शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

कल्याणच्या अवैध रेती उपशावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 16:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली ...

ठळक मुद्दे रेतीच्या क्रेनसह दहा लाखांचा माल जप्त वाळूने भरलेला ट्रकही जप्तलोकमत इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली आहे. कल्याण येथील रेती बंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणाºया टोळीकडून रेतीने भरलेल्या ट्रकसह सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमध्ये ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यात मोठया प्रमाणात विविध ठिकाणी अनधिकृतपणे रेती उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. दरम्यान ‘लोकमत’मध्येही यासदंर्भात ‘रेतीमाफियांच्या वाळू उपशामुळे कांदळवनावर आले गडांतर’ या मथळयाखाली ३० नोव्हेंबर रोजी वृत्त ‘रिअ‍ॅलिटी चेक’ द्वारे वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीच गांभीर्याने दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवरअपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या निर्देशानुसार कल्याण येथील रेतीबंदरावर ठाण्याचे रेतीगट तहसिलदार मुकेश पाटील आणि कल्याणचे तहसिलदार दीपक आकडे यांनी १२ डिसेेंबर २०२० रोजी आपल्या पथकासह कारवाई केली. या कारवाईमध्ये रेतीबंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणारी सुमारे पाच लाख रुपये किंमतीची क्रेन, सुमारे दोन लाखांचा इंजिन पंप आणि अंदाजे दहा लाख रुपये किंमतीची ३० ब्रास रेती जागीच जप्त करण्यात आली. या कारवाईच्या वेळी रेतीने भरलेला ट्रकही जप्त केला असून या ट्रकच्या मालक आणि चालकाविरूध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार मुकेश पाटील यांनी दिली.* वर्षभरात १२ ठिकाणी कारवाईरेती गट विभागासह तहसीलदार विभाग यांनी १ जानेवारी ते १४ डिसेंबरपर्यंत १२ ठिकाणी अवैद्य रेती उपशाबाबत कारवाई करीत पाच गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सक्शन पंप, बार्ज, बोटी आणि क्र ेन अशी कोटयवधींची यंत्रसामुग्री जप्त तसेच नष्ट केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.*अवैधरित्या होणाºया गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय खाडीतून वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. वाळूच्या उपशासाठी कांदळवनाचा ºहास केला जातो. अशा कारवाईसाठी पथक खाडी पात्रात धडकल्यानंतर वाळू तस्कर आधीच पळून जातात. अनेक कारवाईमध्ये आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उपसा सुरु असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी