शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:07 PM

मतदारांमध्ये केली जागृती, हाउसिंग सोसाट्यांतदेखील जनजागृती

पालघर : पालघर मतदार संघात निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे आतापर्यंत तेरा लाखांहून अधिक म्हणजेच सुमारे 70 टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्यात जिल्हा निवडणूक यंत्रणेला यश आले असून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.पालघर जिल्ह्यात मतदार जागृती कार्यक्र मांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यात आले आहेत. यामध्ये उद्याचे मतदार असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व समजावून देण्याबरोबरच पालकांना पत्र लिहून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.अन्य उपक्र मांमध्ये सुमारे 50 हजार मतदारांकडून मी कुठल्याही आमिषांना बळी न पडता मतदान करेन असे संकल्प पत्र भरून घेण्यात आले आहे. हा उपक्रम विक्रमगड विधानसभा मतदारसंघासह डहाणू, बोईसर, पालघर, वसई, नालासोपारा या सर्वच मतदारसंघात राबविण्यात आला.विशेष मतदार नोंदणीच्या मोहिमेद्वारे 27 हजार 822 युवा मतदार जोडले गेले असून यासह आॅनलाइन नोंदणीच्या सुविधेमुळे जिल्ह्यात एकूण 72 हजारांहून अधिक नवीन मतदार निवडणूक प्रक्रि येमध्ये सहभागी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात मी मतदान करणारच या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तर जव्हार, डहाणू, बोईसर, वसई अशा विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मानवी साखळीमध्ये सुमारे आठ हजार मतदार सहभागी झाले. यामध्ये जव्हार येथे मानवी साखळीद्वारे लक्षवेधक असा भारताचा नकाशा तयार करण्यात आला. चार एकर क्षेत्रात 500ङ्ग350 फूट आकाराच्या या मानवी साखळीत 2500 विद्यार्थी सहभागी झाले.मानवी साखळीच्या अन्य उपक्रमांमध्ये विक्रमगड येथे मेणबत्त्यांची रांगोळी, डहाणू, बोईसर येथे समुद्रकिनारी मानवी साखळी, पालघर, वसई येथे दौड अशा विविध उपक्र मांचा समावेश होता. जिल्ह्यात विविध शासकीय बिलांच्या पानांवर मतदार जागृतीचे शिक्के मारून आतापर्यंत साडेनऊ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचिवण्यात आले आहेत.तर सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात विशेषत: वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 3हजार 700 गृहनिर्माण संस्थांमधील एक लाख 71 हजार मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 18 लाख 85 हजारांहून अधिक मतदार असून सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आयोगाने सुटी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी दोन तासांची सवलत देण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व मतदारांनी येत्या 29 एिप्रल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानpalgharपालघर