शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातही सीमावाद उफाळण्याची चिन्हे, दिवेकरांनी दिले आयुक्तांना पत्र

By अजित मांडके | Updated: December 7, 2022 18:16 IST

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्यात एकीकडे महाराष्ट्र आणि बेळगावमध्ये सीमावाद उफाळला आहे. त्यात दुसरीकडे आता दिवा भागातील नागरीकांनी देखील मागील ४० वर्षात सुविधांपासून वंचित असल्याचे सांगत आम्हाला नवीमुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी ठाणो महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. दिव्यातील जागा हो दिवेकर या संस्थेने दिलेल्या पत्रनंतर आता ठाण्यातही दिवा सीमावाद उफाळण्याची चिन्हे निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला असतानाच, दुसरीकडे दिवा परिसर ठाणो महापालिका हद्दीतून वगळण्याची मागणी जागा हो दिवेकर या संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी ठाणो महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे एका पत्रद्वारे केली आहे. ठाणो महापालिका स्थापित होऊन जवळपास 4क् वर्षे होऊन गेली. त्यात बरीच खारजमीन, खाडीप्रदेश समाविष्ट झाला. त्यात खूप मोठा भाग म्हणजे दिवा ग्रामीण परिसर आहे. ज्यात दातीवली, बेतवडे, साबे, आगासन, म्हातार्डी, देसाई , पडले, खिडकाळी, शीळ, खार्डी असा बराचसा खाडीकिनारा परिसर ठाणे महापालिकेने खूप मोठी आश्वासने देऊन समाविष्ट करून घेतला. ज्याला आधीपासूनच भूमीपुत्नांचा विरोध होता. परंतु महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. परंतु दुर्दैवाने आम्ही ठेवलेला विश्वास हा ठाणो महापालिकेने फोल ठरविला आहे. आज इतकी वर्षे होऊन देखील येथील रहिवाशांना मुलभुत सोई सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे या पत्रत नमुद करण्यात आले आहे.

पिण्याचे पाणी अजून आम्हाला मिळत नाही. याउलट दिव्यातील कित्येक नागरिकांना पिण्याचे पाणी ट्रेनने वाहून आणताना आपला जीव गमवावा लागला. साधे आरोग्य केंद्र, स्वच्छतागृहे नाहीत, कोणतीही कामे निघाली तर तीसुद्धा फक्त निव्वळ पैसे कमावण्याचे साधन बनले. रस्ते दुरु स्ती, गटारे कामे फक्त एक भ्रष्टाचाराचे साधन बनले. दिवा व परिसर जणू काही भ्रष्टाचाराचीच खाण बनला आहे. जाणीवपूर्व दिव्याला विकासापासून वंचित ठेवले गेले. आता आम्हा दिवावासीयांची सहनशक्ती संपली आहे. यावर आता एकच तोडगा तो म्हणजे दिवा परिसर ठाणो महापालिका क्षेत्नातून वगळून नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सुरूवातीला आम्हाला नवी मुंबई महापालिकेने सामील करून घेण्यासाठी प्रस्ताव ठेवला होता. परंतु आम्ही नकार देऊन नंतर ठाणो महापालिकेत समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला. ज्याचा आता आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. तरी आम्ही आमची चूक सुधारू इच्छीत आहोत. त्यासाठी दिवा ग्रामीण व आजूबाजूच्या परिसराला नवी मुंबईत समाविष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. नवी मुंबईत देखील भरपूर परिसर दिव्याप्रमाणोच होते. परंतु अचूक नियोजन आणि पारदर्शक कारभारामुळे आज नवी मुंबईचा कायापालट आपण पाहत आहोत. म्हणूनच आम्हाला परत एकदा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे आणि आमची या सर्व नरक यातनातून सुटका करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :divaदिवाthaneठाणेNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका