शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

बचत गटांना ८ महिने झाले तरी बिल मिळेना!, जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत बाब उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:12 IST

शाळांमध्ये शालेय पोषण आहार देणाºया बचत गटांना ८ महिन्यांपासून बिलेच मिळाली नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी ठाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत समोर आली.

ठाणे : शाळांमध्ये शालेय पोषण आहार देणा-या बचत गटांना ८ महिन्यांपासून बिलेच मिळाली नसल्याची धक्कादायक बाब बुधवारी ठाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत समोर आली. या वेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे (टीडीसीसी) मनुष्यबळ कमी असल्याने बिलांना उशीर होत असल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचना करताना खासदार कपिल पाटील यांनी बचत गटांना पैसे न मिळाल्यास मुलांना आहार देता येणार नाही. अपुºया कॅलरीज मिळाल्यास मुले कुपोषित होतील. त्यामुळे अधिकाºयांनी या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश दिले.खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शालेय शिक्षण विभागाच्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या संनियंत्रणासाठी ही जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजिली होती. याप्रसंगी आमदार किसन कथोरे, आमदार ज्योती कलानी, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यातील शाळागृहांसाठी अपुरी तरतूद आहे. तर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळांना वाढीव खोल्या बांधण्याची गरज आहे. या बैठकीत हा मुद्दा स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या अधिकाºयांशी खासदारांनी संपर्कसाधला. तसेच जादा निधी मंजूर करण्याची मागणी केली.त्यावर, संबंधित प्रस्ताव पाठवण्याची सूचना अधिकाºयांनी केली असून त्यानंतर समितीच्या बैठकीत जादा निधीसाठी ठराव मंजूर केला. शाळांच्या देखभाल खर्चातही वाढ करण्याची मागणी ठरावात केली आहे. या बैठकीत स्वयंपाकींचे मानधन एक हजार रु पयावरून दोन हजार रु पये करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.अनुपस्थित पुन्हा अधिकारीठाणे नियोजन समितीच्या बैठकीपाठोपाठ या बैठकीला महापालिका व पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते. त्याची दखल घेऊन खासदार कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.महत्त्वाच्या विषयांच्या अंमलबजावणीबाबत अधिकारी गांभीर्याने कधी घेणार, असा सवाल उपस्थित केला. त्या वेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी पुढील बैठकीवेळी सर्व अधिकाºयांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.आरटीई प्रवेशासाठी मिळणार दुसरी संधीसध्या आरटीईमधून मुलांना एका शाळेच्या यादीत नाव आल्यास दुसºया शाळेत प्रवेश नाकारला जातो. किंबहुना, ती मुले आरटीईच्या प्रक्रि येतून बाद होतात. त्यामुळे या मुलांना शाळेसाठी दुसरी संधी मिळावी, यासाठी समितीच्या बैठकीत ठराव मंजूर केला. तसेच त्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले.