शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:07 IST

मतदारांमध्ये केली जागृती, हाउसिंग सोसाट्यांतदेखील जनजागृती

पालघर : पालघर मतदार संघात निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे आतापर्यंत तेरा लाखांहून अधिक म्हणजेच सुमारे 70 टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्यात जिल्हा निवडणूक यंत्रणेला यश आले असून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.पालघर जिल्ह्यात मतदार जागृती कार्यक्र मांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यात आले आहेत. यामध्ये उद्याचे मतदार असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व समजावून देण्याबरोबरच पालकांना पत्र लिहून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.अन्य उपक्र मांमध्ये सुमारे 50 हजार मतदारांकडून मी कुठल्याही आमिषांना बळी न पडता मतदान करेन असे संकल्प पत्र भरून घेण्यात आले आहे. हा उपक्रम विक्रमगड विधानसभा मतदारसंघासह डहाणू, बोईसर, पालघर, वसई, नालासोपारा या सर्वच मतदारसंघात राबविण्यात आला.विशेष मतदार नोंदणीच्या मोहिमेद्वारे 27 हजार 822 युवा मतदार जोडले गेले असून यासह आॅनलाइन नोंदणीच्या सुविधेमुळे जिल्ह्यात एकूण 72 हजारांहून अधिक नवीन मतदार निवडणूक प्रक्रि येमध्ये सहभागी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात मी मतदान करणारच या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तर जव्हार, डहाणू, बोईसर, वसई अशा विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मानवी साखळीमध्ये सुमारे आठ हजार मतदार सहभागी झाले. यामध्ये जव्हार येथे मानवी साखळीद्वारे लक्षवेधक असा भारताचा नकाशा तयार करण्यात आला. चार एकर क्षेत्रात 500ङ्ग350 फूट आकाराच्या या मानवी साखळीत 2500 विद्यार्थी सहभागी झाले.मानवी साखळीच्या अन्य उपक्रमांमध्ये विक्रमगड येथे मेणबत्त्यांची रांगोळी, डहाणू, बोईसर येथे समुद्रकिनारी मानवी साखळी, पालघर, वसई येथे दौड अशा विविध उपक्र मांचा समावेश होता. जिल्ह्यात विविध शासकीय बिलांच्या पानांवर मतदार जागृतीचे शिक्के मारून आतापर्यंत साडेनऊ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचिवण्यात आले आहेत.तर सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात विशेषत: वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 3हजार 700 गृहनिर्माण संस्थांमधील एक लाख 71 हजार मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 18 लाख 85 हजारांहून अधिक मतदार असून सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आयोगाने सुटी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी दोन तासांची सवलत देण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व मतदारांनी येत्या 29 एिप्रल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानpalgharपालघर