शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दिवा क्रॉसिंगने घेतले सहा महिन्यांत २० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 02:25 IST

दिवा येथे रेल्वे रूळ ओलांडताना सोमवारी दोघांचा एक्स्प्रेसने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

- अजित मांडके ठाणे : दिवा येथे रेल्वे रूळ ओलांडताना सोमवारी दोघांचा एक्स्प्रेसने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या सहा महिन्यात याठिकाणी २० जणांचे बळी गेल्यामुळे या रेल्वे क्रॉसिंगवरील आरओबीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. येथील रहिवासी आता पुन्हा याबाबत आक्रमक झाले आहेत. ठाणे महापालिकेच्या महासभेत आरओबीला मंजुरी मिळालेली असून त्यासाठी ४० कोटींची तरतूदही केली आहे. परंतु, रेल्वेकडून इस्टिमेट न आल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. दुसरीकडे येथील पाच इमारती आरओबीसाठी तोडण्यात येणार असून तेथील २५० रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी अद्याप इतर ठिकाणी पर्याय उपलब्ध न झाल्यानेही हे कामही रखडले आहे.सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास दुचाकीवरून रेल्वे रूळ क्रॉस करत असताना दोघा तरुणांचा एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. त्यामुळे येथील रहिवासी आक्रमक झाले होते. याठिकाणी आरओबी व्हावा, यासाठी मागील कित्येक वर्षांपासून येथील रहिवासी पाठपुरावा करत आहेत. तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटनेकडूनदेखील वारंवार पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही त्यांच्या मागणीचा विचार झाला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. रेल्वे रूळ क्रॉस करताना महिन्याला सुमारे १० जणांचा बळी जात असल्याचा दावादेखील प्रवासी संघटनेने केला आहे. म्हणजेच वर्षाला सुमारे १०० जणांचा येथे नाहक बळी जात असल्याचे स्पष्ट होत आहे.दिव्याची लोकसंख्या ४.५० लाखांच्या घरात असून यातील अर्ध्याहून जास्तीची लोकसंख्या ही पूर्वेला वास्तव्यास आहे. त्यातही याठिकाणी जो रेल्वे ब्रिज आहे, तो पूर्वेला उतरताना निमुळता आहे. याचे डिझाइन चुकल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास येथून उतरताना जास्त वेळ लागत असल्याने प्रवासीदेखील नाइलाजास्तव रेल्वे रूळ क्रॉस करताना दिसतात. तर, मध्यभागी सध्या सरकत्या जिन्याचे काम सुरू आहे. परंतु, तो जिना पूर्वेलादेखील खाली उतरवण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.