शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:42 IST

प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे.

डोंबिवली : प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाज भान जपणाºया तरूणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. झाडांना संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी खिळेमुक्त झाडं ही मोहिम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरू केली आहे. अगदी अल्पावधीतच ही मोहिम व्यापक पध्दतीने महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडं ही मोहिम आज सुरू आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरू केलेली अंघोळीची गोळी ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करीत आहेत.संस्थेचे खिळेमुक्त झाड मोहिमेचे मुंबईचे समन्वयक तुषार वारंग म्हणाले, पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद नक्कीच आहे. मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणे देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगितले.खिळेमुक्त झाड मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि यापुढे महाराष्ट्राच्या इतर जिल्हयात आणि शहरात खिळेमुक्त झाडं त्याचबरोबर बॅनर, पोस्टरमुक्त झाडं आणि आळेयुक्त झाडं मोहिम विस्तारण्याचा मानस आहे.माधव पाटील, प्रमोद शेवळे, राजेश राऊत आणि तेजश्री देवडकर यांनी अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दत्ता बारगजे आणि रेखा बारगजे यांनी स्वीकारला. 

 

टॅग्स :dombivaliडोंबिवली