शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

जिल्ह्याच्या जलवाहतुकीचा भार ठामपाच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:09 IST

शासनाचा निर्णय : साडेतेरा कोटींचा सल्लागार खर्च

ठाणे : जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्याचा भार आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू होणाऱ्या जलवाहतुकीचा भार पेलणे कठीण असल्याचा कबुली जबाब ठाणे महापालिकेने दिला होता. परंतु, जे काम मेरीटाईम बोर्डाकडून होणे अपेक्षित होते, ते काम शासनाच्या आदेशानुसार करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू होणाºया जलवाहतुकीचा भारही ठाणे महापालिकेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे - मुंबई आणि ठाणे - नवी मुंबई या दुसºया आणि तिसºया टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम आणि या कामासाठी सल्लगार नेमण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी १३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात वसई - ठाणे - कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित केला आहे. यासाठी येणारा ६५० कोटींचा खर्च हा केंद्राकडून उपलब्ध होणार आहे; परंतु यासाठी सल्लागार नेमण्याच्या कामासाठी ४.५० कोटींचा खर्च पालिकेने केला आहे. त्यानंतर टप्पा दोन आणि तीनसाठी ठाणे महापालिकेकडे निधी नसल्याची कबुली प्रशासनाने दिली होती. तसेच जलवाहतुकीचा विषय हा मेरीटाईम बोर्डाशी निगडित असल्याने त्यांच्याकडून हे काम होणे अपेक्षित होते; परंतु आता त्यांचे कामही निधी नसतांना शासनाच्या आदेशामुळे ठाणे महापालिकेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.दुसऱया टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरूदुसऱया टप्प्यातील ठाणे-मुंबई व ठाणे-नवी मुंबई या दोन्ही जलवाहतूक मार्गांसाठी सल्लागारांकडून अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे काम तातडीने व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.त्यानुसार २०१८-१९ मध्ये १० कोटी आणि २०१९-२० मध्ये ५.९३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. आता हा खर्च पालिका करणार असून, नंतर हा खर्च जलमार्ग प्राधिकरणाकडून (दिल्ली) यांच्याकडून मिळविण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे; परंतु तो महापालिकेने का करावा, असा सवाल आता केला जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका