शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अवैध रेती उपसा विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; ६ कोटी ४८ लाखाचा मुद्देमाल नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 21:11 IST

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासूनच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूर  तहसिलदार यांनी धडक कारवाई हाती घेतली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळू  उत्खनन व वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात महसूल विभागाने हाती घेतलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे ६ कोटी ४८ लाखाचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त व नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक कळवा रेती बंदर, काल्हेर रेती बंदर, वडूनवघर, खारबाव, वेहळे, उल्हास नदी खाडी पात्र, टेभा, तानसा या परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर होतो, अशा तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासूनच ठाणे, कल्याण, भिवंडी आणि शहापूर  तहसिलदार यांनी धडक कारवाई हाती घेतली.

 

आजच्या या कारवाईमध्ये ३२ सक्शनपंप व २५  बार्ज गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले. तर ३३० ब्रास रेती साठा तसेच ५० ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उध्दवस्त करण्यात आले. ठाणे तहसीलदार अधिक पाटील, भिवंडी तहसिलदार शशिकांत गायकवाड, कल्याण तहसिलदार दिपक आकडे, शहापूर तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी, अंबरनाथ तहसिलदार जयराज देशमुख, उल्हासनगर तहसिलदार विजय वाकोडे, रेतीगट तहसिलदार मुकेश पाटील, खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम यांसह अन्य  ६ अधिकाऱ्यांसह  महसूल विभागातील कर्मचारी, पोलीस असे १५० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.

 

ठाणे तहसीलदार अधिक पाटील आणि त्यांच्या टीमने मुंब्रा पारसिक कळवा  रेतीबंदर आणि गणेश घाट परिसरात कारवाई करीत 8 सक्शन पंप आणि 8 बार्ज जप्त करून नष्ट केले. भिवंडी तहसिलदार शशिकांत गायकवाड आणि त्यांच्या टीमने सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. 9 सक्शन पंप व 6 बार्ज जप्त करून नष्ट केले. तसेच ३३० ब्रास रेती साठा जप्त केला.     

 

  कल्याण तहसिलदार दिपक आकडे आणि त्यांच्या टीमने देखिल उल्हास नदी खाडी पात्रात प्रत्यक्ष उतरून अवैद्य रेती उपसा विरोधात कारवाई केली. यावेळी कल्याण तालुका हद्दीतील खाडी पात्रातील 11 सक्शनपंप नष्ट करण्यात आले. तर, 9 बार्ज जप्त करण्यात आले.  तसेच 21 ठिकाणी रेती उपसासाठी उभारण्यात आलेले हौद उध्दवस्त करण्यात आले. शहापूर तहसिलदार नीलिमा सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने टेंभा व तानसा या दोन ठिकाणी नदी पात्रात कारवाई करून ४  सक्शनपंप नष्ट केले. अंबरनाथ तहसिलदार जयराज देशमुख आणि त्यांच्या कारवाई करून २   सक्शनपंप नष्ट केले. या संपूर्ण कारवाई साठी २ बोटी, २ हायड्रा, २ पोकलेन, ३ गॅस कटर मशिन्स, ४ जेसीबी, १ बाज  या साहित्याचा वापर करण्यात आला.

अवैध रेती उत्खनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पाऊले उचलली असून सातत्याने अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.