शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अवैध रेती उपसा विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; ६ कोटी ४८ लाखाचा मुद्देमाल नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 21:11 IST

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासूनच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूर  तहसिलदार यांनी धडक कारवाई हाती घेतली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळू  उत्खनन व वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात महसूल विभागाने हाती घेतलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे ६ कोटी ४८ लाखाचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त व नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक कळवा रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडी पात्र, टेभा, तानसा या परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर होतो, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासूनच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूर  तहसिलदार यांनी धडक कारवाई हाती घेतली.

 

आजच्या या कारवाईमध्ये ३२ सक्शनपंप व २५  बार्ज गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. तर ३३० ब्रास रेती साठा तसेच ५० ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उध्दवस्त करण्यात आले. ठाणे तहसीलदार अधिक पाटील, भिवंडी तहसिलदार शशिकांत गायकवाड, कल्याण तहसिलदार दिपक आकडे, शहापूर तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, अंबरनाथ तहसिलदार जयराज देशमुख, उल्हासनगर तहसिलदार विजय वाकोडे, रेतीगट तहसिलदार मुकेश पाटील, खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम यांसह अन्य  ६ अधिकाऱ्यांसह  महसूल विभागातील कर्मचारी, पोलीस असे १५० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.

 

ठाणे तहसीलदार अधिक पाटील आणि त्यांच्या टीमने मुंब्रा पारसिक कळवा  रेतीबंदर आणि गणेश घाट परिसरात कारवाई करीत 8 सक्शन पंप आणि 8 बार्ज जप्त करून नष्ट केले. भिवंडी तहसिलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या टीमने सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. 9 सक्शन पंप व 6 बार्ज जप्त करून नष्ट केले. तसेच ३३० ब्रास रेती साठा जप्त केला.     

 

  कल्याण तहसिलदार दिपक आकडे आणि त्यांच्या टीमने देखिल उल्हास नदी खाडी पात्रात प्रत्यक्ष उतरून अवैद्य रेती उपसा विरोधात कारवाई केली. यावेळी कल्याण तालुका हद्दीतील खाडी पात्रातील 11 सक्शनपंप नष्ट करण्यात आले. तर, 9 बार्ज जप्त करण्यात आले.  तसेच 21 ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उध्दवस्त करण्यात आले. शहापूर तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने टेंभा व तानसा या दोन ठिकाणी नदी पात्रात कारवाई करून ४  सक्शनपंप नष्ट केले. अंबरनाथ तहसिलदार जयराज देशमुख आणि त्यांच्या कारवाई करून २   सक्शनपंप नष्ट केले. या संपूर्ण कारवाई साठी २ बोटी, २ हायड्रा, २ पोकलेन, ३ गॅस कटर मशिन्स, ४ जेसीबी, १ बाज  या साहित्याचा वापर करण्यात आला.

अवैध रेती उत्खनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊले उचलली असून सातत्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.