शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

घरांची नोंदणी सुरू न केल्यास ठोकणार टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:09 IST

केडीएमसीच्या २७ गावांतील घरांची नोंदणी १० महिन्यांपासून बंद असल्याने राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

कल्याण : केडीएमसीच्या २७ गावांतील घरांची नोंदणी १० महिन्यांपासून बंद असल्याने राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. तसेच २७ गावांतील भूमिपुत्र असलेल्या बिल्डरांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नोंदणी सुरू न झाल्यास रजिस्टर कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी दिला आहे.केडीएमसीतून २७ गावे वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने समितीने सरकारला दोन महिन्यांचा अल्टीमेटम दिला आहे. महापालिका सोयीसुविधा पुरवत नाही, तर राज्य सरकार गावे वगळत नसल्याने २७ गावांची कोंडी झाली आहे. त्यातच २७ गावांतील घरांची नोंदणी बंद आहे. घरांची नोंदणी बंद करण्याबाबत कोणताही अध्यादेश काढलेला नाही, अशी बाब विक्रम पाटील यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नामुळे उघड झाली आहे. मग, राज्य सरकारचा आदेश असल्याचे सांगून घरनोंदणी का बंद केली आहे.या बंदीमुळे बिल्डर मेटाकुटीला आले आहे. कोणाच्या आदेशानुसार हा प्रकार सुरू आहे. बड्या बिल्डरांची घरे विकली जावीत, यासाठी त्यांच्या सांगण्यावरून लहान बिल्डरांचा बळी दिला जात आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे. एका घराच्या नोंदणीसाठी सरकारचे महसूल खाते दोनअडीच लाखांची फी घेते. एका दिवसाला १५० ते २०० नोंदणी होते. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे नोंदणी सुरू झाल्यास रजिस्ट्रेशन आॅफिसला टाळे ठोकण्यात येईल, असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.चिंचपाड्यात उद्या सभाकल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात संघर्ष समितीतर्फे शुक्रवार, २ नोव्हेंबरला सभा होणार आहे, अशी माहिती समितीचे पदाधिकारी चंद्रकांत म्हात्रे यांनी दिली आहे. या सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण