शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दिव्यांगांचे शैक्षणिक ‘अस्तित्व’ धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:12 IST

वाहतूककोंडी : स्कूलबसचा प्रवास चार तासांचा

कल्याण : कल्याणमधील वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप डोंबिवली पूर्वेतील एका विशेष शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीमुळे या दिव्यांग मुलांना दररोज सुमारे चार तास कल्याण महापालिकेच्या बसमध्ये घालवावे लागतात. दिव्यांग मुलामुलींना एवढा वेळ बसमध्ये सांभाळणे, हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे जिकिरीचे असून त्यामुळे त्रस्त झालेल्या शाळा व्यवस्थापनाने अत्यल्प दराच्या या बसेस बंद करण्याची सूचना परिवहन व्यवस्थापनास केली आहे.

डोंबिवली पूर्वेत दिव्यांग मुलांसाठी अस्तित्व शाळा आहे. या शाळेत मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात. दिव्यांगांसाठी मुळात शाळा कमी आहेत. अशा परिस्थितीत अस्तित्व शाळेने दिव्यांगांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या शाळेत कल्याण, डोंबिवलीसह पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनसेवेने दोन बस अत्यल्प दरात पुरवल्या आहेत. कल्याण आणि डोंबिवली शहरांतून दररोज निघणाºया या बसमधून दिव्यांग विद्यार्थी शाळा गाठतात. दोन्ही बसमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकी एक शिक्षिका आणि एक अटेंडंट कार्यरत असतो. कल्याणमधील वाहतूककोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पत्रीपुलाच्या कामामुळे या समस्येमध्ये आणखी भर पडली आहे. याचा फटका आता दिव्यांग विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. कल्याण येथून डोंबिवली पूर्वेतील शाळेचे अंतर सुमारे सहा किलोमीटर आहे. मात्र, वाहतूककोंडीमुळे शाळेमध्ये पोहोचण्यास आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड ते दोन तासांचा विलंब होतो. दिव्यांग मुले तशीच एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाहीत. त्यामुळे एवढा वेळ त्यांना बसमध्ये सांभाळणे, हे जिकिरीचे काम असते. प्रवासात या मुलांना लघुशंका अथवा शौचासाठी जायचे झाल्यास वाहतूककोंडीत त्यांना कुठे नेणार, हा मोठा प्रश्न बसमधील कर्मचाºयांना पडतो. वाहतूककोंडीची समस्या सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने कल्याण आणि डोंबिवलीतून चालणाºया दोन्ही शालेय बस महापालिकेने १ सप्टेंबरपासून बंद कराव्यात, असे पत्र शाळा व्यवस्थापनाने परिवहन व्यवस्थापनास दिले आहे. दिव्यांग मुलांना पालकांनी शाळेत आणून सोडावे, असे फर्मानही शाळेने काढले असून त्यामुळे पालकांसमोर वेगळीच समस्या उभी ठाकली आहे.दिव्यांगांना लोकलमध्ये न्यावे तरी कसे?वाहतूककोंडीसमोर हतबल झालेल्या शाळा व्यवस्थापनाने बसेस बंद करण्यासाठी कल्याण परिवहन सेवेला पत्र दिले असून मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर सोपवली आहे.शाळा व्यवस्थापनाच्या आदेशामुळे आता पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळच्या सत्रात रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी असते. डोंबिवली स्थानकात धडधाकट प्रवासीही रेल्वेत चढू किंवा उतरू शकत नाही. अशा परिस्थितीत पालकांना त्यांच्या दिव्यांग मुलांसोबत प्रवास करणे शक्य होईल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.दिव्यांग मुलांना रिक्षाने शाळेत सोडणेही तेवढे सहज नसते. साधारण मुलांसाठी पालक शेअर रिक्षा करू शकतात. मात्र, दिव्यांग मुलांना शेअर रिक्षात नेणे शक्य नसते. त्यामुळे खासगी वाहने नसलेल्या पालकांना आॅटोरिक्षाचे पूर्ण भाडे सोसावे लागेल. ते सर्वांनाच परवडणारे नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका