शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

प्रारूप प्रभाग रचनेवरून रिपाइंत मात्र असंतोष; उल्हासनगरातील दबंग नगरसेवकांचें प्रभाग सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:09 IST

उल्हासनगर महापालिका प्रभाग रचना एका बंद खोलीत दबंग नेत्यांच्या सोयीसाठी केली जात असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका प्रारूप प्रभाग रचनेत बहुतांश दबंग नेत्यांचे प्रभाग सुरक्षित असून रिपाइंचे शहाराध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दलित वॉर्ड फोडल्याचा आरोप केला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले मराठा सेक्शन परिसरातील तीन प्रभाग कमी लोकसंख्येचे केल्याची टीका होत असून प्रभाग रचनेचा फटका ४ ते ५ दबंग नेत्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 उल्हासनगर महापालिका प्रभाग रचना एका बंद खोलीत दबंग नेत्यांच्या सोयीसाठी केली जात असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. त्यावेळी उपमहापौर भगवान भालेराव यांनी आरोप प्रत्यारोप केले होते. दरम्यान १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावर, सर्वच पक्षातील दबंग नगरसेवकांचे वॉर्ड सुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांनी प्रारूप प्रभाग रचनेवर टीका करण्याचे टाळले असून प्रभाग रचनेचा फटका बसणाऱ्या ४ ते ५ नगरसेवकांनी हरकती घेणार असल्याचे सांगितले. यामध्ये स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, रिपाईचे शहरजिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव हे आघाडीवर आहेत. मराठा सेक्शन परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथील तिन्ही प्रभाग प्रत्येकी सरासरी १५ हजार ५०० लोकसंख्येचे करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापौर लिलाबाई अशान व नगरसेवक अरुण अशान यांचा प्रभाग क्रं-२०, शिवसेना नेते चंद्रकांत बोडारे कुटुंबाचा प्रभाग क्रं-२१, नगरसेवक शेखर यादव यांचा प्रभाग क्रं-२३, सभागृहनेते भारत गंगोत्री यांचा प्रभाग क्रं-२६ व २७, विरोधी पक्ष नेते राजेश वानखडे यांचा प्रभाग क्रं-२५, साई पक्षनेते जीवन इदनानी यांचा प्रभाग क्रं-१६ व १७, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचा प्रभाग क्रं-१५, त्याच प्रमाणे भाजपचे शहाराध्यक्ष व गटनेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, मीना आयलानी, पंचम कलानी यांचेही प्रभाग सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, रिपाइंचे शहाराध्यक्ष भगवान भालेराव, प्रभाग क्रं-१९ मधील नगरसेवकांनी प्रभाग रचने बाबत नाराजी व्यक्त केली. 

प्रभाग रचनेचा अभ्यास केल्यानंतर प्रतिक्रिया...भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वपक्षातील बहुतांश दबंग नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच प्रारूप प्रभाग रचनेवर कोणीही बोलण्यास धजावत नसल्याचे चित्र शहरात आहे. भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी मात्र प्रभाग रचनेचा अभ्यास केल्यानंतर मीडियाला प्रतिक्रिया देणार असल्याचे म्हटले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर