शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

दिव्यांगांचे शैक्षणिक ‘अस्तित्व’ धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 04:12 IST

वाहतूककोंडी : स्कूलबसचा प्रवास चार तासांचा

कल्याण : कल्याणमधील वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप डोंबिवली पूर्वेतील एका विशेष शाळेच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीमुळे या दिव्यांग मुलांना दररोज सुमारे चार तास कल्याण महापालिकेच्या बसमध्ये घालवावे लागतात. दिव्यांग मुलामुलींना एवढा वेळ बसमध्ये सांभाळणे, हे कर्मचाऱ्यांसाठी मोठे जिकिरीचे असून त्यामुळे त्रस्त झालेल्या शाळा व्यवस्थापनाने अत्यल्प दराच्या या बसेस बंद करण्याची सूचना परिवहन व्यवस्थापनास केली आहे.

डोंबिवली पूर्वेत दिव्यांग मुलांसाठी अस्तित्व शाळा आहे. या शाळेत मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी शिक्षण घेतात. दिव्यांगांसाठी मुळात शाळा कमी आहेत. अशा परिस्थितीत अस्तित्व शाळेने दिव्यांगांना शैक्षणिक सुविधा पुरवण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. या शाळेत कल्याण, डोंबिवलीसह पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनसेवेने दोन बस अत्यल्प दरात पुरवल्या आहेत. कल्याण आणि डोंबिवली शहरांतून दररोज निघणाºया या बसमधून दिव्यांग विद्यार्थी शाळा गाठतात. दोन्ही बसमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकी एक शिक्षिका आणि एक अटेंडंट कार्यरत असतो. कल्याणमधील वाहतूककोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पत्रीपुलाच्या कामामुळे या समस्येमध्ये आणखी भर पडली आहे. याचा फटका आता दिव्यांग विद्यार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. कल्याण येथून डोंबिवली पूर्वेतील शाळेचे अंतर सुमारे सहा किलोमीटर आहे. मात्र, वाहतूककोंडीमुळे शाळेमध्ये पोहोचण्यास आणि शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड ते दोन तासांचा विलंब होतो. दिव्यांग मुले तशीच एका ठिकाणी जास्त वेळ बसत नाहीत. त्यामुळे एवढा वेळ त्यांना बसमध्ये सांभाळणे, हे जिकिरीचे काम असते. प्रवासात या मुलांना लघुशंका अथवा शौचासाठी जायचे झाल्यास वाहतूककोंडीत त्यांना कुठे नेणार, हा मोठा प्रश्न बसमधील कर्मचाºयांना पडतो. वाहतूककोंडीची समस्या सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने कल्याण आणि डोंबिवलीतून चालणाºया दोन्ही शालेय बस महापालिकेने १ सप्टेंबरपासून बंद कराव्यात, असे पत्र शाळा व्यवस्थापनाने परिवहन व्यवस्थापनास दिले आहे. दिव्यांग मुलांना पालकांनी शाळेत आणून सोडावे, असे फर्मानही शाळेने काढले असून त्यामुळे पालकांसमोर वेगळीच समस्या उभी ठाकली आहे.दिव्यांगांना लोकलमध्ये न्यावे तरी कसे?वाहतूककोंडीसमोर हतबल झालेल्या शाळा व्यवस्थापनाने बसेस बंद करण्यासाठी कल्याण परिवहन सेवेला पत्र दिले असून मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी त्यांच्या पालकांवर सोपवली आहे.शाळा व्यवस्थापनाच्या आदेशामुळे आता पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळच्या सत्रात रेल्वेगाड्यांना तुफान गर्दी असते. डोंबिवली स्थानकात धडधाकट प्रवासीही रेल्वेत चढू किंवा उतरू शकत नाही. अशा परिस्थितीत पालकांना त्यांच्या दिव्यांग मुलांसोबत प्रवास करणे शक्य होईल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.दिव्यांग मुलांना रिक्षाने शाळेत सोडणेही तेवढे सहज नसते. साधारण मुलांसाठी पालक शेअर रिक्षा करू शकतात. मात्र, दिव्यांग मुलांना शेअर रिक्षात नेणे शक्य नसते. त्यामुळे खासगी वाहने नसलेल्या पालकांना आॅटोरिक्षाचे पूर्ण भाडे सोसावे लागेल. ते सर्वांनाच परवडणारे नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका