शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे : जिल्ह्यात ११ महिन्यांत ६३ बालमृत्यू: गतवर्षीच्या तुलनेत प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:22 IST

ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात वाढत्या बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने वेळीच पाऊले उचलत वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्या उपक्रमांना यश येत असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण ४४ ने घटले आहे. या वर्षाच्या एप्रिल ते फेब्रुवारी या अकरा महिन्यांत ६३ बालकांचा मृत्यू झाला आहे. शहापुरात वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ३४ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्ह्यात एकूण सात तालुके असून, चार तालुक्यांचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. मात्र, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांमध्ये बहुतेक भाग हा ग्रामीण असून, त्यामध्ये आदिवासी भागही आहे. या तालुक्यांत गतवर्षी (एप्रिल १६ ते मार्च १७) १०७ बालमृत्यूू झाला होता. कमी असलेले वजन, जुळी जन्माला येणारे बालके, अपघात, सर्पदंश, जन्मजात अपंग अशी एक नव्हेतर ४५ कारणांमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हीच लक्षात घेऊन हे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला त्या कारणावर चर्चा करून मुळाशी जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आदिवासी भागात जन्मला येणाºया बालकांची आरोग्य विभागाद्वारे नियमित लसीकरण, तपासणी, मानव विकास शिबीर घेऊन बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार, तसेच सॅम आणि मॅम बालकांची १५ दिवसांनी तपासणी तसेच बालक-पालकांच्या सभा आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यासाठी गाभा समितीची दर तीन महिन्यांनी होणारी बैठक दरमहा होेत आहे.जिल्हाधिकाºयांच्या बैठकीत मिळाली माहिती-फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान, जिल्ह्यात ६३ बालकांचा मृत्यू झाला असून, ही आकडेवारी गतवर्षाच्या तुलनेत ४४ ने घटल्याचे समोर आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे सर्वाधिक प्रमाण शहापुरात ७८ होते. त्यापाठोपाठ मुरबाड-१५ आणि भिवंडी-१४ होते. यंदा शहापुरात बालमृत्यूचे प्रमाण ४४ एवढे आहे. भिवंडीत ९ ने प्रमाण कमी होऊन यंदा ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडमध्ये एकने हे प्रमाण घटले असून, या वर्षात १४ बालक दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे