शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अंघोळीची गोळी संस्थेला मिळाला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 19:42 IST

प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे.

डोंबिवली : प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्षसंवर्धन या विषयावर सातत्याने काम करीत आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाज भान जपणाºया तरूणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. झाडांना संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी खिळेमुक्त झाडं ही मोहिम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरू केली आहे. अगदी अल्पावधीतच ही मोहिम व्यापक पध्दतीने महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडं ही मोहिम आज सुरू आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरू केलेली अंघोळीची गोळी ही संस्था प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करीत आहेत.संस्थेचे खिळेमुक्त झाड मोहिमेचे मुंबईचे समन्वयक तुषार वारंग म्हणाले, पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद नक्कीच आहे. मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणे देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगितले.खिळेमुक्त झाड मोहिमेचे ठाणे जिल्हा समन्वयक अविनाश पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि यापुढे महाराष्ट्राच्या इतर जिल्हयात आणि शहरात खिळेमुक्त झाडं त्याचबरोबर बॅनर, पोस्टरमुक्त झाडं आणि आळेयुक्त झाडं मोहिम विस्तारण्याचा मानस आहे.माधव पाटील, प्रमोद शेवळे, राजेश राऊत आणि तेजश्री देवडकर यांनी अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दत्ता बारगजे आणि रेखा बारगजे यांनी स्वीकारला. 

 

टॅग्स :dombivaliडोंबिवली