शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

सरकारधार्जिण्या प्राधिकरण नेमणुकीने जनतेत असंतोष, वाढवण परिसरात खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:22 IST

Dahanu : लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, मच्छीमार, बागायतदार, शेतकरी, डायमेकर यांचा प्रचंड मोर्चा निघणार असून त्यात अनेक संघटना सामील होणार आहेत.

डहाणू : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २० जून १९९१च्या अधिसूचनेने डहाणूतील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील विभागाचे आणि सीआरझेडचे रक्षण करण्यासाठी निर्माण केलेले डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करून नवीन हंगामी समितीची नेमणूक केली आहे. त्यामुळे वाढवण परिसरातील लोकांमध्ये संतोष खदखदू लागला असून लोक रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागले आहेत. लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, मच्छीमार, बागायतदार, शेतकरी, डायमेकर यांचा प्रचंड मोर्चा निघणार असून त्यात अनेक संघटना सामील होणार आहेत.

डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी वाढवण बंदर उभारणीविरोधात पाच आदेश पारित करून वाढवण बंदर कायमचे घालविण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती.  हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच, प्राधिकरणाच्या अकरा सदस्यांची जुनी समिती बरखास्त करून वाढवण बंदराचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी प्रामुख्याने सरकारी अधिकाऱ्यांचा भरणा असलेल्या हंगामी समितीची नियुक्ती करून तिला प्राधिकरणाचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

नवनिर्वाचित डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असून सदस्यपदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीचे संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफीचे संचालक, मुंबई विद्यापीठाचे बॉटनी विभागाचे प्रमुख, आयआयटी मुंबईचे पर्यावरण अभियांत्रिकी विभागप्रमुख, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे संचालक हे असतील, तर पदसिद्ध सदस्य म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेसिगल अहमदाबाद, कलेक्टर पालघर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यकारी संचालक, जॉइंट डायरेक्टर कोकण विभाग, डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग पालघर विभाग हे राहणार आहेत.

देशप्रेम दिसून आले- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे जानेवारी २०१९ मध्ये निधन झाल्याने प्राधिकरणाचे काम बंद झाले होते. - केंद्र सरकारने आता पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची गरज नसल्याचे कारण देत ते बरखास्त करण्यात यावे, यासाठी सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली होती.-  या याचिकेविरोधात प्राधिकरण कायम ठेवण्यात यावे यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. 

टॅग्स :palgharपालघर