शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

दिव्यांगाच्या आत्महत्येस पालिका, लोकप्रतिनिधी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:53 IST

सर्व स्तरांतून आरोप : दिव्यांग, चर्मकाराप्रति द्वेषाची भावना, अनधिकृत बांधकामांना मात्र संरक्षण

भाईंदर : उपजीविकेसाठी गेले दीड वर्षे पालिकेकडे स्टॉलची मागणी करणारे दिव्यांग अशोक तेतर यांच्या आत्महत्येस महापालिका आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप विविध स्तरांतून होत आहे. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेने दिव्यांग, चर्मकारांना उपजीविकेसाठी स्टॉलचा परवाना तसेच नूतनीकरण करून देण्यात अडवणूक चालवली आहे. त्यांचे स्टॉल तोडले जात आहेत. याबाबत शासन आणि न्यायालयाची भूमिका धाब्यावर बसवली जाते; पण शहरात चालणाऱ्या अनधिकृत बांधकामांना पालिका व लोकप्रतिनिधी संरक्षण देत असल्याचा आरोपही होत आहे.

भाईंदर पूर्वेच्या आरएनपी पार्कमधील गार्डन व्ह्यू इमारतीत राहणारे दिव्यांग अशोक तेतर यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पाय गमवावा लागल्याने अशोकसाठी मुलीचे शिक्षण, औषधोपचार आणि घरखर्च चालवणे जिकिरीचे बनले होते. महापालिकेकडून दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या स्टॉल परवान्यांकरिता गेल्या दीड वर्षापासून अर्ज करून तसेच काही लोकप्रतिनिधींना भेटूनसुद्धा त्यांना परवाना मिळाला नव्हता. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले होते, असे त्यांचे परिचित तथा जिद्दी मराठा संस्थेचे प्रमुख प्रदीप जंगम यांनी सांगितले. पालिकेकडून दिव्यांगांसाठी दिली जाणारी आर्थिक मदत मिळावी, म्हणूनही त्यांनी अर्ज केला होता.

वास्तविक, २०१५ पासून सत्ताधारी भाजपने सातत्याने चर्मकार, दिव्यांंग, दूध स्टॉलवर कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला होता. स्वत: आमदार नरेंद्र मेहता, तत्कालीन महापौर गीता जैन, नगरसेवक प्रशांत दळवी, डॉ. नयना वसाणी आदींनी मीरा रोड येथे कारवाईसाठी रस्त्यावर धरणे धरले होते. त्यावेळी चर्मकार, दिव्यांगांसह दूधविक्रीचे अनेक स्टॉल पालिकेने तोडून टाकले. शासनाने चर्मकारांना दिलेले स्टॉलसुद्धा पालिकेने पाडले. इतकेच नाही, तर शासन व न्यायालयाचे निर्देश डावलून स्टॉल परवाना कोणाला मिळू नये वा परवाना नूतनीकरण होऊ नये, म्हणून जाचक अटीशर्तींचे धोरण महासभेत तयार केले. प्रशासनानेही जी हुजुरीच केली. दिव्यांग, चर्मकारांनी याविरोधात आंदोलने आणि निषेध केला; पण त्यांना कोणी दाद दिली नाही.अपंगांसाठी पालिकेने मार्केटमध्ये गाळे राखीव ठेवले आहेत. पण, तिकडे गाळे घेत नाहीत. त्यांच्यासाठी पालिका अनुदान देत आहे. रस्त्यावर नव्याने स्टॉल आपण कोणालाच देत नसून तसे महापालिकेने ठरवले आहे. अपंगांबाबत पालिका नेहमीच सहानुभूतीपूर्वक धोरण राबवत आहे. - बालाजी खतगावकर, आयुक्त, महापालिका

अशोक यांच्या आत्महत्येस महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा गेल्या काही वर्षांपासूनचा दिव्यांग, चर्मकार यांच्याबद्दलचा द्वेष कारणीभूत आहे. शासनासह न्यायालयानेदेखील स्टॉल देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला असताना सत्ताधारी व प्रशासनाकडून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. बड्या नेत्यांसह माफियांची बेकायदा बांधकामे पालिकेला चालतात; पण दिव्यांग, चर्मकारांवर पाशवी अत्याचार करण्यात त्यांना आसुरी आनंद मिळतो. तेतर यांच्या आत्महत्येस पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असून याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. - प्रदीप जंगम, सामाजिक कार्यकर्ता

सत्ताधारी म्हणून आम्ही प्रशासनास धोेरण ठरवून अपंग आदींना स्टॉल देण्याची कार्यवाही करण्यास वेळोवेळी सांगितले आहे; पण पालिका अधिकारी बेकायदा स्टॉल, फेरीवाले व बेकायदा बांधकामांवर कारवाई करत नाही. गरजूंना स्टॉल दिले गेले पाहिजेत. त्यांच्यावर अन्याय करणे चुकीचे आहे. - दीपिका अरोरा, सभापती, महिला बालकल्याण

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक