शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्याच्या जलवाहतुकीचा भार ठामपाच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:09 IST

शासनाचा निर्णय : साडेतेरा कोटींचा सल्लागार खर्च

ठाणे : जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्याचा भार आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू होणाऱ्या जलवाहतुकीचा भार पेलणे कठीण असल्याचा कबुली जबाब ठाणे महापालिकेने दिला होता. परंतु, जे काम मेरीटाईम बोर्डाकडून होणे अपेक्षित होते, ते काम शासनाच्या आदेशानुसार करण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू होणाºया जलवाहतुकीचा भारही ठाणे महापालिकेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे - मुंबई आणि ठाणे - नवी मुंबई या दुसºया आणि तिसºया टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम आणि या कामासाठी सल्लगार नेमण्याचे काम पालिकेने हाती घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी १३.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात वसई - ठाणे - कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित केला आहे. यासाठी येणारा ६५० कोटींचा खर्च हा केंद्राकडून उपलब्ध होणार आहे; परंतु यासाठी सल्लागार नेमण्याच्या कामासाठी ४.५० कोटींचा खर्च पालिकेने केला आहे. त्यानंतर टप्पा दोन आणि तीनसाठी ठाणे महापालिकेकडे निधी नसल्याची कबुली प्रशासनाने दिली होती. तसेच जलवाहतुकीचा विषय हा मेरीटाईम बोर्डाशी निगडित असल्याने त्यांच्याकडून हे काम होणे अपेक्षित होते; परंतु आता त्यांचे कामही निधी नसतांना शासनाच्या आदेशामुळे ठाणे महापालिकेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.दुसऱया टप्प्यासाठी निविदा प्रक्रिया सुरूदुसऱया टप्प्यातील ठाणे-मुंबई व ठाणे-नवी मुंबई या दोन्ही जलवाहतूक मार्गांसाठी सल्लागारांकडून अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे काम तातडीने व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.त्यानुसार २०१८-१९ मध्ये १० कोटी आणि २०१९-२० मध्ये ५.९३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. आता हा खर्च पालिका करणार असून, नंतर हा खर्च जलमार्ग प्राधिकरणाकडून (दिल्ली) यांच्याकडून मिळविण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे; परंतु तो महापालिकेने का करावा, असा सवाल आता केला जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका