शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

जिल्हा रुग्णालय? नव्हे, हे तर असुविधांचेच आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:43 IST

जिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बाळांसाठी आवश्यक असलेल्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधाच नसल्याने आणि इन्क्युबेटरची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याची दखल थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली.

- अजित मांडकेजिल्हा सरकारी रुग्णालयात नवजात बाळांसाठी आवश्यक असलेल्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधाच नसल्याने आणि इन्क्युबेटरची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. याची दखल थेट आरोग्यमंत्र्यांनी घेतली. परंतु, या ठिकाणी केवळ हीच सुविधा नसून अनेक असुविधांचा डोंगर रुग्णालयापुढे उभा राहिला आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा दावा जरी केला जात असला, तरी सध्याच्या घडीला असलेली इमारत ही धोकादायक तर झालीच आहे, शिवाय डॉक्टरांसह कर्मचारी, सफाई कामगार, रुग्णांना मिळत असलेल्या सुविधांचीही वानवा असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्ह्याच्या विविध भागांतून येणाºया रुग्णांच्या नातेवाइकांनाही वेटिंग रूम नसल्याने रुग्णालयाच्या आवारात कशाही पद्धतीने ते राहतात. सीटी स्कॅन मशीन नादुरुस्त, एक्स रे मशीन आहे, परंतु डिजिटल यंत्रणा उपलब्ध नाही, अपुºया प्रमाणात असलेले बेड आदींसह इतर असुविधांचाच पाढा वाचला, तरी तो कमी पडणार असल्याचे विदारक चित्र आहे.ठाणे जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी नवजात शिशू विशेष उपचार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, या ठिकाणी व्हेंटिलेटरच नसून इन्क्युबेटरची संख्याही पुरेशा प्रमाणात नाही. परंतु, असे असले तरीही यंत्रणा सध्याच्या घडीला पुरेशी असल्याचे मत रुग्णालय प्रशासन व्यक्त करत आहे. या घटनेनंतर आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसह पालकमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. परंतु, केवळ दखल घेऊन उपयोग होणार नाही, तर ज्या सुविधांची वानवा आहे, त्या उपलब्ध करून देण्यासाठी या राजकीय मंडळींनीही चोख पावले उचलणे अपेक्षित असल्याचे मत आता व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालय अर्थात विठ्ठल सायन्ना जिल्हा रुग्णालय अशी या रुग्णालयाची ओळख आहे. या ठिकाणी तीन इमारती आहेत. एक इमारत ही अपघात विभागाची असून दुसºया इमारतीमध्ये विविध प्रकारच्या ओपीडीची कामे होतात. तिसºया इमारतीतही ओपीडी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय आहे. या रुग्णालयात आजच्या घडीला ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदींसह पालघर जिल्ह्यातूनही गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. रोज ओपीडीत येणाºया रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिकच आहे. परंतु, एखादा केसपेपर काढून तपासणी करेपर्यंत आणि औषधे घेईपर्यंत रुग्णाचा अर्ध्याहून अधिक दिवस जातो. त्यातही त्याला प्रत्येक ठिकाणी रुग्णालयातील दुर्गंधीचा सामना करावा लागतो. इमारतीमधील प्रत्येक मजला, जिन्यावर पानाच्या पिचकाºया येणारे रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून मारल्या जातात.स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. काही विभाग थोड्याफार प्रमाणात का होईना हायटेक करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, उर्वरित विभागांची अवस्था न बघितलेलीच बरी. रुग्णांना बसण्यासाठी व्यवस्थित बाकडे नसणे किंवा त्यांची संख्या अपुरी असणे, या असुविधेबरोबरच डॉक्टरांसाठी फार अशा काही सुविधा आहेत, हा देखील भाग नाही.>आजार परवडला, उपचार नकोगरीब कुटुंबातील व्यक्ती आजारी पडली की, तिला नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आणतात. येथे चांगले उपचार केले जातील, अशी त्यांची माफक अपेक्षा असते. मात्र, येथे आल्यावर रुग्णालयाची परिस्थिती पाहता आजार परवडला, उपचार नको, अशी म्हणण्याची वेळ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांवर येते.