शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सरकारधार्जिण्या प्राधिकरण नेमणुकीने जनतेत असंतोष, वाढवण परिसरात खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:22 IST

Dahanu : लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, मच्छीमार, बागायतदार, शेतकरी, डायमेकर यांचा प्रचंड मोर्चा निघणार असून त्यात अनेक संघटना सामील होणार आहेत.

डहाणू : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २० जून १९९१च्या अधिसूचनेने डहाणूतील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील विभागाचे आणि सीआरझेडचे रक्षण करण्यासाठी निर्माण केलेले डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करून नवीन हंगामी समितीची नेमणूक केली आहे. त्यामुळे वाढवण परिसरातील लोकांमध्ये संतोष खदखदू लागला असून लोक रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागले आहेत. लवकरच पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी, मच्छीमार, बागायतदार, शेतकरी, डायमेकर यांचा प्रचंड मोर्चा निघणार असून त्यात अनेक संघटना सामील होणार आहेत.

डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी वाढवण बंदर उभारणीविरोधात पाच आदेश पारित करून वाढवण बंदर कायमचे घालविण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती.  हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच, प्राधिकरणाच्या अकरा सदस्यांची जुनी समिती बरखास्त करून वाढवण बंदराचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी प्रामुख्याने सरकारी अधिकाऱ्यांचा भरणा असलेल्या हंगामी समितीची नियुक्ती करून तिला प्राधिकरणाचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

नवनिर्वाचित डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असून सदस्यपदी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीचे संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफीचे संचालक, मुंबई विद्यापीठाचे बॉटनी विभागाचे प्रमुख, आयआयटी मुंबईचे पर्यावरण अभियांत्रिकी विभागप्रमुख, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे संचालक हे असतील, तर पदसिद्ध सदस्य म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेसिगल अहमदाबाद, कलेक्टर पालघर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यकारी संचालक, जॉइंट डायरेक्टर कोकण विभाग, डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग पालघर विभाग हे राहणार आहेत.

देशप्रेम दिसून आले- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे जानेवारी २०१९ मध्ये निधन झाल्याने प्राधिकरणाचे काम बंद झाले होते. - केंद्र सरकारने आता पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची गरज नसल्याचे कारण देत ते बरखास्त करण्यात यावे, यासाठी सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल केली होती.-  या याचिकेविरोधात प्राधिकरण कायम ठेवण्यात यावे यासाठी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. 

टॅग्स :palgharपालघर