शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

ठाणे : जिल्ह्यात ११ महिन्यांत ६३ बालमृत्यू: गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:22 IST

ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके असून, चार तालुक्यांचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. मात्र, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांमध्ये बहुतेक भाग हा ग्रामीण असून, त्यामध्ये आदिवासी भागही आहे. या तालुक्यांत गतवर्षी (एप्रिल १६ ते मार्च १७) १०७ बालमृत्यूू झाला होता. कमी असलेले वजन, जुळी जन्माला येणारे बालके, अपघात, सर्पदंश, जन्मजात अपंग अशी एक नव्हेतर ४५ कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हीच लक्षात घेऊन हे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला त्या कारणावर चर्चा करून मुळाशी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आदिवासी भागात जन्मला येणाºया बालकांची आरोग्य विभागाद्वारे नियमित लसीकरण, तपासणी, मानव विकास शिबीर घेऊन बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार, तसेच सॅम आणि मॅम बालकांची १५ दिवसांनी तपासणी तसेच बालक-पालकांच्या सभा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी गाभा समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक दरमहा होेत आहे.जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत मिळाली माहिती-फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान, जिल्ह्यात ६३ बालकांचा मृत्यू झाला असून, ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत ४४ ने घटल्याचे समोर आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण शहापुरात ७८ होते. त्यापाठोपाठ मुरबाड-१५ आणि भिवंडी-१४ होते. यंदा शहापुरात बालमृत्यूचे प्रमाण ४४ एवढे आहे. भिवंडीत ९ ने प्रमाण कमी होऊन यंदा ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडमध्ये एकने हे प्रमाण घटले असून, या वर्षात १४ बालक दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे