शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सरकारधार्जिण्या प्राधिकरण नेमणुकीने जनतेत असंतोष, वाढवण परिसरात खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:22 IST

Dahanu : लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, मच्छीमार, बागायतदार, शेतकरी, डायमेकर यांचा प्रचंड मोर्चा निघणार असून त्यात अनेक संघटना सामील होणार आहेत.

डहाणू : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २० जून १९९१च्या अधिसूचनेने डहाणूतील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील विभागाचे आणि सीआरझेडचे रक्षण करण्यासाठी निर्माण केलेले डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करून नवीन हंगामी समितीची नेमणूक केली आहे. त्यामुळे वाढवण परिसरातील लोकांमध्ये संतोष खदखदू लागला असून लोक रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागले आहेत. लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, मच्छीमार, बागायतदार, शेतकरी, डायमेकर यांचा प्रचंड मोर्चा निघणार असून त्यात अनेक संघटना सामील होणार आहेत.

डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी वाढवण बंदर उभारणीविरोधात पाच आदेश पारित करून वाढवण बंदर कायमचे घालविण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती.  हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच, प्राधिकरणाच्या अकरा सदस्यांची जुनी समिती बरखास्त करून वाढवण बंदराचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी प्रामुख्याने सरकारी अधिकाऱ्यांचा भरणा असलेल्या हंगामी समितीची नियुक्ती करून तिला प्राधिकरणाचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

नवनिर्वाचित डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असून सदस्यपदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीचे संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफीचे संचालक, मुंबई विद्यापीठाचे बॉटनी विभागाचे प्रमुख, आयआयटी मुंबईचे पर्यावरण अभियांत्रिकी विभागप्रमुख, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे संचालक हे असतील, तर पदसिद्ध सदस्य म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेसिगल अहमदाबाद, कलेक्टर पालघर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यकारी संचालक, जॉइंट डायरेक्टर कोकण विभाग, डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग पालघर विभाग हे राहणार आहेत.

देशप्रेम दिसून आले- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे जानेवारी २०१९ मध्ये निधन झाल्याने प्राधिकरणाचे काम बंद झाले होते. - केंद्र सरकारने आता पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची गरज नसल्याचे कारण देत ते बरखास्त करण्यात यावे, यासाठी सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली होती.-  या याचिकेविरोधात प्राधिकरण कायम ठेवण्यात यावे यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. 

टॅग्स :palgharपालघर