शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ठाणे जिल्ह्यात सुरु होणाऱ्या शाळांसाठी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणींचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 12:04 IST

पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सोमवार ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची काटेकोर व तंतोतंत अंमलबजावणी संपूर्ण ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अधिसूचना जारी केली आहे.

या अधिसूचनेत जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी म्हटले आहे की, २४ सप्टेंबर रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी  महत्वपूर्ण अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करणे, शाळेत येतांना घ्यावयाची काळजी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नविन मार्गदर्शक सूचना, खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन, आजारी विद्यार्थी शोधणे, विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे, विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन, शिक्षक-पालक बैठकीत चर्चा, घरात प्रवेश करतांना घ्यावयाची काळजी व सीएसआर निधीचा उपयोग करणे आदी महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.  त्यानुसार या आदेशांची संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. त्यास कोणी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांच्या विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या अधिसूचनेद्वारे देण्यात आला आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे