शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मतदानासाठी जिल्हा प्रशासन झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:07 IST

मतदारांमध्ये केली जागृती, हाउसिंग सोसाट्यांतदेखील जनजागृती

पालघर : पालघर मतदार संघात निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदार जागृती अभियानाअंतर्गत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याद्वारे आतापर्यंत तेरा लाखांहून अधिक म्हणजेच सुमारे 70 टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्यात जिल्हा निवडणूक यंत्रणेला यश आले असून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.पालघर जिल्ह्यात मतदार जागृती कार्यक्र मांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्र म राबविण्यात आले आहेत. यामध्ये उद्याचे मतदार असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना देखील सहभागी करून घेण्यात आले आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व समजावून देण्याबरोबरच पालकांना पत्र लिहून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सुमारे साडेचार लाख विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले.अन्य उपक्र मांमध्ये सुमारे 50 हजार मतदारांकडून मी कुठल्याही आमिषांना बळी न पडता मतदान करेन असे संकल्प पत्र भरून घेण्यात आले आहे. हा उपक्रम विक्रमगड विधानसभा मतदारसंघासह डहाणू, बोईसर, पालघर, वसई, नालासोपारा या सर्वच मतदारसंघात राबविण्यात आला.विशेष मतदार नोंदणीच्या मोहिमेद्वारे 27 हजार 822 युवा मतदार जोडले गेले असून यासह आॅनलाइन नोंदणीच्या सुविधेमुळे जिल्ह्यात एकूण 72 हजारांहून अधिक नवीन मतदार निवडणूक प्रक्रि येमध्ये सहभागी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात मी मतदान करणारच या सह्यांच्या मोहिमेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तर जव्हार, डहाणू, बोईसर, वसई अशा विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मानवी साखळीमध्ये सुमारे आठ हजार मतदार सहभागी झाले. यामध्ये जव्हार येथे मानवी साखळीद्वारे लक्षवेधक असा भारताचा नकाशा तयार करण्यात आला. चार एकर क्षेत्रात 500ङ्ग350 फूट आकाराच्या या मानवी साखळीत 2500 विद्यार्थी सहभागी झाले.मानवी साखळीच्या अन्य उपक्रमांमध्ये विक्रमगड येथे मेणबत्त्यांची रांगोळी, डहाणू, बोईसर येथे समुद्रकिनारी मानवी साखळी, पालघर, वसई येथे दौड अशा विविध उपक्र मांचा समावेश होता. जिल्ह्यात विविध शासकीय बिलांच्या पानांवर मतदार जागृतीचे शिक्के मारून आतापर्यंत साडेनऊ हजार कुटुंबांपर्यंत पोहोचिवण्यात आले आहेत.तर सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यात विशेषत: वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 3हजार 700 गृहनिर्माण संस्थांमधील एक लाख 71 हजार मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 18 लाख 85 हजारांहून अधिक मतदार असून सर्वाना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आयोगाने सुटी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी दोन तासांची सवलत देण्याचे आवाहन करण्यात आले असून सर्व मतदारांनी येत्या 29 एिप्रल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानpalgharपालघर