शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लोकलचे दरवाजे अडवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:55 IST

डोंबिवलीत रेल्वे पोलिसांचे आवाहन : महिला प्रवाशाच्या मृत्यूनंतर आली जाग

डोंबिवली : कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सोमवारी सविता नाईक या तरुणीचा मृत्यू झाल्याने या अपघाताची दखल घेऊन मंगळवारी पोलिसांनी दरवाजे अडवून उभ्या राहणाऱ्या महिला प्रवाशांना डब्यात जाण्यास भाग पाडून सुरक्षित प्रवास करण्याचा संदेश दिला.

सोमवारच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती. यावेळी महिला डब्यासमोर पोलिसांनी उभे रहावे आणि गाडीत जागा असेल तर महिलांना पुढे सरकायला सांगावे, अशी मागणीकेली होती.

मुंबईच्या दिशेने जाणाºया जलद आणि धीम्या लोकल गाड्या फलाट क्र. पाच व तीन वर येतात. मंगळवारी या फलाटांवर महिलांच्या डब्यापाशी पोलीस उभे असल्याचे निदर्शनास आले. डब्यात जागा असतानाही केवळ हवा खाण्यासाठी दरवाजे अडवणाºया महिलांना डब्यात आतमध्ये जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले. दरवाजा आणि मधला पॅसेज कोणीही अडवू नका, त्यामुळे महिलांना डब्यात प्रवेश करतांना अडथळे येतात. त्यामुळे नाहक जीव जातो, अपघात होतात, असे महिला पोलिसांनी दरवाजात उभ्या असलेल्या महिलांना सांगितले. बहुतांश डब्यांमधील महिलांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत दरवाजे मोकळे करुन दिले. गाडी फलाटांमध्ये येताच महिला पोलीस खिडकीमधून डब्यात डोकावून महिलांना आत पुढे सरकण्यास सांगत होत्या. तसेच जागा अडवणारे सामानसुमान रॅकमध्ये ठेवण्यास सांगत होत्या.

दरम्यान, पोलिसांनी या कामात सातत्य ठेवावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली. उपनगरीय प्रवासी महासंघ, महिला रेल्वे प्रवासी संघटना यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. सुखद, संरक्षित, सुरक्षित प्रवासाची आम्हाला हमी द्या अशी मागणी संघटनांनी केली.