करावे, अशी मागणी बहनवाल यांनी आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली होती. १० डिसेंबरपर्यंत या मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही आयुक्तांना पत्राद्वारे दिला होता. आमदार नरेंद्र पवार यांच्यासह मनसेचे गटनेते प्रकाश भोईर, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे उपोषणकर्त्यांची भेट घेतली. २७ गावांमधील नगरसेवकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.‘सहानुभुतीपूर्वक विचार करा’अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने वेळोवेळी कामगारांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा केला आहे. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मान्य कराव्यात, अशा विनंतीचे पत्र केडीएमसीतील मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. येत्या काळात २७ गावे केडीएमसीतून वगळली तर त्या कर्मचाºयांना २७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये वर्ग करण्यात येईल व त्यास कर्मचारी आक्षेप घेऊ शकणार नाहीत, अशारीतीने शपथपत्र कर्मचाºयांंकडून लिहून घ्यावे, असेही पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणMuncipal Corporationनगर पालिका