शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

कचऱ्याचा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे

By admin | Updated: January 11, 2017 07:13 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात का दिरंगाई होते आहे. त्याला नेमके कोण जबाबदार आहे,

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात का दिरंगाई होते आहे. त्याला नेमके कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तरे देणारा सविस्तर अहवाल १५ दिवसांत ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारच्या सुनावणीत दिले. गेली सात वर्षे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यादरम्यान न्यायालयाने पालिकेला आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करुन कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. तशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिली. त्यात प्रगती न झाल्याने बांधकाम बंदीचा आदेश देण्यात आला. नऊ महिन्यांनी ते उठवताना डम्पिंगच्या प्रकल्पाची पूर्तता त्वरित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. हा प्रश्न घनकचऱ्याचा आहे. तो प्रदूषणाशी संबंधित आहे. त्यामुळे न्यायालयाने ती याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ग केली. मागच्या सुनावणीवेळी पालिका आयुक्तांना १० जानेवारीला हजर राहण्याचे आदेश लवादाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्त ई. रवींद्रन हजर होते. मीरा-भार्इंदरमधील घनकचराप्रकरणी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर हे देखील हजर होते. केडीएमसीचा घनकचरा प्रकल्प राबविण्यात नेमकी कोणी दिरंगाई केली, त्याला कोण जबाबदार आहे, घनकचरा प्रकल्पासंबंंधित सगळ््यांची एक बैठक घ्यावी, त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवावे, या प्रकरणाची तपासणी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना लवादाने सांगितले. (प्रतिनिधी)