शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

ठाणे : जिल्ह्यात ११ महिन्यांत ६३ बालमृत्यू: गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:22 IST

ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके असून, चार तालुक्यांचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. मात्र, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांमध्ये बहुतेक भाग हा ग्रामीण असून, त्यामध्ये आदिवासी भागही आहे. या तालुक्यांत गतवर्षी (एप्रिल १६ ते मार्च १७) १०७ बालमृत्यूू झाला होता. कमी असलेले वजन, जुळी जन्माला येणारे बालके, अपघात, सर्पदंश, जन्मजात अपंग अशी एक नव्हेतर ४५ कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हीच लक्षात घेऊन हे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला त्या कारणावर चर्चा करून मुळाशी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आदिवासी भागात जन्मला येणाºया बालकांची आरोग्य विभागाद्वारे नियमित लसीकरण, तपासणी, मानव विकास शिबीर घेऊन बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार, तसेच सॅम आणि मॅम बालकांची १५ दिवसांनी तपासणी तसेच बालक-पालकांच्या सभा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी गाभा समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक दरमहा होेत आहे.जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत मिळाली माहिती-फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान, जिल्ह्यात ६३ बालकांचा मृत्यू झाला असून, ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत ४४ ने घटल्याचे समोर आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण शहापुरात ७८ होते. त्यापाठोपाठ मुरबाड-१५ आणि भिवंडी-१४ होते. यंदा शहापुरात बालमृत्यूचे प्रमाण ४४ एवढे आहे. भिवंडीत ९ ने प्रमाण कमी होऊन यंदा ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडमध्ये एकने हे प्रमाण घटले असून, या वर्षात १४ बालक दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे