शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

खोडा घालू नका, अन्यथा घरावर मोर्चे काढू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:56 IST

सर्वपक्षीय युवा मोर्चाने दिला इशारा; २७ गावांच्या स्वतंत्र पालिकेच्या मागणीसाठी निदर्शने

डोंबिवली : २७ गावांची स्वतंत्र पालिका व्हावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वतंत्र नगरपालिकेच्या कार्यवाहीत खोडा घालणाऱ्यांना गुरुवारी आंदोलनाच्या माध्यमातून समज देण्यात आली. बेताल वक्तव्य करून खोडा घालण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.२७ गावांची नगरपालिका स्थापन करण्याच्या विरोधात काही नगरसेवक आणि पुढारी वक्तव्य करत असल्याचा आरोप युवा मोर्चाचा आहे. संबंधित व्यक्तींचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आंदोलनात स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावणाºयांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले जाणार होते. परंतु, दहन आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, या शक्यतेने मानपाडा पोलिसांनी सर्वपक्षीय युवा मोर्चाला नोटीस बजावली होती. त्यामुळे दहन न करता निदर्शने करण्यात आली.कल्याण-शीळ मार्गावरील स्व. भागाशेठ वझे चौक येथे सकाळी ११ वाजता झालेल्या आंदोलनात गजानन पाटील, सुधीर पाटील, संतोष केणे, गणेश म्हात्रे, रमेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, भ्रष्ट महापालिकेची हाव धरणाºयांचा धिक्कार असो, २७ गावांतील भूमिपुत्रांच्या हरकती व सूचनांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, या मजकुराचे कागदी फलकही झळकावण्यात आले होते.२७ गावांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना भ्रष्टाचार आणि भूमिपुत्रांच्या जमिनीवरील आरक्षण या मुद्यावरून जुलै २००२ मध्ये केडीएमसीतून २७ गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, कुणाचीही मागणी नसताना जून २०१५ मध्ये पुन्हा गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. ७ सप्टेंबर २०१५ ला पुन्हा ही गावे वगळून त्या गावांचा ‘स्वतंत्र नगरपालिका’ असा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. या अध्यादेशाच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्त कार्यालयात हजारो नागरिकांनी पत्रं सादर केली आहेत. परंतु, ही हरकती, सूचनांची पत्रं बोगस असल्याचे २७ गावांमधील काही नगरसेवकांचे म्हणणे असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे संकेत दिले असताना जाणूनबुजून काही स्वयंघोषित पुढारी स्वतंत्र नगरपालिकेसाठी अडथळा निर्माण करत असल्याने गावांमधील आगरी-कोळी तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असले प्रकार तत्काळ थांबवा, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.नगरसेवकांची पाठ२७ गावांमधील नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे तेथील नेत्यांकडून सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षरीत्या नगरसेवकांचा सहभाग या आंदोलनात दिसून आला नाही, तर संघर्ष समिती आणि सर्वपक्षीय युवा मोर्चा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. युवा मोर्चा ही तरुणांची संघटना असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे