शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खोडा घालू नका, अन्यथा घरावर मोर्चे काढू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:56 IST

सर्वपक्षीय युवा मोर्चाने दिला इशारा; २७ गावांच्या स्वतंत्र पालिकेच्या मागणीसाठी निदर्शने

डोंबिवली : २७ गावांची स्वतंत्र पालिका व्हावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वतंत्र नगरपालिकेच्या कार्यवाहीत खोडा घालणाऱ्यांना गुरुवारी आंदोलनाच्या माध्यमातून समज देण्यात आली. बेताल वक्तव्य करून खोडा घालण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.२७ गावांची नगरपालिका स्थापन करण्याच्या विरोधात काही नगरसेवक आणि पुढारी वक्तव्य करत असल्याचा आरोप युवा मोर्चाचा आहे. संबंधित व्यक्तींचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी मोर्चाने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आंदोलनात स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावणाºयांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले जाणार होते. परंतु, दहन आंदोलनाच्या वेळी कायदा-सुव्यवस्था धोक्यात येईल, या शक्यतेने मानपाडा पोलिसांनी सर्वपक्षीय युवा मोर्चाला नोटीस बजावली होती. त्यामुळे दहन न करता निदर्शने करण्यात आली.कल्याण-शीळ मार्गावरील स्व. भागाशेठ वझे चौक येथे सकाळी ११ वाजता झालेल्या आंदोलनात गजानन पाटील, सुधीर पाटील, संतोष केणे, गणेश म्हात्रे, रमेश म्हात्रे आदी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, भ्रष्ट महापालिकेची हाव धरणाºयांचा धिक्कार असो, २७ गावांतील भूमिपुत्रांच्या हरकती व सूचनांचा अवमान करणाºयांचा धिक्कार असो, या मजकुराचे कागदी फलकही झळकावण्यात आले होते.२७ गावांमधील स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना भ्रष्टाचार आणि भूमिपुत्रांच्या जमिनीवरील आरक्षण या मुद्यावरून जुलै २००२ मध्ये केडीएमसीतून २७ गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायती स्थापन झाल्या. परंतु, कुणाचीही मागणी नसताना जून २०१५ मध्ये पुन्हा गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यात आली. ७ सप्टेंबर २०१५ ला पुन्हा ही गावे वगळून त्या गावांचा ‘स्वतंत्र नगरपालिका’ असा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. या अध्यादेशाच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्त कार्यालयात हजारो नागरिकांनी पत्रं सादर केली आहेत. परंतु, ही हरकती, सूचनांची पत्रं बोगस असल्याचे २७ गावांमधील काही नगरसेवकांचे म्हणणे असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे संकेत दिले असताना जाणूनबुजून काही स्वयंघोषित पुढारी स्वतंत्र नगरपालिकेसाठी अडथळा निर्माण करत असल्याने गावांमधील आगरी-कोळी तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असले प्रकार तत्काळ थांबवा, अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.नगरसेवकांची पाठ२७ गावांमधील नगरसेवकांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे तेथील नेत्यांकडून सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षरीत्या नगरसेवकांचा सहभाग या आंदोलनात दिसून आला नाही, तर संघर्ष समिती आणि सर्वपक्षीय युवा मोर्चा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. युवा मोर्चा ही तरुणांची संघटना असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे