शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

कल्याणच्या अवैध रेती उपशावर जिल्हा प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 16:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली ...

ठळक मुद्दे रेतीच्या क्रेनसह दहा लाखांचा माल जप्त वाळूने भरलेला ट्रकही जप्तलोकमत इफेक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्हयातील अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफीयांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहीम सुरु केली आहे. कल्याण येथील रेती बंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणाºया टोळीकडून रेतीने भरलेल्या ट्रकसह सुमारे १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमध्ये ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणे जिल्ह्यात मोठया प्रमाणात विविध ठिकाणी अनधिकृतपणे रेती उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. दरम्यान ‘लोकमत’मध्येही यासदंर्भात ‘रेतीमाफियांच्या वाळू उपशामुळे कांदळवनावर आले गडांतर’ या मथळयाखाली ३० नोव्हेंबर रोजी वृत्त ‘रिअ‍ॅलिटी चेक’ द्वारे वृत्त प्रसिद्ध केले होते. याचीच गांभीर्याने दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवरअपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या निर्देशानुसार कल्याण येथील रेतीबंदरावर ठाण्याचे रेतीगट तहसिलदार मुकेश पाटील आणि कल्याणचे तहसिलदार दीपक आकडे यांनी १२ डिसेेंबर २०२० रोजी आपल्या पथकासह कारवाई केली. या कारवाईमध्ये रेतीबंदरावर अनधिकृतपणे रेती उपसा करणारी सुमारे पाच लाख रुपये किंमतीची क्रेन, सुमारे दोन लाखांचा इंजिन पंप आणि अंदाजे दहा लाख रुपये किंमतीची ३० ब्रास रेती जागीच जप्त करण्यात आली. या कारवाईच्या वेळी रेतीने भरलेला ट्रकही जप्त केला असून या ट्रकच्या मालक आणि चालकाविरूध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार मुकेश पाटील यांनी दिली.* वर्षभरात १२ ठिकाणी कारवाईरेती गट विभागासह तहसीलदार विभाग यांनी १ जानेवारी ते १४ डिसेंबरपर्यंत १२ ठिकाणी अवैद्य रेती उपशाबाबत कारवाई करीत पाच गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सक्शन पंप, बार्ज, बोटी आणि क्र ेन अशी कोटयवधींची यंत्रसामुग्री जप्त तसेच नष्ट केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.*अवैधरित्या होणाºया गौण खनिजाच्या उत्खननामुळे सरकारचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. शिवाय खाडीतून वाळूचाही बेकायदा उपास केला जात असल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. वाळूच्या उपशासाठी कांदळवनाचा ºहास केला जातो. अशा कारवाईसाठी पथक खाडी पात्रात धडकल्यानंतर वाळू तस्कर आधीच पळून जातात. अनेक कारवाईमध्ये आरोपीचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैद्य रेती उपसा सुरु असल्याबाबात जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी